शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
5
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
6
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
8
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
9
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
10
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
11
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
12
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
13
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
14
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
15
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
16
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
17
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
19
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
20
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक

जीव गेले आठ; तरी प्रशासन ताठ! मृत्यूचा ‘डेंजर झोन’

By admin | Updated: November 18, 2014 23:38 IST

खड्डे भरून घेण्यास प्रारंभ, मूळ कारण सोडून मलमपट्टीवर भर

खंडाळा : सातारा-पुणे महामार्गावर खंडाळा येथे रविवारी झालेल्या भीषण अपघातानंतर हायवे प्रशासनाने अपघातस्थळावरील खड्डे मुजवून त्यावर डांबरीकरण करून तात्पुरती मलमपट्टी केली आहे तर तुटलेल्या संरक्षक कठड्यांना रिफ्लेक्टर पट्ट्या लावून दिशा दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र, अपघाताचे मूळ कारण व खराब रस्त्यांबाबत अद्याप कार्यवाही झालेली नाही. दरम्यान, अपघातस्थळावरील बसथांबा बंद करून महामार्गावरच पुढच्या ठिकाणी तो सुरूच असल्याने प्रवाशांची मात्र तारांबळ उडत होती. या अपघातानंतर जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी तातडीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व रस्ता रुंदीकरणाचे ठेकेदार व स्थानिक नागरिक यांची बैठक घेऊन महामार्गाच्या दुरुस्तीबाबत सूचना केल्या होत्या. त्यानंतर खंडाळा येथे अपघाताच्या ठिकाणी सेवा रस्त्यावरील खड्डे मुजवून डांबरीकरण करण्यात आले तर तुटलेले कठड्यांच्या जागी कापडी स्टिकर लावण्यात आले. मात्र, पुलावरील झाडे-झुडपे अद्याप तोडलेली नाहीत. खंडाळा उड्डाणपुलाखालील खड्ड्यांमध्ये अजूनही पाणी साठलेले असते तर अपघातानंतर बसचालकांना सूचना देऊन बसस्थानकाकडे वळविण्यात येणाऱ्या बसेस स्थानकात न जाता बाहेरूनच जातात. प्रवासी मात्र स्थानकात प्रतीक्षा करीत असतात. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. महामार्गाच्या रुंदीकरणाबाबत प्राधिकरणाने तात्पुरत्या स्वरूपात काम न करता अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी व आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी स्थानिकांच्या गरजेनुसार दुरुस्त्या व्हाव्यात, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. (प्रतिनिधी) ‘एस’... येथेच घडतात अपघात! सहा महिन्यांपूर्वी या रस्त्यावरील ‘एस’ आकाराच्या वळणावर दोन भीषण अपघातात २० जणांचा जीव गेला. त्यानंतर महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल झाला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अशास्त्रीय वळणे काढण्याच्या सूचना केल्या मात्र परिस्थिती आजही बदललेली नाही. अपघात घडलेल्या ठिकाणी डांबरीकरण शिरवळ : पारगाव, ता. खंडाळा या ठिकाणी कंटेनर उलटून आठ प्रवासी ठार झाल्याच्या घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व रिलायन्सला जाग आली असून कंटेनर हलवित अपघाताच्या ठिकाणी तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर दोन दिवसांपूर्वी कंटेनरखाली चिरडून आठ प्रवाशांचे जीव घेतले. या घटनेच्या नंतर सहकारमंत्री चंद्रकांत पाटील व जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी कडक कारवाईचे निर्देश दिल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व रिलायन्सच्या डोळ्यावरील पट्टी निघाली असून खंडाळा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने अपघाताच्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, रिलायन्सकडून खड्डे मुजवून डांबरीकरण करण्यात आले आहे.