शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
2
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
3
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
4
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
5
रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
6
Operation Sindoor Live Updates: अमृतसरवरील ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारताने उधळला
7
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
8
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
9
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
10
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
11
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
12
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
13
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
14
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
15
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
16
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
17
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
18
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
19
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
20
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’

विश्वकल्याणासाठी जैन धर्म नेहमीच अग्रेसर

By admin | Updated: April 9, 2016 00:09 IST

विश्वरत्नसागर महाराज : कोल्हापुरात विशेष मांगलिक प्रवचन

कोल्हापूर : अहिंसा व शांतीचा संदेश देणारा जैन धर्म नेहमीच विश्वकल्याणासाठी अग्रेसर राहिला आहे, असे प्रतिपादन आचार्य विश्वरत्नसागर महाराज यांनी केले.आशापूरण पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघातर्फे शुक्रवारी येथील शुभंकरोती हॉल येथे विशेष मांगलिक प्रवचनाचे आयोजन केले होते. याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज व कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते पार्श्वनाथांचे प्रतिमापूजन झाले.आचार्य म्हणाले, भगवान महावीर यांनी २४०० वर्षांपूर्वी दिलेले उपदेश, संदेश आजच्या परिस्थितीत काळाची गरज बनले आहेत. कोणत्याही निर्मितीसाठी समर्पणाची भावना लागते. कल्याणाचा मार्ग समर्पणातच दडलेला असतो. तो समर्पणभाव जपला तर विश्वात शांती प्रस्थापित होईल. ज्यांच्या हृदयात शुद्ध प्रेम तसेच करुणा आहे, तेच आंतरिक स्वर्गीय सुखाचा अनुभव करू शकतात हा निसर्गनियम आहे. आपल्या आत्म्याप्रती असणारा भाव सर्व प्राणिमात्रांविषयी असू द्या. चेन्नई येथील चातुर्मास पूर्ण करून ११५० किलोमीटरचा पायी प्रवास करून आचार्य महाराज त्यांच्या शिष्यासह गुढीपाडव्यादिवशी प्रवचनासाठी कोल्हापूरला आले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक मंत्रपठण झाले. दरम्यान, जिरावला पार्श्वनाथ जैन ट्रस्ट मंडळातर्फे राजस्थानातील सिराही येथे ९ फेबु्रवारी २०१७ ला होणाऱ्या मंदिर उद्घाटनाचे ‘श्री संघ शाही अग्रीम निमंत्रण’ भाविकांना दिले. यावेळी मुंबई येथील गायक विनीत गेमावत यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला. यावेळी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील कलाकार ‘गोगी’ला भेटण्यासाठी मुलांची झुंबड उडाली होती. यावेळी संभवनाथ मंदिराचे नरेंद्र ओसवाल, आशापूरण पार्श्वनाथ मंदिराचे ललित गांधी, वासूपूज्य स्वामी मंदिराचे सुरेश राठोड, मुनिसुव्रत मंदिराचे कांतीलाल ओसवाल, अमर गांधी, जयेश ओसवाल, बिपीन परमार, जिरावला मंदिर ट्रस्ट राजस्थानचे रमेश मुथा, प्रकाश शहा, ललित संघवी, अभय गांधी, आदींसह परिसरातील जैन बांधव उपस्थित होते. दीपक ओसवाल यांनी सूत्रसंचलन केले. प्रवचनासाठी विटा, कऱ्हाड, इचलकरंजीसह चेन्नई, राजस्थान, गुजरात, कर्नाटक या राज्यांतील जैन बांधव आले होते. (प्रतिनिधी)