शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ठरल्याप्रमाणे जयंती नाला पंचगंगेत

By admin | Updated: February 16, 2015 00:21 IST

पंचगंगा प्रदूषण प्रश्न : सुरुवातीस २४ दशलक्ष पाणी पंचगंगेत मिसळणार; ५० टक्के उपसा बंद

कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) पूर्ण क्षमतेने सुरू होणे गरजेचे आहे. आयुक्त पी. शिवशंकर यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे पाईपलाईनचे काम करण्यासाठी रविवारपासून जयंती नाला पंचगंगेत सोडण्यास सुरुवात झाली. नाल्यातील उपसा निम्म्यावर आणल्याने दिवसभरात तब्बल २४ एमएलडी (दशलक्ष लिटर) दूषित पाणी पंचगंगेत मिसळले. दरम्यान, सकाळी दहा वाजल्यापासून पाईपलाईन टाकण्याच्या कामास युद्धपातळीवर सुरुवात झाल्याचे जलअभियंता मनिष पवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कसबा बावडा एसटीपी केंद्र ३१ मार्चपर्यंत कोणत्याही स्थितीत सुरू करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिका आयुक्तांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. त्यामुळे महापालिकेला एसटीपी सुरू करण्याशिवाय गत्यंतर नाही. एसटीपी सुरू होण्यासाठी पूर्वेकडील शेतातून नदीपर्यंत जाणारी दीड किलोमीटरपैकी रखडलेली ७५० मीटरची पाईपलाईन पूर्ण करणे गरजेचे आहे. काळ्या व भुसभुशीत शेतीच्या जमिनीवरूनच एसटीपीचे पाणी वाहत असल्याने हे काम करण्यासाठी एसटीपी काही दिवस बंद ठेवण्याशिवाय गत्यंतर नाही. याकामी आयुक्तांनी पुढाकार घेत एमपीसीबी व याचिकाकर्ते यांची समन्वय बैठक घेतली. त्यानुसार तीन आठवडे जयंती नाल्याचे पाणी पंचगंगेत सोडण्याचे ठरले. त्यानुसार रविवारी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून महापालिकेने एसटीपी केंद्र बंद केले. मात्र, रखडलेल्या ७५० मीटरपैकी ६५० मीटरचे काम होईपर्यंत जुना एसटीपी सुरू राहणार आहे. उर्वरित १०० मीटरचे काम पूर्ण करण्यासाठीच चार दिवसांसाठी दोन्ही एसटीपी बंद करावे लागणार आहेत.शुद्धतेसाठी प्रयत्ननाल्यातून दररोज किमान ४८ एमएलडी सांडपाण्याचा उपसा होतो. नाल्यातील पाणी कमी करण्यासाठी महापालिकेने नाल्याशेजारी असणाऱ्या सर्व सर्व्हिसिंग सेंटरना बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत, तसेच दूषित पाण्याची तीव्रता कमी करण्यासाठी शुद्धता (क्लोरिनेशन)के ली जात असल्याचे मनिष पवार यांनी स्पष्ट केले.