शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

जयसिंगपूरचे सव्वा कोटी दरवर्षी ‘कचऱ्यात’

By admin | Updated: May 17, 2017 01:09 IST

कचऱ्याची समस्याकायमच : नव्या सभागृहाचे साडेचार महिने कचरा प्रश्नातच गेले, जागा नाही

संदीप बावचे ।  लोकमत न्यूज नेटवर्क  जयसिंगपूर : शहरात चांगली, दर्जेदार साफसफाई व्हावी, यादृष्टीने जरवर्षी प्रशासन घनकचरा विभागावर सव्वाकोटी रुपये खर्च करते. त्यातूनही अनेकवेळा शहर स्वच्छतेबाबत तक्रारी येतात. पालिकेच्या नव्या सभागृहाला नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कचऱ्याचा प्रश्नाला सामोरे जावे लागले. गेल्या साडेचार महिन्यापासून कचरा टाकण्याचा प्रश्न अजूनही कायम आहे. जयसिंगपूर शहरातील कचऱ्याचा जागेचा प्रश्न अजूनही मिटलेला नाही. शाहू आघाडीच्या प्रयत्नामुळे खामकर मळ्यातील बाळासाहेब देसाई यांच्या शेतात सध्या कचरा टाकला जात असला तरी दोन महिने कचरा टाकण्याचा प्रश्न तात्पुरता मिटला आहे. येणाऱ्या काळात एकतर चिपरी हद्दीतील खणीत पूर्वीप्रमाणे कचरा टाकला जावा अथवा नवीन जागा पालिकेला घ्यावीच लागणार आहे. शहरातील सुमारे १६ टन कचरा टाकण्यासाठी जागा नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणे मांडल्यानंतर चिपरी गावच्या हद्दीत दोन एकर जागा पालिकेला मिळाली होती. दरम्यान, जयसिंगपूर नगरपालिकेकडून शहरातील घणकचरा, मृत जनावरे टाकण्यात येत आहेत. खाणीतील दुर्गंधीचा त्रास परिसरातील नागरीक व शेतकऱ्यांना जाणवू लागल्याने १ जानेवारी २०१७ चिपरी ग्रामस्थांनी जयसिंगपूरच्या कचऱ्याला विरोध करीत कचरा डेपोसमोर चरखुदाई करुन रस्ता बंद केला. यामुळे गेल्या साडेचार महिन्यापासून शहरातील संकलित केलेल कचरा टाकायचा कुठे हा प्रश्न आवासून उभा आहे. तात्पुरती पर्यायी जागा उपलब्ध झाली असलतरी येणाऱ्या काळात कचऱ्याचा प्रश्न उभा राहणार आहे.लोकसहभागाचा अभावकोणतीही चळवळ लोकसहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. नगरपालिकेने अनेकदा शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमात लोकसहभाग दिसला नाही. ओला व सुका कचरा वेगळा करावा. कचरा उघड्यावर कुठेही फेकू नये. कचरा घंटागाडीतच टाकावा. याबाबत जनजागृती मोहीम राबवूनही काही ठिकाणी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. सफाई अभियानाचा देखावानगरपालिका स्थापनेच्या अमृत महोत्सवानिमित्त १ एप्रिलपासून स्वच्छ भारत अभियान राबविण्यास प्रारंभ करण्यात आला. वर्षभर हा उपक्रम राबविण्याचा निर्णय झाला होता. या अभियानातून काय साध्य केले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या आठवड्यात कचराकोंडाळे ओसंडून वाहत होत्या. इतरत्र कचरा पडला होता. मात्र, या प्रश्नाकडे चार दिवसात कोणीही मागे वळून पाहिले नाही.भाजीमंडई दुर्गंधीतअग्निशामक दलाचे विभागाशेजारीच भाजीमंडई आहे. अग्निशामक विभागाच्या पाठीमागील बाजूस कचरा गाड्या उभ्या केल्या जातात. या परिसरात खराब झालेल्या कचराकुंड्या टाकल्या आहेत. त्याठिकाणी पडलेला कचऱ्यामुळे भाजी मंडई दुर्गंधीच्या चक्रात सापडली आहे. घनकचऱ्याचे बजेटघनकचरा एकत्रिकरणासाठी पालिकेचे १ कोटी ३० लाख रुपयांचे बजेट आहे. दिवसाकाठी हिशेब झाल्या किमान २८ हजार रुपये इतका खर्च घनकचरा एकत्रिकरणासाठी करावा लागतो. सात घंटागाड्या, १४० कचराकुंड्या, दोन वाहन, ७५ हून अधिक सफाई कामगारांची संख्या आहे.