शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

खताच्या दरवाढीविरोधात जनसुराज्य रस्त्यावर उतरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:25 IST

केंद्र सरकारच्या धोरणामुळे गेल्या सहा वर्षांत शेती मालाला योग्य भाव मिळत नाही. मात्र, रासायनिक खतांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. ...

केंद्र सरकारच्या धोरणामुळे गेल्या सहा वर्षांत शेती मालाला योग्य भाव मिळत नाही. मात्र, रासायनिक खतांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. उद्योगधंदे कोलमडले आहेत, नोकर भरती बंद आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढत चालली आहे, जीवनावश्यक वस्तूंची प्रचंड महागाई वाढत आहे.

यात जनता, शेतकरी, तरुण वर्ग होरपळत असताना केंद्र सरकार ३७० कलम रद्द केले, पुलवामा स्ट्राइक, राममंदिर अशा प्रश्नांकडे लक्ष वेधून देशातील जनतेच्या रोजीरोटीकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जनतेत असंतोष पसरला आहे, असे विजयसिंह जाधव यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाच्या किमती कमी असताना देखील सहा वर्षांत पेट्रोल, डिझेलच्या किमतीत आजपर्यंत पंचवीस रु.पर्यंत वाढ झाली. तेलाच्या किमतीच्या तुलनेत जीवनावशक वस्तूंचे दर किती वाढले, खतांचे दर तर पाचशे ते हजार रु.पर्यंत वाढले. शेतकऱ्यांच्या शेती मालाचा भाव व जोडधंदा असणाऱ्या दूध व्यवसायाचा उत्पादकांना मिळणाऱ्या दरात पाच-सहा वर्षांत कोणतीच अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे केंद्राच्या धोरणाने सामान्य माणूस व शेतकरी, मजूर, बेरोजगार भरडला जात असून त्यांना न्याय मिळावा यासाठी शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न बनलेल्या खत दरवाढीविरोधात जनसुराज्य शक्ती पक्ष रस्त्यावर उतरणार असल्याचे विजयसिंह जाधव यांनी सांगितले.