शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

नदीपात्रात जीप कोसळून दोन ठार

By admin | Updated: July 15, 2015 01:18 IST

वारूळजवळ अपघात : दोन जखमी, सर्व रत्नागिरी जिल्ह्यातील

आंबा : रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावर वारूळ (ता. शाहूवाडी) येथील कडवी नदीच्या पुलावरून सुमारे शंभर फूट खोल पात्रात बोलेरो कोसळून झालेल्या अपघातात दोघेजण ठार झाले, तर दोघेजण जखमी झाले. मंगळवारी रात्री दहा वाजता हा अपघात झाला आहे. अपघातातील जखमी व मृत नांदिवडे ( जि. रत्नागिरी) येथील आहेत. जखमींना मलकापूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यावर त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर येथे उपचारासाठी दाखल केले आहे. शाहूवाडी पोलिसांत या अपघाताची नोंद झाली आहे. अपघातील एकजण बेपत्ता असल्याची भिती व्यक्त होत आहे.बिपीन शिरधनकर आणि प्रभाकर हळदणकर हे कुटुंबियांसमवेत बोलेरो गाडीतून कोल्हापूरहुन रत्नागिरीला जात होते. गाडीमध्ये पाचजण होते. वारूळजवळ गाडी आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडी नदीपात्रात कोसळली. गाडीतील पाचहीजण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने रस्त्यावरील बहुतेकांनी अपघाताची माहिती वारूळ आणि आंबा येथील तरुणांना कळवली. येथील तरुणांनी तत्काळ धाव घेवून जखमींना रुग्णालयात हलविले. रुग्णालयात उपचार सुरु असताना जखमीपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. गंभीर जखमी असल्याने अरुणा बिपीन शिरधनकर (वय ४५) या फक्त गावाचेच नाव सांगू शकल्या. अरुणा यांना अपघातामुळे धक्का बसल्यामुळे रात्री उशिरापर्यंत मृतांची नावे समजू शकली नव्हती. अपघातानंतर तातडीने दिनेश तावरे, शिराज शेख, प्रमोद माळी, प्रशांत मिरजकर, मनोज आडवीळकर, दिनेश कामिरकर आदींनी मदत कार्य केले. दरम्यान, मलकापूर ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचार करण्यावरुन एका पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये आणि परिचारीकेमध्ये मोठा वाद झाला. त्यामुळे उपस्थितांतून नाराजी व्यक्त होत होती. (प्रतिनिधी)