शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

जय स्वच्छता ! जय समृद्धी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 00:51 IST

खरं तर ‘स्वच्छता ही स्वातंत्र्याइतकीच महत्त्वाची आहे’ असं महात्मा गांधीजींना त्यावेळी का वाटत होतं, याची जाणीव आजची सद्य:परिस्थिती पाहिल्यानंतर शंभर टक्के होते.

- भारत पाटीलखरं तर ‘स्वच्छता ही स्वातंत्र्याइतकीच महत्त्वाची आहे’ असं महात्मा गांधीजींना त्यावेळी का वाटत होतं, याची जाणीव आजची सद्य:परिस्थिती पाहिल्यानंतर शंभर टक्के होते. अस्वच्छतेमुळे होणारे घातक दुष्परिणाम यामुळे आपण गावाचे बिघडलेले आरोग्य पाहतो. अत्यंत भयानक स्थिती पाहायला मिळते. स्वच्छता हा संस्कार आहे. शिस्तप्रिय जीवनशैलीचा भाग आहे. कोणत्याही समृद्ध गावांची, शहरांची व समाजाची विकासाची कल्पना करताना स्वच्छता हा विकासातील पहिला टप्पा आहे. स्वच्छतेशिवाय समृद्धी येऊच शकत नाही. यामध्ये घर स्वच्छता, परिसर स्वच्छता, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता, स्वच्छ पाणी, कचरा व सांडपाणी व्यवस्थापन, मलमूत्र व्यवस्थापन या बाबी खूप महत्त्वाच्या आहेत; परंतु आपण मात्र या गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहोत. आपलं घर आपण स्वच्छ आरशासारखं लख्ख ठेवतोे; पण बाहेर मात्र परिसर अगदी उकिरडा करतो. उघड्यावर मलमूत्र विसर्जन करणे, उघड्यावरील हागणदारी, कचरा कुठेही फेकणे, तंबाखू-गुटखा खाऊन कुठेही पिचकारी मारणे, बिडी, सिगारेट ओढून थोटके कुठेही फेकणे, तुंबलेली गटारे, साचलेले उकिरडे, प्लास्टिक व थर्माकोल यांचे ढीग असं आपल्या गावचं चित्र आपणच केलेलं आहे. घरात आपण असं कुठे पण कचरा फेकतो का? कुठेही थुंकतो का? आपण कचरा करावा, तो कुठेही फेकावा आणि तो दुसऱ्या कोणी तरी काढावा, अशीच सध्या आपल्या सर्वांची विकृत मानसिकता झाली आहे. यामुळे आपली गावं अस्वच्छ व उकिरड्यासारखी आपणच बनविली आहेत.

आपल्या गल्ल्या, तलाव, ओढे, खुल्या जागा म्हणजे कचरा व घाणीचे ढीग आपण केले आहेत. दुर्गंधी, घाणेरडा वास यामुळे गावांचे आरोग्य मात्र पूर्णपणे बिघडले आहे. गावांत रोगराई व विविध आजारांचे थैमान बघायला मिळते. अस्वच्छता व या घाणीच्या साम्राज्यातून जीवजंतू, जिवाणू-विषाणू, डास, माशा निर्माण होतात व आपले आरोग्य बिघडवितात. आपलं रक्त शोषून घेतात. आपली मुलं रोगी बनतात. आपलं आयुष्यमान कमी करतात. एखादी साथ आली की, घरोघरी आजारी पेशंट यामुळे दवाखान्यात रीघ लागलेली आपण पाहतो. कुपोषण, अ‍ॅनिमिया, साथीचे रोग यामध्ये हिवताप, मलेरिया, डेंग्यू, चिकनगुन्या, स्वाइन फ्लू, कावीळ, ताप, ज्वर, डायरिया अशा अनेक रोगांमुळे दरवर्षी लाखो लोक मरण पावतात. अगदी किड्यामुंगीसारखी माणसं आजारी पडतात व मरतात. जागतिक आरोग्य संघटना व ४ल्ल्र२ीा पण याबाबतीत आपणाला सतत मदत करीत आहे. जागतिक ह्युमन इंडेक्समध्ये आपला जगात १३२ वा नंबर आहे. तसं हे आपणाला न शोभणारं आहे.

मानवी जीवनमूल्यांच्या बाबतीत आपल्या गावात अजूनही कसलीही महिती नाही. आपली व आपल्या तरुण पिढीची प्रतिकारशक्ती हा अत्यंत चिंतेचा विषय बनला आहे. आपली पूर्वीची पिढी शंभर वर्षे जगत होती. मनाने, शरीराने मजबूत होती. आज कित्येक घरांतील तरणीताठी पोरंसुद्धा या भयानक आजारात मरण पावली आहेत. तरीदेखील आपण याविषयी गंभीर विचार व कृती करीत नाही. ही आपल्या आरोग्याच्या बाबतीत खूप काळजीची व दयनीय अवस्था आहे. संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपलं सगळं आयुष्य प्रबोधन करण्यात घालिवले. ‘जैसे आपण स्नान करावे। तैसेची निर्मल ग्राम ठेवावे’ हा संदेश त्यांनी आपणाला दिला. स्वच्छतेशिवाय आपणाला समृद्धी नाही, असंही गाडगेबाबांनी स्वत:च्या आचरणातून व कृतीतून समाजाचे प्रबोधन केले. हाती झाडू घेऊन गावं झाडून काढली. माणसांची मनं पण साफ करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तरीदेखील आपण शिकली- सवरलेली माणसं याबाबतीत मात्र अजूनही विचार करीत नाही. आपण परदेशात जाऊन आलो की, त्या गावांची व शहरांची स्वच्छता, हिरवाई, शिस्त यांचे गोडवे गातो; पण हे सगळं तेथील लोकांनी कष्टाने निर्माण केलं आहे. त्यांच्या शिस्तप्रिय जीवनशैलीतून व श्रमातून निर्माण झाले आहे, हे मात्र विसरून जातो.

आपलं शासनही प्रयत्न करीत आहे. कै. आर. आर. पाटील यांचं योगदानही फार महत्त्वाचे आहे. त्यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरू केलं होतं. राज्यातील अनेक गावे या अभियानात सहभागी झाल्यामुळे गावांमध्ये स्वच्छता चळवळ सुरू झाली. या चळवळीमुळे लोक श्रमदान करून आपलं गावं स्वच्छ करू लागले; परंतु हे काही गावांनीच करून दाखविले. यातूनच निर्मलग्राम, पर्यावरण संतुलित ग्राम, स्वच्छ भारत मिशन, असे अनेक कार्यक्रम सुरू झाले आहेत.कोणत्याही समृद्ध गावांची, शहरांची व समाजाची विकासाची कल्पना करताना स्वच्छता हा विकासातील पहिला टप्पा आहे. स्वच्छतेशिवाय समृद्धी येऊच शकत नाही.संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपलं सगळं आयुष्य प्रबोधन करण्यात घालिवले. ‘जैसे आपण स्नान करावे। तैसेची निर्मल ग्राम ठेवावे’ हा संदेश त्यांनी आपणाला दिला.

(लेखक ग्रामविकास व व्यसनमुक्ती चळवळीतील बिनीचे कार्यकर्ते आहेत.)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान