शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
5
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
8
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
9
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
10
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
11
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
12
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
13
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
14
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
15
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
16
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
17
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
18
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
19
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

जीव गेले आठ; तरी प्रशासन ताठ! मृत्यूचा ‘डेंजर झोन’

By admin | Updated: November 18, 2014 23:38 IST

खड्डे भरून घेण्यास प्रारंभ, मूळ कारण सोडून मलमपट्टीवर भर

खंडाळा : सातारा-पुणे महामार्गावर खंडाळा येथे रविवारी झालेल्या भीषण अपघातानंतर हायवे प्रशासनाने अपघातस्थळावरील खड्डे मुजवून त्यावर डांबरीकरण करून तात्पुरती मलमपट्टी केली आहे तर तुटलेल्या संरक्षक कठड्यांना रिफ्लेक्टर पट्ट्या लावून दिशा दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र, अपघाताचे मूळ कारण व खराब रस्त्यांबाबत अद्याप कार्यवाही झालेली नाही. दरम्यान, अपघातस्थळावरील बसथांबा बंद करून महामार्गावरच पुढच्या ठिकाणी तो सुरूच असल्याने प्रवाशांची मात्र तारांबळ उडत होती. या अपघातानंतर जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी तातडीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व रस्ता रुंदीकरणाचे ठेकेदार व स्थानिक नागरिक यांची बैठक घेऊन महामार्गाच्या दुरुस्तीबाबत सूचना केल्या होत्या. त्यानंतर खंडाळा येथे अपघाताच्या ठिकाणी सेवा रस्त्यावरील खड्डे मुजवून डांबरीकरण करण्यात आले तर तुटलेले कठड्यांच्या जागी कापडी स्टिकर लावण्यात आले. मात्र, पुलावरील झाडे-झुडपे अद्याप तोडलेली नाहीत. खंडाळा उड्डाणपुलाखालील खड्ड्यांमध्ये अजूनही पाणी साठलेले असते तर अपघातानंतर बसचालकांना सूचना देऊन बसस्थानकाकडे वळविण्यात येणाऱ्या बसेस स्थानकात न जाता बाहेरूनच जातात. प्रवासी मात्र स्थानकात प्रतीक्षा करीत असतात. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. महामार्गाच्या रुंदीकरणाबाबत प्राधिकरणाने तात्पुरत्या स्वरूपात काम न करता अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी व आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी स्थानिकांच्या गरजेनुसार दुरुस्त्या व्हाव्यात, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. (प्रतिनिधी) ‘एस’... येथेच घडतात अपघात! सहा महिन्यांपूर्वी या रस्त्यावरील ‘एस’ आकाराच्या वळणावर दोन भीषण अपघातात २० जणांचा जीव गेला. त्यानंतर महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल झाला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अशास्त्रीय वळणे काढण्याच्या सूचना केल्या मात्र परिस्थिती आजही बदललेली नाही. अपघात घडलेल्या ठिकाणी डांबरीकरण शिरवळ : पारगाव, ता. खंडाळा या ठिकाणी कंटेनर उलटून आठ प्रवासी ठार झाल्याच्या घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व रिलायन्सला जाग आली असून कंटेनर हलवित अपघाताच्या ठिकाणी तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर दोन दिवसांपूर्वी कंटेनरखाली चिरडून आठ प्रवाशांचे जीव घेतले. या घटनेच्या नंतर सहकारमंत्री चंद्रकांत पाटील व जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी कडक कारवाईचे निर्देश दिल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व रिलायन्सच्या डोळ्यावरील पट्टी निघाली असून खंडाळा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने अपघाताच्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, रिलायन्सकडून खड्डे मुजवून डांबरीकरण करण्यात आले आहे.