शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

‘आरोग्य’ योजनेपासून जयसिंगपूर वंचित ?

By admin | Updated: August 30, 2015 23:03 IST

पाठपुराव्याची गरज : लोकसंख्येच्या मर्यादेमुळे योजनेस अडचणी

संदीप बावचे - जयसिंगपूर   --लोकसंख्येच्या कारणावरून केंद्र शासन पुरस्कृत ‘राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान’पासून जयसिंगपूर शहर वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगरपालिकेकडून दोन वेळा शासनाच्या आरोग्य विभागकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. एक लाख लोकसंख्या असेल तरच ही योजना मंजूर होवू शकते असे, शासन पातळीवर सांगण्यात येत आहे. यासाठी लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याची गरज बनली आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ५० हजारांपेक्षा जास्त असून केंद्राच्या सूचनेनुसार ज्या शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ५० हजारांपेक्षा जास्त आहे, अशा शहरांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येतो. जयसिंगपूर शहराशी बहुतांश गावे निगडीत असल्यामुळे व्यापारी, शेतकरी, कामगार औषधोपचारासाठी येतात. सध्या शहर व परिसरातील नागरिकांची आरोग्य सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्र वगळता खासगी वैद्यकीय व्यवसायावर अवलंबून आहे. यामुळे केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय शहर आरोग्य अभियान (एन.यू.एच.एम) राबविण्याबाबत पालिकेच्या विशेष सभेत ठराव केला होता. सरासरी ५० हजार लोकसंख्येला एक अर्बन प्रायमरी हेल्थ सेंटर, असे या योजनेचे स्वरूप असून. एक वैद्यकीय अधिकारी, तर प्रत्येक दहा हजार लोकसंख्येला एक उपआरोग्य केंद्र व लॅबोरेटरी स्टोअर, स्वतंत्र कर्मचारी, नर्स, क्लार्क, आदीं असे नियोजन आहे. योजना शासकीय खर्चातून चालविली जाते. औषध पुरवठा केंद्र शासनाकडून होतो. या योजने अंतर्गत आरोग्य केंद्रात सुसज्ज लॅबोरेटरी, बाह्यरूग्ण सेवा, एक्स रे, औषधोपचार व पुरवठा केंद्र, तसेच दर आठवड्यास स्त्री रोग व बाल रोग तज्ज्ञ असे स्वरूप आहे. या योजनेवर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, मुख्याधिकारी यांचे नियंत्रण असते. योजनेसाठी जयसिंगपूर पालिकेने आरोग्य विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. योजना कोणासाठी ?१५ आॅक्टोंबर २०१३ साली तत्कालीन केंद्रीय मंत्री गुलाब नबी आझाद यांनी योजना पुरस्कृत केली. शहर व ग्रामीण विभागासाठी कार्यान्वित करण्यात आली. नंतर शहरातील झोपडपट्टी, कामगार वसाहतीमधील नगारिकांसाठी तसेच कचरा गोळा करणारे, फेरीवाले, बांधकाम मजूर, वीटभट्टी कामगार यांच्या आरोग्याच्यादृष्टीने योजना शहरी भागात कार्यान्वित करण्यात आली आहे.प्रस्ताव लालफितीतराष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान ही योजना सध्या इचलकरंजी शहरात सुरू आहे. या धर्तीवरच जयसिंगपूर शहरात ही आरोग्य सेवा सुरू करण्यासाठी नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी यांच्याकडून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, हा प्रस्ताव शासनाच्या लालफितीत अडकून पडला आहे. ५0 हजारांसाठी एक केंद्रएक लाख लोकसंख्येसाठी दोन केंद्रे, असे शासनाचे धोरण आहे. शहराची लोकसंख्या ५० हजार गृहीत धरून एका केंद्राची मागणी प्रस्तावाद्वारे केली आहे. एक लाख लोकसंख्ये प्रमाणेच ही योजना मिळू शकते, असे शासनाकडून सांगण्यात आले आहे, अशी माहिती प्रभारी उपमुख्याधिकारी एम. एस. चाबुकस्वार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.