शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ठरल्याप्रमाणे जयंती नाला पंचगंगेत

By admin | Updated: February 16, 2015 00:21 IST

पंचगंगा प्रदूषण प्रश्न : सुरुवातीस २४ दशलक्ष पाणी पंचगंगेत मिसळणार; ५० टक्के उपसा बंद

कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) पूर्ण क्षमतेने सुरू होणे गरजेचे आहे. आयुक्त पी. शिवशंकर यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे पाईपलाईनचे काम करण्यासाठी रविवारपासून जयंती नाला पंचगंगेत सोडण्यास सुरुवात झाली. नाल्यातील उपसा निम्म्यावर आणल्याने दिवसभरात तब्बल २४ एमएलडी (दशलक्ष लिटर) दूषित पाणी पंचगंगेत मिसळले. दरम्यान, सकाळी दहा वाजल्यापासून पाईपलाईन टाकण्याच्या कामास युद्धपातळीवर सुरुवात झाल्याचे जलअभियंता मनिष पवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कसबा बावडा एसटीपी केंद्र ३१ मार्चपर्यंत कोणत्याही स्थितीत सुरू करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिका आयुक्तांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. त्यामुळे महापालिकेला एसटीपी सुरू करण्याशिवाय गत्यंतर नाही. एसटीपी सुरू होण्यासाठी पूर्वेकडील शेतातून नदीपर्यंत जाणारी दीड किलोमीटरपैकी रखडलेली ७५० मीटरची पाईपलाईन पूर्ण करणे गरजेचे आहे. काळ्या व भुसभुशीत शेतीच्या जमिनीवरूनच एसटीपीचे पाणी वाहत असल्याने हे काम करण्यासाठी एसटीपी काही दिवस बंद ठेवण्याशिवाय गत्यंतर नाही. याकामी आयुक्तांनी पुढाकार घेत एमपीसीबी व याचिकाकर्ते यांची समन्वय बैठक घेतली. त्यानुसार तीन आठवडे जयंती नाल्याचे पाणी पंचगंगेत सोडण्याचे ठरले. त्यानुसार रविवारी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून महापालिकेने एसटीपी केंद्र बंद केले. मात्र, रखडलेल्या ७५० मीटरपैकी ६५० मीटरचे काम होईपर्यंत जुना एसटीपी सुरू राहणार आहे. उर्वरित १०० मीटरचे काम पूर्ण करण्यासाठीच चार दिवसांसाठी दोन्ही एसटीपी बंद करावे लागणार आहेत.शुद्धतेसाठी प्रयत्ननाल्यातून दररोज किमान ४८ एमएलडी सांडपाण्याचा उपसा होतो. नाल्यातील पाणी कमी करण्यासाठी महापालिकेने नाल्याशेजारी असणाऱ्या सर्व सर्व्हिसिंग सेंटरना बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत, तसेच दूषित पाण्याची तीव्रता कमी करण्यासाठी शुद्धता (क्लोरिनेशन)के ली जात असल्याचे मनिष पवार यांनी स्पष्ट केले.