शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

जयसिंगपूर रस्ता हस्तांतरणाचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : गेली साडेचार महिने बहुचर्चित राहिलेला कोल्हापूर-सांगली महामार्ग हस्तांतरणाचा विषय आज, सोमवारी पालिकेच्या विशेष सभेत होत आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे बंद दारू दुकाने पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी दोन महिन्यांपूर्वी या मार्गावरील मिळकतधारकांनी रस्ता हस्तांतरण करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी पालिकेकडे केली होती. रस्ता ...

लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : गेली साडेचार महिने बहुचर्चित राहिलेला कोल्हापूर-सांगली महामार्ग हस्तांतरणाचा विषय आज, सोमवारी पालिकेच्या विशेष सभेत होत आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे बंद दारू दुकाने पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी दोन महिन्यांपूर्वी या मार्गावरील मिळकतधारकांनी रस्ता हस्तांतरण करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी पालिकेकडे केली होती. रस्ता हस्तांतरण झाल्यास त्याच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च पालिकेला पेलवणार का? हा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शहरातील दारू दुकाने बंद झाली आहेत. शहरातून जाणारा सांगली-कोल्हापूर महामार्गावर बहुसंख्य दारू दुकाने होती. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दारू दुकाने सुरू करण्यासाठी रस्ता हस्तांतरणाचा प्रश्न पुढे आला होता. अर्थकारण व राजकीय घडामोडीतून हा रस्ता नगरपालिकेकडे हस्तांतरण करण्यात यावा, यासाठी लोकप्रतिनिधींना साकडे घालण्यात आले होते. सामाजिक संघटनांमधून रस्ता हस्तांतरणाला मोठा विरोध झाला होता. विरोधानंतर रस्ता हस्तांतरणाचा विषय बाजूला पडला. शहरातील विना परवाना दारू विक्री बंद करावी, अशी मागणी शाहू आघाडीने नगराध्यक्षा डॉ. निता माने यांच्याकडे केली आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालामुळे दारू दुकानदारांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे रस्ता हस्तांतरणाचा विषय दारू दुकानदारांसाठी महत्त्वाचा राहिला नसला तरी न्यायालयाच्या निर्णयाबाबत शासनाने अद्याप कोणतेही आदेश दिलेनसल्यामुळे दारू दुकाने सुरू करण्याचा मार्ग अद्याप मोकळा झालेला नाही. अशा परिस्थितीत आज, सोमवारी पालिकेच्या विशेष सभेत कोल्हापूर-सांगली रस्ता हस्तांतरणाचा विषय होत आहे. दरम्यान, १८ आॅगस्ट रोजी रस्ता हस्तांतरणाबाबत पालिकेकडे आठ नगरसेवकांनी दिलेल्या अर्जानुसार रस्ता हस्तांतरणाचा विषय अजेंड्यावर आला आहे.पालिकेपुढे समस्याकोल्हापूर-सांगली रस्ता हस्तांतरणावरून पालिकेची सभा होत असली तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या या महामार्गाचे चौपदरीकरणांतर्गत काम रखडलेले आहे. पालिकेच्या आर्थिक दृष्टिकोनातून भविष्यात या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचा खर्चदेखील महत्त्वाचा आहे. याचाही विचार लोकप्रतिनिधींनी करण्याची गरज आहे. शिरोळ - वाडी रोड हस्तांतरणापूर्वी कन्यागतच्या निधीतून सुमारे एक कोटी रुपये खर्चाचा रस्ता पूर्ण झाला होता. सतराव्या गल्लीतील रस्ता प्रश्नावरून दोन माजी नगराध्यक्षांनी आंदोलनही केले होते. हा प्रश्नदेखील अद्याप सुटलेलानाही.मिळकतधारकांचा प्रश्नजयसिंगपूर-शिरोळ-वाडी रोडप्रमाणे सांगली-कोल्हापूर दोन जिल्ह्यांना जोडणारा शहरातील राज्य मार्ग नगरपालिकेकडे हस्तांतरित करावा, अशी म् ाागणी या मार्गावरील मिळकतधारकांनी नगराध्यक्षा डॉ. नीता माने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. जयसिंगपूरमधील हा रस्ता हस्तांतर करा, अन्यथा वडिलोपार्जित आमची जागा रस्त्यात वर्ग होईल, असे साकडे पालिकेला घालण्यात आले आहे.