शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

भूमी बचाव अभियानात सामील व्हा : रोडे

By admin | Updated: June 23, 2015 00:15 IST

परिवर्तनवादी संघटनांची बैठक ४ व ५ जुलैला वर्धा येथील सेवाग्राममध्ये घेण्यात येणार आहे़ या अभियानात परिवर्तनवादी संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन

कोल्हापूर : भूसंपादन कायद्याला विरोध करण्यासाठी सर्वोदय मंडळातर्फे ‘भूमी बचाव अभियान’ राबविण्यात येणार आहे़ त्याबाबत परिवर्तनवादी संघटनांची बैठक ४ व ५ जुलैला वर्धा येथील सेवाग्राममध्ये घेण्यात येणार आहे़ या अभियानात परिवर्तनवादी संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सर्वोदयी विचारवंत सोमनाथ रोडे यांनी केले़ राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कोल्हापूरतर्फे शाहू स्मारक भवनात आयोजित करण्यात आलेल्या राजर्षी शाहू व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफ ताना ते सोमवारी बोलत होते़ ‘सर्वोदय - आजच्या संदर्भात’ हा व्याख्यानाचा विषय होता़ अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते का़ मा़ आगवणे होते़ रोडे म्हणाले, भूदान चळवळींच्या माध्यमातून आचार्य विनोबा भावेंनी २५ हजार मैलांचा पायी प्रवास करून भूदान आणि ग्रामदान चळवळींच्या माध्यमातून सुमारे ४६ लक्ष एकर जमीन मिळविली़ त्यातील हजारो एकर जमिनी भूमिहीनांना देण्यात आल्या़ गोरगरिबांना उत्पन्नाचे साधन मिळावे हा त्यामागचा हेतू होता, पण सध्याच्या सरकारने पूर्वीच्या भूसंपादन कायद्यात बदल करून जाचक अटी घातलेल्या आहेत़ या अटी शेतकऱ्यांना सक्तीने भूमीहीन करणाऱ्या आहेत़ रोडे म्हणाले, महात्मा गांधीजींच्या विचारधारेवर आधारित असलेल्या ‘सर्वोदय’ने व्यापक असे जनआधारित आंदोलन कोणत्याही विदेशी देणगी किंवा सरकारी मदतीविना केले आहे़ सर्वोदयात शेवटच्या माणसांच्या सुखाचा विचार केला असून विषमतेला छेद देत माणसा-माणसांत जिव्हाळा निर्माण करण्याचे काम हे आंदोलन करत आलेले आहे़ गोवंश हत्येविरोधात ‘सर्वोदय’ने सातत्याने सत्याग्रह केला आहे़ गोवंश हत्याबंदी विरोधी कायदा होण्यामध्ये ‘सर्वोदय’ची भूमिका महत्त्वाची आहे़ ईशान्य भारतातील अनेक प्रदेशांमध्ये संपत्तीवरून होत असलेल्या वादावर तोडग्यासाठी तेथील बंडखोर युवकांचे प्रबोधन करण्याचे कामही ‘सर्वोदय’ने केले आहे, अशी माहितीही रोडे यांनी दिली़ रोडे म्हणाले, गोडसे प्रवृत्तीचे उदारीकरण, धर्मांध शक्तींकडून एकाधिकारशाहीच्या पुरस्कारामुळे देशात दुसरी आणीबाणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही़ या आणीबाणीचा सामना करण्यासाठी ‘सर्वोदय’च्या कार्यकर्त्यांनी तयारी ठेवावी़ विनाकारण महात्मा गांधींना देशाच्या फाळणीसाठी जबाबदार धरले जात आहे़ धर्मांध शक्तींकडून गांधींना मारण्याचा कट फाळणीपूर्वी १९३४ पासूनच सुरू होता़ हिंदू राष्ट्रनिर्मितीमध्ये धर्मांध शक्तींना गांधीजी हे मोठे अडसर वाटत होते, हे लक्षात घेतले पाहिजे़ अध्यक्षीय भाषणात आगवणे म्हणाले, गांधीजी आणि नेहरू यांच्यात वैचारिक मतभेद असले तरी नेहरू गांधींजीच्या विरोधात कधीच वागले नाहीत़ देशाच्या विकासाचे धोरण आखताना नेहरुंनी गांधीजींच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब केला़ शोषितांच्या कल्याणासाठी पासष्ट वर्षांत काय केले, याचा विचार करण्याची वेळ आली आहे़ ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ़ जयसिंगराव पवार यांच्या हस्ते रोडे यांचा सत्कार करण्यात आला़ जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे प्रशासनाधिकारी राजदीप सुर्वे उपस्थित होते़ प्रा़ अशोक चौसाळकर यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)