शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
5
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
6
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
7
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
8
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
9
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
10
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
11
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
12
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
13
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
14
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
15
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
16
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
17
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
18
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
19
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
20
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा

‘आरोग्य’ योजनेपासून जयसिंगपूर वंचित ?

By admin | Updated: August 30, 2015 23:03 IST

पाठपुराव्याची गरज : लोकसंख्येच्या मर्यादेमुळे योजनेस अडचणी

संदीप बावचे - जयसिंगपूर   --लोकसंख्येच्या कारणावरून केंद्र शासन पुरस्कृत ‘राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान’पासून जयसिंगपूर शहर वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगरपालिकेकडून दोन वेळा शासनाच्या आरोग्य विभागकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. एक लाख लोकसंख्या असेल तरच ही योजना मंजूर होवू शकते असे, शासन पातळीवर सांगण्यात येत आहे. यासाठी लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याची गरज बनली आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ५० हजारांपेक्षा जास्त असून केंद्राच्या सूचनेनुसार ज्या शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ५० हजारांपेक्षा जास्त आहे, अशा शहरांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येतो. जयसिंगपूर शहराशी बहुतांश गावे निगडीत असल्यामुळे व्यापारी, शेतकरी, कामगार औषधोपचारासाठी येतात. सध्या शहर व परिसरातील नागरिकांची आरोग्य सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्र वगळता खासगी वैद्यकीय व्यवसायावर अवलंबून आहे. यामुळे केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय शहर आरोग्य अभियान (एन.यू.एच.एम) राबविण्याबाबत पालिकेच्या विशेष सभेत ठराव केला होता. सरासरी ५० हजार लोकसंख्येला एक अर्बन प्रायमरी हेल्थ सेंटर, असे या योजनेचे स्वरूप असून. एक वैद्यकीय अधिकारी, तर प्रत्येक दहा हजार लोकसंख्येला एक उपआरोग्य केंद्र व लॅबोरेटरी स्टोअर, स्वतंत्र कर्मचारी, नर्स, क्लार्क, आदीं असे नियोजन आहे. योजना शासकीय खर्चातून चालविली जाते. औषध पुरवठा केंद्र शासनाकडून होतो. या योजने अंतर्गत आरोग्य केंद्रात सुसज्ज लॅबोरेटरी, बाह्यरूग्ण सेवा, एक्स रे, औषधोपचार व पुरवठा केंद्र, तसेच दर आठवड्यास स्त्री रोग व बाल रोग तज्ज्ञ असे स्वरूप आहे. या योजनेवर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, मुख्याधिकारी यांचे नियंत्रण असते. योजनेसाठी जयसिंगपूर पालिकेने आरोग्य विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. योजना कोणासाठी ?१५ आॅक्टोंबर २०१३ साली तत्कालीन केंद्रीय मंत्री गुलाब नबी आझाद यांनी योजना पुरस्कृत केली. शहर व ग्रामीण विभागासाठी कार्यान्वित करण्यात आली. नंतर शहरातील झोपडपट्टी, कामगार वसाहतीमधील नगारिकांसाठी तसेच कचरा गोळा करणारे, फेरीवाले, बांधकाम मजूर, वीटभट्टी कामगार यांच्या आरोग्याच्यादृष्टीने योजना शहरी भागात कार्यान्वित करण्यात आली आहे.प्रस्ताव लालफितीतराष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान ही योजना सध्या इचलकरंजी शहरात सुरू आहे. या धर्तीवरच जयसिंगपूर शहरात ही आरोग्य सेवा सुरू करण्यासाठी नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी यांच्याकडून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, हा प्रस्ताव शासनाच्या लालफितीत अडकून पडला आहे. ५0 हजारांसाठी एक केंद्रएक लाख लोकसंख्येसाठी दोन केंद्रे, असे शासनाचे धोरण आहे. शहराची लोकसंख्या ५० हजार गृहीत धरून एका केंद्राची मागणी प्रस्तावाद्वारे केली आहे. एक लाख लोकसंख्ये प्रमाणेच ही योजना मिळू शकते, असे शासनाकडून सांगण्यात आले आहे, अशी माहिती प्रभारी उपमुख्याधिकारी एम. एस. चाबुकस्वार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.