शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

जयसिंगपुरात इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग!

By admin | Updated: July 23, 2016 00:05 IST

नगरपालिका निवडणुकीचे रणशिंग : ‘बाहेरून शह अन् आतून तह’वरच लक्ष; आजी-माजी नगरसेवक रिंगणात उतरणार

जयसिंगपूर : आगामी पालिका निवडणुकीसाठी जयसिंगपुरात मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. नगरपालिकेच्या २४ जागांसाठी निवडणूक होणार असून, आजी-माजी नगरसेवक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. या ‘निवडणुकीचे रणशिंग अन् गुडघ्याला बाशिंग’ बांधणारे बाहेरून शह आतून तह करणार काय? याबरोबरच दोन्ही काँग्रेसची आघाडी व स्वाभिमानी, भाजप, महाडिक गट, शिवसेना समोरासमोर उभे ठाकणार का? या चर्चेने मात्र सध्या जयसिंगपूर शहरात राजकीय वातावरण गरमागरम झाले आहे. सन २०११च्या जनगणनेनुसार जयसिंगपूर शहराची लोकसंख्या ४८ हजारांच्या आसपास आहे. चार हजार लोकसंख्या गृहीत धरून १२ प्रभाग करण्यात आले आहेत. प्रभागनिहाय आरक्षणदेखील निश्चित झाले आहे. सध्या पालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. केंद्र व राज्यात भाजप व शिवसेना पक्ष सत्तेत असल्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीत द्विसदस्यीय प्रभागरचना आणि थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड हा पॅटर्न नगरपालिका निवडणुकीत राबविला जाणार आहे. विधान परिषदेनंतर जिल्ह्यात महाडिक पॅटर्न नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा ‘एंट्री’ करणार आहे. एकहाती सत्तेमुळे सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना यांनी स्वबळावर निवडणुका लढविण्याची घोषणा केली आहे, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नसली तरी महाडिक गट भाजपबरोबर आघाडी बांधण्याच्या तयारीत असल्याचे समजते. लवकरच ही आघाडी मूर्त स्वरूप घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. आरक्षणानंतर आजी-माजी नगरसेवकांनी तयारी सुरू केली आहे. सत्ताधारी आघाडीकडे सध्या इच्छुकांची संख्या मोठी दिसून येत आहे. यामुळे नेत्यांसमोर निवडणुकीवेळी पेच निर्माण होणार आहे. एकूणच आरक्षणानंतर आजी-माजी नगरसेवकांनी सुरू केलेली मोर्चेबांधणी आणि आघाड्या कशा असणार? याचीच चर्चा सध्या शहरात सुरू आहे. (प्रतिनिधी)आघाड्यांकडे लक्षनुकत्याच झालेल्या जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेससह, राष्ट्रवादी, स्वाभिमानी, शिवसेना, बहुजन विकास आघाडी यांनी मोट बांधून भाजपला सत्तेपासून रोखले.बाजार समितीच्या निवडणुकीत हे प्रमुख पक्ष एकत्र आले असले तरी नगरपालिकेच्या निवडणुकीत राजकीय चित्र वेगळे असणार आहे. शह, काटशहच्या राजकारणात कोण बाजी मारणार? याकडे जयसिंगपूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे.