शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

ठरल्याप्रमाणे जयंती नाला पंचगंगेत

By admin | Updated: February 16, 2015 00:21 IST

पंचगंगा प्रदूषण प्रश्न : सुरुवातीस २४ दशलक्ष पाणी पंचगंगेत मिसळणार; ५० टक्के उपसा बंद

कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) पूर्ण क्षमतेने सुरू होणे गरजेचे आहे. आयुक्त पी. शिवशंकर यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे पाईपलाईनचे काम करण्यासाठी रविवारपासून जयंती नाला पंचगंगेत सोडण्यास सुरुवात झाली. नाल्यातील उपसा निम्म्यावर आणल्याने दिवसभरात तब्बल २४ एमएलडी (दशलक्ष लिटर) दूषित पाणी पंचगंगेत मिसळले. दरम्यान, सकाळी दहा वाजल्यापासून पाईपलाईन टाकण्याच्या कामास युद्धपातळीवर सुरुवात झाल्याचे जलअभियंता मनिष पवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कसबा बावडा एसटीपी केंद्र ३१ मार्चपर्यंत कोणत्याही स्थितीत सुरू करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिका आयुक्तांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. त्यामुळे महापालिकेला एसटीपी सुरू करण्याशिवाय गत्यंतर नाही. एसटीपी सुरू होण्यासाठी पूर्वेकडील शेतातून नदीपर्यंत जाणारी दीड किलोमीटरपैकी रखडलेली ७५० मीटरची पाईपलाईन पूर्ण करणे गरजेचे आहे. काळ्या व भुसभुशीत शेतीच्या जमिनीवरूनच एसटीपीचे पाणी वाहत असल्याने हे काम करण्यासाठी एसटीपी काही दिवस बंद ठेवण्याशिवाय गत्यंतर नाही. याकामी आयुक्तांनी पुढाकार घेत एमपीसीबी व याचिकाकर्ते यांची समन्वय बैठक घेतली. त्यानुसार तीन आठवडे जयंती नाल्याचे पाणी पंचगंगेत सोडण्याचे ठरले. त्यानुसार रविवारी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून महापालिकेने एसटीपी केंद्र बंद केले. मात्र, रखडलेल्या ७५० मीटरपैकी ६५० मीटरचे काम होईपर्यंत जुना एसटीपी सुरू राहणार आहे. उर्वरित १०० मीटरचे काम पूर्ण करण्यासाठीच चार दिवसांसाठी दोन्ही एसटीपी बंद करावे लागणार आहेत.शुद्धतेसाठी प्रयत्ननाल्यातून दररोज किमान ४८ एमएलडी सांडपाण्याचा उपसा होतो. नाल्यातील पाणी कमी करण्यासाठी महापालिकेने नाल्याशेजारी असणाऱ्या सर्व सर्व्हिसिंग सेंटरना बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत, तसेच दूषित पाण्याची तीव्रता कमी करण्यासाठी शुद्धता (क्लोरिनेशन)के ली जात असल्याचे मनिष पवार यांनी स्पष्ट केले.