शहरं
Join us  
Trending Stories
1
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
4
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
5
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
6
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
7
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
8
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
9
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
10
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
11
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
12
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ
13
समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले...
14
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
15
८ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! RBI च्या घोषणेनंतर बाजारात जोरदार उसळी! टॉप गेनर्स-लूजर्स पाहा
16
भारतावर टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पवर काय वेळ आली, कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत; शटडाऊनची नामुष्की
17
जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC
18
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
19
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
20
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता

भरपाई मिळेपर्यंत गप्प बसणार नाही

By admin | Updated: April 22, 2015 00:32 IST

राजू शेट्टी यांचा इशारा : तमदलगे-अंकली चौपदरी रस्ता; ग्रामस्थांची पर्यायी जागा देण्याची मागणी

जयसिंगपूर : तमदलगे-अंकली चौपदरीकरण रस्त्याप्रश्नी ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करूनही ठेकेदार, अधिकारी यांच्याकडून दखल घेतली जात नव्हती. मात्र, ग्रामस्थांच्या आवाजाला ‘लोकमत’ने पाठबळ दिल्यामुळे या प्रश्नाचे गांभीर्य अधिकारी व लोकप्रतिनिधींनी घेतल्याने प्रश्नाचा गुंता सुटण्यास मदत होणार आहे. ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मांडल्यामुळे ‘लोकमत’चे कौतुक होत आहे. दरम्यान, संबंधित शेतकरी व ग्रामस्थांना त्यांची नुकसानभरपाई मिळेपर्यंत गप्प बसणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.तमदलगे बसवान खिंड ते अंकली टोलनाक्यापर्यंतच्या चौपदरीकरण रस्त्यात जाणारी घरे, शाळा, शेतजमिनी याबाबत गेल्या तीन वर्षांपासून भिजत घोंगडे पडले आहे. ३१ मे पर्यंत रस्ता पूर्ण करा, असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळेच तमदलगे, निमशिरगाव, जैनापूर येथील शेतकरी व ग्रामस्थांचा प्रश्न ‘जैसे थै’च आहे. तमदलगेमधील ३५ घरे या रस्त्यात जाणार असली तरी संबंधित ग्रामस्थांनी पर्यायी जागा द्या, अशी मागणी केली आहे. निमशिरगावच्या शाळेचा प्रश्नही तितकाच गंभीर आहे. आदी प्रमुख समस्यांमुळे येत्या ३१ मे पर्यंत रस्ता पूर्णत्वाचा प्रश्न ठेकेदार कंपनीला अडचणीचाच ठरणार आहे. (प्रतिनिधी)भरपाई मिळेपर्यंत गप्प बसणार नाही. प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळे निमशिरगाव येथील एका शेतकऱ्याच्या जमिनीवर २१ लाखांचा बोजा चढविण्यात आला होता. तो कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर बोजा कमी करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. काम हे न्यायीक पद्धतीनेच झाले पाहिजे. हुकूमशाही पद्धतीने होत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. ठेकेदार कंपनीकडून संबंधितांना मोबदला मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना निश्चितच पाठपुरावा करेल. - राजू शेट्टी, खासदारतमदलगे, जैनापूर व निमशिरगाव येथील शेतकरी व ग्रामस्थांना त्यांचा मोबदला मिळवून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे आपण मागणी केली आहे. जर शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल, तर कदापी खपवून घेणार नाही. प्रसंगी मुख्यमंत्र्यांना भेटून तमदलगे येथील ग्रामस्थांना पर्यायी जागा देण्याबाबत प्रयत्न राहील.- उल्हास पाटील, आमदार‘लोकमत’च्या पाठपुराव्याचे कौतुकतमदलगे-अंकली बायपास रस्त्याप्रश्नी शेतकरी, ग्रामस्थ यांच्या प्रश्नाविषयी गेले दोन दिवस वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेऊन लोकप्रतिनिधींनी याप्रश्नी पाठपुरावा सुरू केला आहे. यामुळे अधिकारी कामाला लागले आहेत. ‘लोकमत’ने केलेल्या पाठपुराव्याचे तमदलगे, जैनापूर व निमशिरगाव ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.