शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
5
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
6
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
7
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
8
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
9
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
10
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
11
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
12
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
13
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
15
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
16
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
17
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
18
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
19
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
20
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र

जत तालुक्यात केवळ दुष्काळी दौऱ्यांचा फार्स -: अद्यापही समस्या जैसे थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 01:08 IST

जत तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगार हमी योजनेची कामेही सुरू नसल्याने ऊस तोडणी मजुरांवर उपासमारीची वेळ

ठळक मुद्देजनावरांना पाणी, जादा टँकर, चारा छावणीचे प्रश्न कायम

गजानन पाटील ।संख : जत तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगार हमी योजनेची कामेही सुरू नसल्याने ऊस तोडणी मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.दुसºया बाजूला तालुक्यात मंत्री, विभागीय आयुक्तांचा दुष्काळी दौरा झाला असला तरी, उपाययोजना झाल्या नसल्याचेच चित्र आहे. दुष्काळी दौºयाचा केवळ फार्स केला असल्याचीच चर्चा आहे.

जत तालुक्यात खरीप व रब्बी दोन्ही हंगाम वाया गेले आहेत. नोव्हेंबर महिन्यापासूनच पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. सध्या ९१ गावांना व त्याखालील वाड्या-वस्त्यांंना टॅँकरने पाणीपुरवठा होत आहे.पाण्याची पातळी ८०० ते ९०० फुटापर्यंत खाली गेली आहे. द्राक्ष, डाळिंब बागा पाण्याअभावी वाळून गेल्या आहेत. पाण्याची पातळी खाली गेल्याने अशुद्ध, अपुरा, अनियमित पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठा करणारे बरेच टँकर गळके आहेत. त्यामधून पाण्याचा अपव्यय होत आहे. प्रशासनाकडून सूचना देऊनही पाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी टीसीएलचा वापर केला जात नाही.गेल्या आठवड्यात पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी व्हसपेठ येथे, दुग्धविकास व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी वायफळ, माडग्याळ, कुलाळवाडी, अंकलगी, संख, दरीबडची, मुचंडी येथे, तर केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उमदी या गावाचा दुष्काळी दौरा केला. त्यांनी दुष्काळग्रस्त ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी संवाद साधला.शेतकºयांनी संतप्त भावना व्यक्त करून, जनावरे मेल्यावर चारा छावण्या सुरू करणार काय? दुष्काळ मिटविण्यासाठी कधी उपाययोजना करणार? असे प्रश्न त्यांंना विचारले. पण मंत्र्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत.पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी माडग्याळ, व्हसपेठ या गावांचा दौरा केला व सिद्धनाथ येथील तलावांची पाहणी केली. चारा छावणीतील जाचक अटी, वेळेवर बिले न मिळणे, आधीच्या चारा छावणी चालकांवर दाखल झालेले गुन्हे यामुळे संस्था पुढे येत नाहीत. त्यामुळे पुरेशा प्रमाणात चारा छावण्या सुरू नाहीत. सध्या पाच छावण्या सुरू आहेत. चारा छावणीसाठी प्रस्ताव न येण्यास प्रशासनच जबाबदार आहे.प्रशासनाला गांभीर्य नाहीदुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्याची गरज असताना, मंत्री व प्रशासकीय अधिकारी पाहणी करण्यातच वेळ घालवत आहेत. दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. रोजगार हमीच्या कामाचा पत्ता नाही. दुष्काळामुळे अनेकांच्या हाताला काम नाही. कामे बंद आहेत. असे असतानाही तालुक्यात नवीन रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यासाठी प्रशासन लक्ष देत नाही. प्रशासनाला दुष्काळाचे गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही.

 

टॅग्स :Sangliसांगलीgovernment schemeसरकारी योजना