शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

कहता है जोकर सारा जमाना, आधी हकीकत..

By admin | Updated: May 18, 2015 01:19 IST

शिवकुमार यांची व्यथा : ‘जेमिनी सर्कस’मध्ये ९१ व्या वर्षी करत आहेत विदूषकाचे काम

सचिन भोसले / कोल्हापूर मेरा नाम जोकर, एक होता विदूषक अशा चित्रपटांतून त्याची दु:खं मांडली गेली; पण ‘हसविणारा तो’ एवढीच त्याची प्रतिमा लोकांच्या लक्षात राहिली. त्यामागील त्याची जळजळ मात्र कुणीच ध्यानात घेतली नाही... अशीच कहाणी आहे ‘जेमिनी सर्कस’मधील शिवकुमार भैया रामानंद या ९१ वर्षीय विदूषकाची. चित्रविचित्र पेहराव, रंगविलेला चेहरा आणि विचित्र, विनोदी हावभाव करणारा विदूषक सर्कसच्या रिंगणात आला की, पोट धरून हसावंच लागतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही चेष्टा करावी, अशी विदूषकाची प्रतिमा असते. सध्या ‘जेमिनी सर्कस’मध्ये ९१ वर्षीय शिवकुमार भैया रामानंद यांची स्थिती तर ‘मेरा नाम जोकर’मधील विदूषकासारखी झाली आहे. त्यांच्यामागे कुटुंबातील कोणीच नसल्याने जेमिनी सर्कस हेच त्यांचे घर झाले आहे. वयाच्या तिसाव्या वर्षी ते ‘जेमिनी’मध्ये दाखल झाले. प्रथम मिळेल ते आणि मालक सांगतील ते काम शिवकुमार करीत होते. यामध्ये दोर बांधणे, साहित्य उचलणे, गेटवर वॉचमन, मजूर अशी पडेल त्या कामांचा समावेश होता. ही कामे वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत त्यांनी केली. आता मात्र शरीर साथ देत नसल्याने त्यांना काम जमेनासे झाले आहे. ‘जेमिनी’च्या मालकांनी ते जोपर्यंत जिवंत आहेत, तोपर्यंत त्यांना जमेल ते काम द्या आणि आपल्याच सर्कसचा एक भाग आहेत म्हणून सांभाळा, असे व्यवस्थापनाला सांगितले आहे. त्यामुळे पहिली पन्नास वर्षे मजूर म्हणून काम करणारे शिवकुमार आता गेल्या दहा वर्षांपासून विदूषक म्हणून काम करीत आहेत. शिवकुमार आपल्या कामाबद्दल सांगताना म्हणाले, उत्तर प्रदेशातील बस्ती या गावात राहणारा मी. घरात अठराविश्वे दारिद्र्य असल्याने वयाच्या तेराव्या वर्षी मी घर सोडले. मिळेल ते काम केले. वयाच्या तिसाव्या वर्षी आमच्या शेजारील गावात ‘जेमिनी सर्कस’ आलेली. तेथे काम मिळते का म्हणून पाहण्यास गेलो. मला मजुराची नोकरी मिळाली व तब्बल साठ वर्षे जेमिनीशी एकनिष्ठ राहिलो आहे. गेली साठ वर्षे काम केल्यानंतर माझ्यामागे कोणीच नसल्याने मालकांनी ‘तू जिवंत असेपर्यंत तुला ‘जेमिनी’तून काढून टाकत नाही. जमेल ते काम कर,’ असे सांगितल्याने मी सर्कशीच्या रिंगणात गेली दहा वर्षे विदूषकाचे काम करतो आहे. सध्या सर्कशीच हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत राहिल्याने सर्कशीतील विदूषकांच्या हातांना काम नाही. केवळ तोंडाला रंग असेपर्यंतच आम्हा कलाकारांना किंमत असते. रंग उडून गेल्यानंतर समाजही आमच्याकडे पाठ फिरवितो, अशी खंत शिवकुमार यांनी व्यक्त केली.