शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

जयसिंगपुरात स्वच्छता अ‍ॅप ठरले कूचकामी- अ‍ॅप सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 23:16 IST

गेल्या चार महिन्यांपासून जयसिंगपूर नगरपालिकेचा स्वच्छता अ‍ॅप बंदच आहे. त्यामुळे आनलाईन तक्रारींचा निपटारा होत नसल्याचे चित्र शहरात दिसत आहे. तांत्रिक कारणांमुळे अ‍ॅपवरील तक्रारी दिसत नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत असलेतरी स्वच्छता

ठळक मुद्देआनलाईन तक्रारींचा निपटारा नाही : शहरात स्वच्छतेचा उडतोय बोजवारा;

संदीप बावचे ।जयसिंगपूर : गेल्या चार महिन्यांपासून जयसिंगपूर नगरपालिकेचा स्वच्छता अ‍ॅप बंदच आहे. त्यामुळे आनलाईन तक्रारींचा निपटारा होत नसल्याचे चित्र शहरात दिसत आहे. तांत्रिक कारणांमुळे अ‍ॅपवरील तक्रारी दिसत नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत असलेतरी स्वच्छता अ‍ॅप बंद असल्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा फोल ठरत आहेत. शहर स्वच्छतेसाठी स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत सुरु करण्यात आलेल्या या अ‍ॅपची ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी अवस्था बनली आहे.

स्वच्छतेबाबत नागरिकांच्या तक्रारी सहजरीत्या नोंदविता याव्यात, यासाठी डिजिटल माध्यम म्हणून स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत स्वच्छता अ‍ॅपची सव्वा वर्षापूर्वी जयसिंगपूर पालिकेने सुरुवात केली होती. स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत स्वच्छता स्पर्धा आयोजित करून वेगवेगळ्या निकषाच्या आधारे पालिकांना मानांकन दिले जाते. स्वच्छता गुणवत्तेसाठी जयसिंगपूर शहराने सहभाग नोंदवून पालिकेकडून स्वच्छता अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यासाठी जनजागृती केली होती. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत या अ‍ॅपचा वापर नागरिकांनी चांगल्या पध्दतीने केला होता.

दरम्यान, डिसेंबर २०१८ पासून तांत्रिक अडचणींमुळे स्वच्छता अ‍ॅपमध्ये बिघाड निर्माण झाला आहे. नागरिकांकडून स्वच्छतेबाबत तक्रारी डाऊनलोड करून पाठविल्या जात असल्या तरी नगरपालिकेच्या इंजिनिअर्स अ‍ॅपमध्ये या तक्रारी दिसत नाहीत. त्यामुळे हे अ‍ॅप बिनकामाचे ठरले आहे. गेल्या चार महिन्यांपासून स्वच्छता अ‍ॅप बंद असल्याचे नगरपालिकेतून सांगण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचा निकाल देखील नुकताच लागला आहे. अ‍ॅप बंद असल्यामुळे त्याचे गुणही पालिकेला मिळालेले नाहीत. त्यामुळे किमान दैनंदिन तक्रारीसाठी हे अ‍ॅप सुरू करावे, अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.अ‍ॅपचा फायदाशहरातील कुठल्याही भागात कचरा दिसल्यास नागरिकांना तक्रार करता येते. याशिवाय घंटागाडी आली नाही, मृत जनावरांची विल्हेवाट लावणे, सार्वजनिक शौचालयात पाणी नाही, कचऱ्याचे ढीग, गटारी तुंबल्या यासह विविध तक्रारी याबाबतचे छायाचित्र काढून स्वच्छता अ‍ॅपवर टाकल्यास पालिकेकडून त्यावर कारवाई करणे हा उद्देश आहे. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे हा स्वच्छता अ‍ॅप बिनकामाचा ठरला आहे.तांत्रिक अडचण दूर करण्याची मागणीस्वच्छता अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यासाठी सव्वा वर्षापूर्वी जनजागृती करण्यात आली होती. मात्र, ज्यांना अ‍ॅपबद्दल माहिती नाही, ते नागरिक थेट तोंडी किंवा लेखी तक्रार देत आहेत. त्यांच्या तक्रारीचे निरसन केले जात आहे. डिजिटल माध्यमातून तक्रारीचा हा उपक्रम फोल ठरला आहे. शहर स्वच्छ ठेवण्याचा सोपा उपाय अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांना मिळाला होता. मात्र, अ‍ॅपच बंद असल्यामुळे स्वच्छ सर्वेक्षण उद्देश असफल ठरत आहे. त्यामुळे ही तांत्रिक अडचण दूर करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानkolhapurकोल्हापूर