शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

जत तालुक्यात केवळ दुष्काळी दौऱ्यांचा फार्स -: अद्यापही समस्या जैसे थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 01:08 IST

जत तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगार हमी योजनेची कामेही सुरू नसल्याने ऊस तोडणी मजुरांवर उपासमारीची वेळ

ठळक मुद्देजनावरांना पाणी, जादा टँकर, चारा छावणीचे प्रश्न कायम

गजानन पाटील ।संख : जत तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगार हमी योजनेची कामेही सुरू नसल्याने ऊस तोडणी मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.दुसºया बाजूला तालुक्यात मंत्री, विभागीय आयुक्तांचा दुष्काळी दौरा झाला असला तरी, उपाययोजना झाल्या नसल्याचेच चित्र आहे. दुष्काळी दौºयाचा केवळ फार्स केला असल्याचीच चर्चा आहे.

जत तालुक्यात खरीप व रब्बी दोन्ही हंगाम वाया गेले आहेत. नोव्हेंबर महिन्यापासूनच पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. सध्या ९१ गावांना व त्याखालील वाड्या-वस्त्यांंना टॅँकरने पाणीपुरवठा होत आहे.पाण्याची पातळी ८०० ते ९०० फुटापर्यंत खाली गेली आहे. द्राक्ष, डाळिंब बागा पाण्याअभावी वाळून गेल्या आहेत. पाण्याची पातळी खाली गेल्याने अशुद्ध, अपुरा, अनियमित पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठा करणारे बरेच टँकर गळके आहेत. त्यामधून पाण्याचा अपव्यय होत आहे. प्रशासनाकडून सूचना देऊनही पाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी टीसीएलचा वापर केला जात नाही.गेल्या आठवड्यात पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी व्हसपेठ येथे, दुग्धविकास व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी वायफळ, माडग्याळ, कुलाळवाडी, अंकलगी, संख, दरीबडची, मुचंडी येथे, तर केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उमदी या गावाचा दुष्काळी दौरा केला. त्यांनी दुष्काळग्रस्त ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी संवाद साधला.शेतकºयांनी संतप्त भावना व्यक्त करून, जनावरे मेल्यावर चारा छावण्या सुरू करणार काय? दुष्काळ मिटविण्यासाठी कधी उपाययोजना करणार? असे प्रश्न त्यांंना विचारले. पण मंत्र्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत.पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी माडग्याळ, व्हसपेठ या गावांचा दौरा केला व सिद्धनाथ येथील तलावांची पाहणी केली. चारा छावणीतील जाचक अटी, वेळेवर बिले न मिळणे, आधीच्या चारा छावणी चालकांवर दाखल झालेले गुन्हे यामुळे संस्था पुढे येत नाहीत. त्यामुळे पुरेशा प्रमाणात चारा छावण्या सुरू नाहीत. सध्या पाच छावण्या सुरू आहेत. चारा छावणीसाठी प्रस्ताव न येण्यास प्रशासनच जबाबदार आहे.प्रशासनाला गांभीर्य नाहीदुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्याची गरज असताना, मंत्री व प्रशासकीय अधिकारी पाहणी करण्यातच वेळ घालवत आहेत. दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. रोजगार हमीच्या कामाचा पत्ता नाही. दुष्काळामुळे अनेकांच्या हाताला काम नाही. कामे बंद आहेत. असे असतानाही तालुक्यात नवीन रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यासाठी प्रशासन लक्ष देत नाही. प्रशासनाला दुष्काळाचे गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही.

 

टॅग्स :Sangliसांगलीgovernment schemeसरकारी योजना