शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

गूळ नियमन अखेर कायम; चंद्रकांतदादा

By admin | Updated: December 16, 2014 23:59 IST

शेतकऱ्यांना दिलासा; बाजार समित्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

कोल्हापूर : गुळावरील रद्द केलेले नियमन कायम ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने आज, मंगळवारी घेतला. पणनमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतलेल्या या निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, बाजार समित्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. आता पूर्ववत गूळ खरेदी व विक्रीवर बाजार समितीचा अंकुश राहणार आहे.शेतकऱ्याला त्याने उत्पादित केलेला माल विकण्याची मुभा असावी, यासाठी कॉँग्रेस आघाडी सरकारने ३ मार्च २०१४ पासून गूळ, बेदाणा, रवा-मैद्यासह ड्रायफ्रूटवरील बाजार समित्यांचे नियमन काढून टाकले होेते. या निर्णयामुळे अडत्यांचा हस्तक्षेपच बंद झाला होता.गूळ व बेदाणे वगळता इतर वस्तूंवर या निर्णयाचा फारसा परिणाम झाला नव्हता; पण कोल्हापूरमध्ये बहुतांश गूळ उत्पादक हे लहान शेतकरी आहेत. त्यामुळे त्यांना अडत्यांच्या माध्यमातूनच गुळाची विक्री करावी लागते. गुऱ्हाळघराच्या खर्चासाठी त्याला अडत्याकडूनच आगाऊ पैसे घ्यावे लागतात. शेतकरी-अडते-व्यापारी-बाजार समिती ही साखळी अचानक तुटल्याने गेले सहा महिने शेतकरी गोंधळून गेला होता. सांगली जिल्ह्यातील बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचीही नियमन कायम ठेवण्याची मागणी होती. गूळ खरेदी-विक्रीवर समितीचा अंकुश राहिला नसल्याने मध्यंतरी काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे न देताच पोबारा केला होता. त्यामुळे गुळावरील नियमन कायम राहावे, यासाठी शेतकऱ्यांचा गेले सहा महिने रेटा होता. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी ही मागणी लावून धरली होती. त्यानंतर आज पणनमंत्री पाटील यांनी गुळावरील नियमन कायम ठेवण्याचे आदेश दिले. गुऱ्हाळघर बंदला थंडा प्रतिसादगूळदराच्या झालेल्या घसरणीविरोधात सुरू केलेल्या ‘गुऱ्हाळ बंद’ आंदोलनाला शेतकऱ्यांकडून थंडा प्रतिसाद मिळत आहे. आज, मंगळवारी शाहूवाडी, पन्हाळा व करवीरमधील काही गुऱ्हाळघरे सुरू होती. त्याचबरोबर रात्री उशिरापर्यंत बाजार समितीत गुळाची आवक राहिली. रविवारी झालेल्या गुऱ्हाळमालकांच्या बैठकीत काल, सोमवारपासून गुऱ्हाळघरे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता; पण या निर्णयाने गुऱ्हाळधारकांमध्येच उलटसुलट चर्चा सुरू आहे. आज तब्बल ५९ हजार ७०० रव्यांची विक्री झाली. आजचे सौदे संपले तरी दुपारनंतर गुळाची आवक बाजार समितीत सुरूच होती. रात्री उशिराही समितीत गूळ येत होता. साधारणत: सायंकाळपर्यंत समितीत २० हजार गूळ रव्यांची आवक झाल्याचे समजते. पणनमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गूळ नियमन चालूच ठेवण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांनी गुरुवारचा मोर्चा रद्द करून ‘गुऱ्हाळ बंद’ आंदोलनही मागे घ्यावे, असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक रंजन लाखे यांनी केले.