शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपूर रस्ता हस्तांतरणाचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : गेली साडेचार महिने बहुचर्चित राहिलेला कोल्हापूर-सांगली महामार्ग हस्तांतरणाचा विषय आज, सोमवारी पालिकेच्या विशेष सभेत होत आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे बंद दारू दुकाने पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी दोन महिन्यांपूर्वी या मार्गावरील मिळकतधारकांनी रस्ता हस्तांतरण करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी पालिकेकडे केली होती. रस्ता ...

लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : गेली साडेचार महिने बहुचर्चित राहिलेला कोल्हापूर-सांगली महामार्ग हस्तांतरणाचा विषय आज, सोमवारी पालिकेच्या विशेष सभेत होत आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे बंद दारू दुकाने पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी दोन महिन्यांपूर्वी या मार्गावरील मिळकतधारकांनी रस्ता हस्तांतरण करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी पालिकेकडे केली होती. रस्ता हस्तांतरण झाल्यास त्याच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च पालिकेला पेलवणार का? हा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शहरातील दारू दुकाने बंद झाली आहेत. शहरातून जाणारा सांगली-कोल्हापूर महामार्गावर बहुसंख्य दारू दुकाने होती. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दारू दुकाने सुरू करण्यासाठी रस्ता हस्तांतरणाचा प्रश्न पुढे आला होता. अर्थकारण व राजकीय घडामोडीतून हा रस्ता नगरपालिकेकडे हस्तांतरण करण्यात यावा, यासाठी लोकप्रतिनिधींना साकडे घालण्यात आले होते. सामाजिक संघटनांमधून रस्ता हस्तांतरणाला मोठा विरोध झाला होता. विरोधानंतर रस्ता हस्तांतरणाचा विषय बाजूला पडला. शहरातील विना परवाना दारू विक्री बंद करावी, अशी मागणी शाहू आघाडीने नगराध्यक्षा डॉ. निता माने यांच्याकडे केली आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालामुळे दारू दुकानदारांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे रस्ता हस्तांतरणाचा विषय दारू दुकानदारांसाठी महत्त्वाचा राहिला नसला तरी न्यायालयाच्या निर्णयाबाबत शासनाने अद्याप कोणतेही आदेश दिलेनसल्यामुळे दारू दुकाने सुरू करण्याचा मार्ग अद्याप मोकळा झालेला नाही. अशा परिस्थितीत आज, सोमवारी पालिकेच्या विशेष सभेत कोल्हापूर-सांगली रस्ता हस्तांतरणाचा विषय होत आहे. दरम्यान, १८ आॅगस्ट रोजी रस्ता हस्तांतरणाबाबत पालिकेकडे आठ नगरसेवकांनी दिलेल्या अर्जानुसार रस्ता हस्तांतरणाचा विषय अजेंड्यावर आला आहे.पालिकेपुढे समस्याकोल्हापूर-सांगली रस्ता हस्तांतरणावरून पालिकेची सभा होत असली तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या या महामार्गाचे चौपदरीकरणांतर्गत काम रखडलेले आहे. पालिकेच्या आर्थिक दृष्टिकोनातून भविष्यात या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचा खर्चदेखील महत्त्वाचा आहे. याचाही विचार लोकप्रतिनिधींनी करण्याची गरज आहे. शिरोळ - वाडी रोड हस्तांतरणापूर्वी कन्यागतच्या निधीतून सुमारे एक कोटी रुपये खर्चाचा रस्ता पूर्ण झाला होता. सतराव्या गल्लीतील रस्ता प्रश्नावरून दोन माजी नगराध्यक्षांनी आंदोलनही केले होते. हा प्रश्नदेखील अद्याप सुटलेलानाही.मिळकतधारकांचा प्रश्नजयसिंगपूर-शिरोळ-वाडी रोडप्रमाणे सांगली-कोल्हापूर दोन जिल्ह्यांना जोडणारा शहरातील राज्य मार्ग नगरपालिकेकडे हस्तांतरित करावा, अशी म् ाागणी या मार्गावरील मिळकतधारकांनी नगराध्यक्षा डॉ. नीता माने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. जयसिंगपूरमधील हा रस्ता हस्तांतर करा, अन्यथा वडिलोपार्जित आमची जागा रस्त्यात वर्ग होईल, असे साकडे पालिकेला घालण्यात आले आहे.