शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

नदीपात्रात जीप कोसळून दोन ठार

By admin | Updated: July 15, 2015 01:18 IST

वारूळजवळ अपघात : दोन जखमी, सर्व रत्नागिरी जिल्ह्यातील

आंबा : रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावर वारूळ (ता. शाहूवाडी) येथील कडवी नदीच्या पुलावरून सुमारे शंभर फूट खोल पात्रात बोलेरो कोसळून झालेल्या अपघातात दोघेजण ठार झाले, तर दोघेजण जखमी झाले. मंगळवारी रात्री दहा वाजता हा अपघात झाला आहे. अपघातातील जखमी व मृत नांदिवडे ( जि. रत्नागिरी) येथील आहेत. जखमींना मलकापूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यावर त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर येथे उपचारासाठी दाखल केले आहे. शाहूवाडी पोलिसांत या अपघाताची नोंद झाली आहे. अपघातील एकजण बेपत्ता असल्याची भिती व्यक्त होत आहे.बिपीन शिरधनकर आणि प्रभाकर हळदणकर हे कुटुंबियांसमवेत बोलेरो गाडीतून कोल्हापूरहुन रत्नागिरीला जात होते. गाडीमध्ये पाचजण होते. वारूळजवळ गाडी आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडी नदीपात्रात कोसळली. गाडीतील पाचहीजण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने रस्त्यावरील बहुतेकांनी अपघाताची माहिती वारूळ आणि आंबा येथील तरुणांना कळवली. येथील तरुणांनी तत्काळ धाव घेवून जखमींना रुग्णालयात हलविले. रुग्णालयात उपचार सुरु असताना जखमीपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. गंभीर जखमी असल्याने अरुणा बिपीन शिरधनकर (वय ४५) या फक्त गावाचेच नाव सांगू शकल्या. अरुणा यांना अपघातामुळे धक्का बसल्यामुळे रात्री उशिरापर्यंत मृतांची नावे समजू शकली नव्हती. अपघातानंतर तातडीने दिनेश तावरे, शिराज शेख, प्रमोद माळी, प्रशांत मिरजकर, मनोज आडवीळकर, दिनेश कामिरकर आदींनी मदत कार्य केले. दरम्यान, मलकापूर ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचार करण्यावरुन एका पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये आणि परिचारीकेमध्ये मोठा वाद झाला. त्यामुळे उपस्थितांतून नाराजी व्यक्त होत होती. (प्रतिनिधी)