शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

जलसमाधी आंदोलन : कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 13:13 IST

कोल्हापूर : एसटी महामंडळ सरकारमध्ये विलीन करावे, यासाठी कोल्हापुरात आज, सकाळी पंचगंगा घाटावर एसटी कर्मचारी जलसमाधी आंदोलन करणार होते. ...

कोल्हापूर : एसटी महामंडळ सरकारमध्ये विलीन करावे, यासाठी कोल्हापुरात आज, सकाळी पंचगंगा घाटावर एसटी कर्मचारी जलसमाधी आंदोलन करणार होते. मात्र, जलसमाधी घेण्यास निघालेल्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतले. आंदोलनाचा १२ वा दिवस उजाडला तरीही सरकारकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे कोल्हापुरातील एसटी कर्मचारी संतप्त झाले असून हे आंदोलन अधिक तीव्र होतानाचे चित्र दिसत आहे.तर दुसरीकडे सरकारकडून या प्रश्नी मार्ग काढण्यासाठी एसटी महामंडळ केपीएमजी संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे. सरकारकडून अनेक बैठकांच्या फेऱ्या झाल्या मात्र कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. तर एसटी कर्मचारी आपल्या मागण्यावर ठाम आहेत. प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना वेळोवेळी कामावर हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र काही कर्मचारीच कामावर हजर झाले. यामुळे आंदोलनात फूट पडली. याचे पडसाद अनेक ठिकाणी दिसून आले. राज्यात अनेक ठिकाणी एसटीवर दगडफेक तर कर्मचाऱ्यास मारहाण झाल्याच्या घटनाही घडल्या.कोल्हापूर येथील मध्यवर्ती बसस्थानकात १२ व्या दिवशीही कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरूच ठेवले. तरीही सरकार मागण्यांकडे दुर्लक्षच करीत राहिल्याने त्यांच्यात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. यातूनच त्यांनी जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्धार केला. मात्र पोलिसांनी वेळीच सावध होत आंदोलन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले.दरम्यान, एसटी प्रशासन रोजंदारी कर्मचाऱ्यांना घेऊन एसटी सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहे. कुरुंदवाड, गगनबावडा, गडहिंग्लज आगारातून प्रत्येकी एक बस विविध मार्गावर सोडली. प्रशासन रोजंदारीच्या कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या नोटिसा देऊन कामावर रूजू होण्यास भाग पाडत आहे. पण त्यास इतर कर्मचारी विरोध करीत आहेत. यामुळे रोजंदारी कर्मचाऱ्यांची अडचण होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरST Strikeएसटी संप