शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

जीव गेले आठ; तरी प्रशासन ताठ! मृत्यूचा ‘डेंजर झोन’

By admin | Updated: November 18, 2014 23:38 IST

खड्डे भरून घेण्यास प्रारंभ, मूळ कारण सोडून मलमपट्टीवर भर

खंडाळा : सातारा-पुणे महामार्गावर खंडाळा येथे रविवारी झालेल्या भीषण अपघातानंतर हायवे प्रशासनाने अपघातस्थळावरील खड्डे मुजवून त्यावर डांबरीकरण करून तात्पुरती मलमपट्टी केली आहे तर तुटलेल्या संरक्षक कठड्यांना रिफ्लेक्टर पट्ट्या लावून दिशा दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र, अपघाताचे मूळ कारण व खराब रस्त्यांबाबत अद्याप कार्यवाही झालेली नाही. दरम्यान, अपघातस्थळावरील बसथांबा बंद करून महामार्गावरच पुढच्या ठिकाणी तो सुरूच असल्याने प्रवाशांची मात्र तारांबळ उडत होती. या अपघातानंतर जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी तातडीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व रस्ता रुंदीकरणाचे ठेकेदार व स्थानिक नागरिक यांची बैठक घेऊन महामार्गाच्या दुरुस्तीबाबत सूचना केल्या होत्या. त्यानंतर खंडाळा येथे अपघाताच्या ठिकाणी सेवा रस्त्यावरील खड्डे मुजवून डांबरीकरण करण्यात आले तर तुटलेले कठड्यांच्या जागी कापडी स्टिकर लावण्यात आले. मात्र, पुलावरील झाडे-झुडपे अद्याप तोडलेली नाहीत. खंडाळा उड्डाणपुलाखालील खड्ड्यांमध्ये अजूनही पाणी साठलेले असते तर अपघातानंतर बसचालकांना सूचना देऊन बसस्थानकाकडे वळविण्यात येणाऱ्या बसेस स्थानकात न जाता बाहेरूनच जातात. प्रवासी मात्र स्थानकात प्रतीक्षा करीत असतात. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. महामार्गाच्या रुंदीकरणाबाबत प्राधिकरणाने तात्पुरत्या स्वरूपात काम न करता अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी व आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी स्थानिकांच्या गरजेनुसार दुरुस्त्या व्हाव्यात, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. (प्रतिनिधी) ‘एस’... येथेच घडतात अपघात! सहा महिन्यांपूर्वी या रस्त्यावरील ‘एस’ आकाराच्या वळणावर दोन भीषण अपघातात २० जणांचा जीव गेला. त्यानंतर महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल झाला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अशास्त्रीय वळणे काढण्याच्या सूचना केल्या मात्र परिस्थिती आजही बदललेली नाही. अपघात घडलेल्या ठिकाणी डांबरीकरण शिरवळ : पारगाव, ता. खंडाळा या ठिकाणी कंटेनर उलटून आठ प्रवासी ठार झाल्याच्या घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व रिलायन्सला जाग आली असून कंटेनर हलवित अपघाताच्या ठिकाणी तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर दोन दिवसांपूर्वी कंटेनरखाली चिरडून आठ प्रवाशांचे जीव घेतले. या घटनेच्या नंतर सहकारमंत्री चंद्रकांत पाटील व जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी कडक कारवाईचे निर्देश दिल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व रिलायन्सच्या डोळ्यावरील पट्टी निघाली असून खंडाळा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने अपघाताच्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, रिलायन्सकडून खड्डे मुजवून डांबरीकरण करण्यात आले आहे.