शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्रात जीप कोसळून दोन ठार

By admin | Updated: July 15, 2015 01:18 IST

वारूळजवळ अपघात : दोन जखमी, सर्व रत्नागिरी जिल्ह्यातील

आंबा : रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावर वारूळ (ता. शाहूवाडी) येथील कडवी नदीच्या पुलावरून सुमारे शंभर फूट खोल पात्रात बोलेरो कोसळून झालेल्या अपघातात दोघेजण ठार झाले, तर दोघेजण जखमी झाले. मंगळवारी रात्री दहा वाजता हा अपघात झाला आहे. अपघातातील जखमी व मृत नांदिवडे ( जि. रत्नागिरी) येथील आहेत. जखमींना मलकापूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यावर त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर येथे उपचारासाठी दाखल केले आहे. शाहूवाडी पोलिसांत या अपघाताची नोंद झाली आहे. अपघातील एकजण बेपत्ता असल्याची भिती व्यक्त होत आहे.बिपीन शिरधनकर आणि प्रभाकर हळदणकर हे कुटुंबियांसमवेत बोलेरो गाडीतून कोल्हापूरहुन रत्नागिरीला जात होते. गाडीमध्ये पाचजण होते. वारूळजवळ गाडी आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडी नदीपात्रात कोसळली. गाडीतील पाचहीजण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने रस्त्यावरील बहुतेकांनी अपघाताची माहिती वारूळ आणि आंबा येथील तरुणांना कळवली. येथील तरुणांनी तत्काळ धाव घेवून जखमींना रुग्णालयात हलविले. रुग्णालयात उपचार सुरु असताना जखमीपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. गंभीर जखमी असल्याने अरुणा बिपीन शिरधनकर (वय ४५) या फक्त गावाचेच नाव सांगू शकल्या. अरुणा यांना अपघातामुळे धक्का बसल्यामुळे रात्री उशिरापर्यंत मृतांची नावे समजू शकली नव्हती. अपघातानंतर तातडीने दिनेश तावरे, शिराज शेख, प्रमोद माळी, प्रशांत मिरजकर, मनोज आडवीळकर, दिनेश कामिरकर आदींनी मदत कार्य केले. दरम्यान, मलकापूर ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचार करण्यावरुन एका पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये आणि परिचारीकेमध्ये मोठा वाद झाला. त्यामुळे उपस्थितांतून नाराजी व्यक्त होत होती. (प्रतिनिधी)