शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

जयसिंगपुरात पदवी प्रवेशाचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: July 10, 2015 00:01 IST

जादा तुकडीची गरज : विद्यार्थी प्रवेशापासून वंचित

जयसिंगपूर : पदवीच्या पहिल्या वर्षीच्या प्रवेशाचा प्रश्न जयसिंगपुरातही ऐरणीवर आला आहे. अनेक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांच्या पहिल्या वर्षाचा प्रवेश प्रश्न गंभीर बनला असून, जयसिंगपूर महाविद्यालयाने बी.एस्सी.च्या जादा तुकडीबरोबरच बी.ए., बी.कॉम.साठी जादा जागांच्या मंजुरीचा प्रस्ताव विद्यापीठाला पाठविला आहे. बारावी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जयसिंगपूर परिसरात एकमेव पदवीचे महाविद्यालय असून कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखेच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाकडे अर्ज दाखल केल्यानंतर गुणवत्ता यादीप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. मात्र, जागेपेक्षा मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. बी.एस्सी. भाग एकसाठी २४० जागा असून, जागांपेक्षा दुप्पट प्रवेश अर्ज दाखल झाल्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. जयसिंगपूर महाविद्यालयामध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी मोजकेच विषय असून, या परिसरातील विद्यार्थी दूरशिक्षण विभागाचा लाभ घेत आहेत. शेजारी असणाऱ्या सांगली व इचलकरंजी शहरांतील महाविद्यालयांतही हीच परिस्थिती आहे. यामुळे विद्यार्थ्यांची ‘ना घरका, ना घाटका’ अशी अवस्था बनली आहे. कुरुंदवाड येथेही कला, वाणिज्य व विज्ञानच्या शाखा असून, गेल्या वर्षीपासून विज्ञानाची नव्याने शाखा सुरू झाली आहे. मात्र, तेथेही प्रवेशाचा प्रश्न गंभीर आहे. (प्रतिनिधी)प्रस्ताव विद्यापीठाकडे सध्या शैक्षणिक गुणवत्ता वाढली असून, उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा कलही वाढतो आहे. त्यामुळे नव्या महाविद्यालयांना किंवा तुकड्या वाढविण्यास बंदी घातली जाणार नाही, अशी माहिती उच्च शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी नुकतीच कोल्हापूर येथे दिली होती. त्यानुसार जयसिंगपूर महाविद्यालयानेही बी.एस्सी. भाग एकसाठी वाढीव एक जादा तुकडी आणि बी.ए., बी.कॉम. भाग एकसाठी वाढीव जागा मंजुरीसाठी प्रस्ताव विद्यापीठाकडे पाठविला आहे. येथे नियमानुसारच प्रवेश सुरू झाले आहेत, अशी माहिती जयसिंगपूर महाविद्यालयाचे प्राचार्य एम. एम. गांधी यांनी दिली.