शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

‘झूम’च्या दुर्गंधीने गुदमरतोय ‘श्वास’

By admin | Updated: March 3, 2015 00:29 IST

कचरा प्रकल्पाने त्रस्थ : बहुतांश सार्वजनिक शौचालये बंद; हॉकी मैदानावरील धुरळ््याचा त्रास

शासकीय कर्मचारी, अधिकारी आणि पोलिसांची निवासस्थाने असलेला प्रभाग म्हणून क्र. ६ ‘लाईन बझार’ ओळखला जातो. प्रभागात नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरणारा ‘झूम’ कचरा प्रकल्प तसेच नियमित होणारी कचऱ्याच्या गाड्यांची वाहतूक यामुळे स्थानिक नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. झूमचा ‘वास’ आणि घेता येईना ‘श्वास’ अशी अवस्था इथल्या नागरिकांची झाली आहे. एकवेळ विकासकामे कमी करा; परंतु झूम हटवा, अशी येथील रहिवाशांची मागणी आहे.श्री कॉलनी, मराठा कॉलनी, साईनाथ कॉलनी, त्र्यंबोलीनगर, रेणुकानगर अशा उपनगरातील मोठ्या कॉलन्यांसह ‘झूम’ प्रकल्पाशेजारील अष्टेकर नगर, जाधव पार्क, निवास रेसिडेन्सी, आदी कॉलनींसह मूळ लाईन बझार गावठाण हद्द त्याचबरोबर नवीन पोलीस लाईन, अंडी उबवणी केंद्र, शेती फार्म, सेवा रुग्णालय, भगवा चौकातील साठ कोठरी पोलीस लाईनपर्यंत असा मोठ्या भौगोलिक रचनेत हा प्रभाग विखुरला आहे. प्रभागाचा मोठा विस्तार असल्याने काही ठिकाणी रस्ते, गटारीची कामे करणाऱ्यावर मर्यादा आल्या आहेत. प्रभागात पाण्याची सोय चांगली आहे. रस्त्यावरील दिवे, रस्तेही अनेक ठिकाणी चांगले आहेत.प्रभागाची सहा हजार ६५६ इतकी लोकसंख्या आहेत; परंतु नवीन विकसित होत असलेल्या कॉलन्यामुळे प्रभागाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. प्रामुख्याने शासकीय कर्मचारी, अधिकारी आणि पोलिसांची तसेच बाहेरून आलेल्या लोकांनी येथे प्लॉट घेऊन बांधकाम करून स्थायिक झालेल्या उच्च मध्यमवर्ग, मध्यमवर्ग लोकांचा या प्रभागात समावेश आहे. मात्र, तरीही मूळ गावठाणात राहणाऱ्यांमध्ये शेतकरी कुटुबांचाच समावेश आहे.प्रभागाच्या पूर्वेकडील अष्टेकरनगर, जाधवपार्क, अयोध्या कॉलनी, राजगड कॉलनी, मूळ लाईन बझार हा सर्व परिसर झूम प्रकल्पाच्या जवळच येत असल्याने येथील नागरिकांना त्याचा खूप त्रास होतो. झूम सतत पेटलेला असतो. त्यामुळे त्याचा धूर वाऱ्याची दिशा बदलेल तसा पसरतो. दिवसभरात या प्रकल्पाकडे कचरा घेऊन येणाऱ्या गाड्यांच्या वासाने नागरिक हैराण आहेत.या प्रभागात असलेल्या कामगार चाळीजवळील २१ सार्वजनिक शौचालयापैकी आता केवळ पाच शौचालये सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांची कुचंबणा होत असल्याच्या तक्रारी आहेत. प्रभागात असणाऱ्या हॉकी मैदानाचा धुरळा या मैदानाशेजारील घरात खूप येतो. प्रत्येक घरात मोठ्या प्रमाणात धुरळा येत असल्याने नागरिक हैराण आहेत. मैदानाचा वापर करण्यापूर्वी दररोज पाण्याचा मारा मैदानावर व्हावा, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत. प्रभागातील भेडसावणारी आणखी एक समस्या म्हणजे काळवट जमीन. काळवट जमिनीमुळे काही ठिकाणी घरे आरली आहेत. त्यामुळे गटारी उंच आणि घरे सखल भागात गेली आहेत. त्यामुळे सांडपाण्याची निर्गत व्यवस्था काही ठिकाणी होत नसल्याचे चित्र आहे.प्रभागाचा विस्तार मोठा असल़्याने कामे करताना निधीअभावी अडचणी येतात. तरीही आतापर्यंत तीन कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. चार नंबर फाटक ते लाईन बझार, बस स्टॉप ते भगवा चौक हा नगरोत्थानमधील रखडलेला रस्ता लवकरच पूर्ण होईल. हनुमान मंदिर बालोद्यानमध्ये लहान मुलांसाठी खेळणी बसविली तसेच वृक्षारोपण करून आॅक्सिजन पार्क केले. संपूर्ण प्रभागात दररोज दोन तास पाण्याचे नियोजन केले. प्रभागात गटर्स व डांबरीकरणाची कामे केली. जी काही अपुरी कामे आहेत, ती पुढील सहा महिन्यांत मार्गी लावण्यात येणार आहेत.- चंद्रकांत गणपती घाटगे, नगरसेवक