शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान वाशीची जळ यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:23 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे वाशी येथील बिरदेवाचे तीर्थक्षेत्र सुप्रसिद्ध आहे. कोल्हापूर शहराच्या पश्चिमेस साधारणत: नऊ किलोमीटर अंतरावर वाशी गाव आहे. ...

कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे वाशी येथील बिरदेवाचे तीर्थक्षेत्र सुप्रसिद्ध आहे. कोल्हापूर शहराच्या पश्चिमेस साधारणत: नऊ किलोमीटर अंतरावर वाशी गाव आहे. सुंदर अशी दगडी कमान भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. समोरच दीपस्तंभ, पठाराच्या सभोवार विविध वृक्ष भाविकांना गारवा देत वर्षानुवर्षे उभे आहेत.

येथील श्री बिरदेवाचे मूळस्थान कर्नाटक राज्यातील 'अलकनूर' या गावी आहे. त्यांना बादशहा त्रास देत होता. असे असताना पूर्ण वाशी गावावर अंधारी पडली. बादशहाने सेवकांना बोलावून अंधारी का पडली, याचा शोध घेण्यासाठी दोन धनगरांना बोलावले व त्यांना सांगितले की, आमच्या गावावर आलेले संकट हे तुम्ही दूर केले पाहिजे. बादशहाने दिलेल्या आदेशाचे पालन म्हणून धनगरांनी सिद्धपुरुषांचा शोध सुरू केला. शोध करता-करता हळदी-कांडगावच्या रानामध्ये भादोलेचा 'धुळसिद्ध' नावाच्या सिद्धपुरुषाचा सुगावा लागला.

त्यांची भेट घेऊन वृत्तांत कथन केला. धुळसिद्धला पाहून बादशहासह दरबार हसला आणि त्यांची चेष्टा करू लागला. यानंतर बादशहाने धुळसिद्धाची परीक्षा घेण्यासाठी मादी घोडी आणली व घोडीच्या पोटातील शिंगराचे वर्णन करावयास सांगितले. वर्णनाची सत्यता पाहण्यासाठी बादशहाने धुळसिद्धांना आदेश दिला की, घोडीचे पोट कापून शिंगरू बाहेर काढावे आणि ते जसे होते तसे पुन्हा पोटामध्ये घालून घोडी जिवंत करावी. बादशहाचे आव्हान धुळसिद्धांनी स्वीकारले आणि भंडाऱ्याची मूठ घोडीच्या पोटावर मारून बादशहाला पोटातील शिंगरुचे वर्णन सांगितले. घोडीचे पोट कापून शिंगरू बाहेर काढले असता धुळसिद्धांनी सांगितलेले वर्णन हुबेहूब तसेच होते. त्यानंतर धुळसिद्धांनी शिंगरू पुन्हा घोडीच्या पोटात घालून त्याच्यावर भंडाऱ्याची मूठ मारली तेव्हा कापलेली घोडी पुन्हा जिवंत झाली. धुळसिद्धांचे हे सामर्थ्य पाहून बादशहा अचंबित झाला.

धुळसिद्धांनी बादशहाला सांगितले, माझा देह जळाच्या पाण्यात आहे. त्यास बाहेर काढण्यासाठी तू मला मदत केली पाहिजेस. बादशहाने सर्व प्रकारची मदत देण्याचे वचन धुळसिद्धांना दिले. या दोघा धनगरांकडे ती जबाबदारी सोपविली. त्यानंतर धुळसिद्धांनी आपल्या सामर्थ्याने ढोल, दमाम, छत्री, साशान दिवट्याचे भार लावून -भंडाऱ्याच्या उधळणीसह पूजा-अर्चा करून वाशीजवळच्या डोहामध्ये प्रवेश केला. डोहातून श्री बिरदेवाचे प्रतीक असलेली आत्मलिंग गुंडी बाहेर काढून त्याची स्थापना वाशीच्या पठारावर असलेल्या कारीखुटाला (करबंदीचे झाड) व लेंक्यांचा ढिगाऱ्यात केली.

त्यानंतर बिरदेव घुळसिद्धावर प्रसन्न झाले. त्यांनी वाशी गावी स्थायिक होण्यास सांगितले. तू माझ्या भेटीला वाशीला दरवर्षी येत जा. मी तुझ्या भेटीला दर तीन वर्षांनी येत जाईन, असा वर दिला, अशी आख्यायिका सांगितली जाते. ही जळ यात्रा तीन वर्षांनी येते. बिरदेव मंदिराचा जीर्णोद्वार करण्यासाठी बादशहाच्या महालाचे नऊ दगडी खांब या ठिकाणी आणून त्याच्याआधारे 'श्रीं चे मंदिर उभारले गेले. ते खांब अद्यापही जसेच्या तसे आहेत म्हणून या ठिकाणी बसणाऱ्याने खोटे बोलू नये, असा संकेत आहेत. याची जपणूक आजही येथील धनगर समाजबांधव करत आले आहेत. या आख्यायिकेचा विचार करता हे मंदिर बादशाहीच्या अस्तानंतर स्थापले आहे, अशी येथील धारणा आहे; परंतु यासंदर्भात लिखित कागदोपत्री पुरावा मिळत. रोज पहाटे ५.३० ते ६.३० या वेळेत

अभिषेक, स्नान होऊन देवाची आरती होते. बिरदेवाचा जन्मकाळ वैशाखमध्ये चतुर्थीला मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

यात्रा दरवर्षी फाल्गुन शुद्ध द्वितीयेला भरते. दर तीन वर्षांनी होणारी यात्रा ही जळ यात्रा म्हणून मोठ्या उत्साहाने महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, गोवा या राज्यांतील भक्ताच्या उपस्थितीत पार पडते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत यात्रा पार पडते आहे.

....

बबन रानगे

सरसेनापती मल्हार सेना

फोटो कॅप्शन

परंपरागत सुरू असलेला कांडगाव (ता. करवीर) येथील नरके, मगदूम नाईक यांचा मानाचा गाडा बिरदेवाच्या भेटीसाठी भरदिवसा मशाल पेटवून जातो.