शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

जातपडताळणीच्या जिल्हास्तरीय समितीचा ‘फार्स’

By admin | Updated: April 7, 2015 01:23 IST

महसूल अधिकाऱ्यांची सोय : रिक्त पदांमुळे लाखाहून अधिक दाखले प्रलंबित

संतोष पाटील - कोल्हापूर -राज्यभरातील १५ विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालये विसर्जित करून त्याऐवजी ३५ ठिकाणी नव्याने जिल्हास्तरीय कार्यालये सुरू करण्याचा संकल्प शासनाने ३ मार्च २०१५ रोजी केला. यासाठी आवश्यक पदनिर्मितीची जोडणी न झाल्याने पुढील आदेशापर्यंत जिल्हास्तरीय समित्यांचा निर्णय राखून ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सध्या १५ पैकी ७ ठिकाणी समिती अध्यक्ष, तर तीन ठिकाणी सचिव नसल्याने लाखाहून अधिक दाखले प्रलंबित आहेत. यासाठी प्रयत्न न करता महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या सोयीसाठीच जिल्हास्तरीय समितीचा ‘फार्स’ असल्याची चर्चा समाजकल्याण विभागात सुरू आहे.सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने २ मार्च २०१५ रोजी प्रत्येक जिल्हास्तरीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक उपजिल्हाधिकारी दर्जाचा समिती अध्यक्ष, ‘बार्टी’चे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अ‍ॅँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) उपायुक्त दर्जाचे एक समिती सचिव व जिल्हा समाजकल्याण अधिकारी दर्जाचा समिती सदस्य अशी वरिष्ठ स्तरावरील पदांची गरज आहे. तसेच प्रत्येक नव्या कार्यालयात किमान ३३ ते ४० कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. याव्यतिरिक्त कार्यालयासाठी आवश्यक आस्थापना यंत्रणा उभी करावी लागणार आहे. यासाठी अवधी असल्याने जिल्हास्तरीय समित्यांचा निर्णय पुढील आदेशापर्यंत प्रलंबित ठेवण्याचे आदेश (शासन निर्णय २०४/प्र.क्र. २१७/आस्था-२) २६ मार्चला ‘सामाजिक न्याय’चे प्रधान सचिव उज्ज्वल उके यांनी जारी केला आहे. प्रचलित पद्धतीनेच जातपडताळणीचे काम सुरू ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. ‘बार्टी’ने यापूर्वी २०१२ साली २४ समित्या स्थापन करा, अध्यक्ष व समिती सदस्यांची रिक्त पदे भरा, १५पैकी किमान ७ जागांवर अध्यक्षपदी ‘बार्टी’च्या उपायुक्तांना संधी द्या, अशी मागणी शासनाकडे केली आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करीत ‘महसूल’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोयीसाठीच जिल्हास्तरीय समित्यांची उठाठेव असल्याची चर्चा ‘बार्टी’त आहे. 'महसूल'मुळे दाखले पडताळणीला खोजातपडताळणी समिती अध्यक्षपदी महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक होते. चार ते सहा महिने अध्यक्षपद सांभाळून सोयीची नेमणूक होताच हे अधिकारी गायब होत असल्याचे चित्र आहे. ‘महसूल’च्या सोयीच्या भूमिकेमुळेच दाखले पडताळणीला खो बसत असल्याचा आरोप होत आहे.राज्यात सव्वा लाख प्रकरणे प्रलंबितराज्यात जातपडताळणीची सव्वा लाख प्रकरणे प्रलंबित आहेत. यातील ७० टक्के प्रकरणे कोल्हापूर, नाशिक, अकोला, धुळे या चार विभागांतील आहेत. १५ विभागीय समित्यांपैकी सात ठिकाणी अध्यक्ष, तीन समिती सचिव व चार सदस्य नाहीत. याची ‘बार्टी’ने मागणी करूनही पूर्तता झालेली नाही.