शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

भूमी बचाव अभियानात सामील व्हा : रोडे

By admin | Updated: June 23, 2015 00:15 IST

परिवर्तनवादी संघटनांची बैठक ४ व ५ जुलैला वर्धा येथील सेवाग्राममध्ये घेण्यात येणार आहे़ या अभियानात परिवर्तनवादी संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन

कोल्हापूर : भूसंपादन कायद्याला विरोध करण्यासाठी सर्वोदय मंडळातर्फे ‘भूमी बचाव अभियान’ राबविण्यात येणार आहे़ त्याबाबत परिवर्तनवादी संघटनांची बैठक ४ व ५ जुलैला वर्धा येथील सेवाग्राममध्ये घेण्यात येणार आहे़ या अभियानात परिवर्तनवादी संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सर्वोदयी विचारवंत सोमनाथ रोडे यांनी केले़ राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कोल्हापूरतर्फे शाहू स्मारक भवनात आयोजित करण्यात आलेल्या राजर्षी शाहू व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफ ताना ते सोमवारी बोलत होते़ ‘सर्वोदय - आजच्या संदर्भात’ हा व्याख्यानाचा विषय होता़ अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते का़ मा़ आगवणे होते़ रोडे म्हणाले, भूदान चळवळींच्या माध्यमातून आचार्य विनोबा भावेंनी २५ हजार मैलांचा पायी प्रवास करून भूदान आणि ग्रामदान चळवळींच्या माध्यमातून सुमारे ४६ लक्ष एकर जमीन मिळविली़ त्यातील हजारो एकर जमिनी भूमिहीनांना देण्यात आल्या़ गोरगरिबांना उत्पन्नाचे साधन मिळावे हा त्यामागचा हेतू होता, पण सध्याच्या सरकारने पूर्वीच्या भूसंपादन कायद्यात बदल करून जाचक अटी घातलेल्या आहेत़ या अटी शेतकऱ्यांना सक्तीने भूमीहीन करणाऱ्या आहेत़ रोडे म्हणाले, महात्मा गांधीजींच्या विचारधारेवर आधारित असलेल्या ‘सर्वोदय’ने व्यापक असे जनआधारित आंदोलन कोणत्याही विदेशी देणगी किंवा सरकारी मदतीविना केले आहे़ सर्वोदयात शेवटच्या माणसांच्या सुखाचा विचार केला असून विषमतेला छेद देत माणसा-माणसांत जिव्हाळा निर्माण करण्याचे काम हे आंदोलन करत आलेले आहे़ गोवंश हत्येविरोधात ‘सर्वोदय’ने सातत्याने सत्याग्रह केला आहे़ गोवंश हत्याबंदी विरोधी कायदा होण्यामध्ये ‘सर्वोदय’ची भूमिका महत्त्वाची आहे़ ईशान्य भारतातील अनेक प्रदेशांमध्ये संपत्तीवरून होत असलेल्या वादावर तोडग्यासाठी तेथील बंडखोर युवकांचे प्रबोधन करण्याचे कामही ‘सर्वोदय’ने केले आहे, अशी माहितीही रोडे यांनी दिली़ रोडे म्हणाले, गोडसे प्रवृत्तीचे उदारीकरण, धर्मांध शक्तींकडून एकाधिकारशाहीच्या पुरस्कारामुळे देशात दुसरी आणीबाणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही़ या आणीबाणीचा सामना करण्यासाठी ‘सर्वोदय’च्या कार्यकर्त्यांनी तयारी ठेवावी़ विनाकारण महात्मा गांधींना देशाच्या फाळणीसाठी जबाबदार धरले जात आहे़ धर्मांध शक्तींकडून गांधींना मारण्याचा कट फाळणीपूर्वी १९३४ पासूनच सुरू होता़ हिंदू राष्ट्रनिर्मितीमध्ये धर्मांध शक्तींना गांधीजी हे मोठे अडसर वाटत होते, हे लक्षात घेतले पाहिजे़ अध्यक्षीय भाषणात आगवणे म्हणाले, गांधीजी आणि नेहरू यांच्यात वैचारिक मतभेद असले तरी नेहरू गांधींजीच्या विरोधात कधीच वागले नाहीत़ देशाच्या विकासाचे धोरण आखताना नेहरुंनी गांधीजींच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब केला़ शोषितांच्या कल्याणासाठी पासष्ट वर्षांत काय केले, याचा विचार करण्याची वेळ आली आहे़ ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ़ जयसिंगराव पवार यांच्या हस्ते रोडे यांचा सत्कार करण्यात आला़ जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे प्रशासनाधिकारी राजदीप सुर्वे उपस्थित होते़ प्रा़ अशोक चौसाळकर यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)