शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

घळभरणी करणारच, पण पाणीसाठा पुनर्वसन होईपर्यंत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:41 IST

उत्तूर : आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथील विस्थापितांचे प्रश्न सुटेपर्यंत प्रकल्पात पाणीसाठा होऊ देणार नाही. मात्र, घळभरणीचे काम करणारच, ...

उत्तूर : आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथील विस्थापितांचे प्रश्न सुटेपर्यंत प्रकल्पात पाणीसाठा होऊ देणार नाही. मात्र, घळभरणीचे काम करणारच, असा पुनरुच्चार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विस्थापित व अधिकारी यांच्या आढावा बैठकीत धरणस्थळावर केला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, आंबेओहोळसंदर्भात वेळोवेळी बैठका घेऊन प्रश्न निकालात काढले. आजच्या आढावा बैठकीत विस्थापितांचे प्रश्न समजले आहेत. यामध्ये प्रामुख्याने संकलन रजिस्टर दुरुस्ती, देय जमिनी वाटप, पॅकेज वाटप, करपेवाडीच्या जगद्गुरू जमिनींचा प्रश्न, धरणग्रस्त दाखले, वैयक्तिक अडचणी याबाबत प्रांताधिकारी गडहिंग्लज यांनी २० ते ३० डिसेंबरपर्यंत प्रत्येक गावात बैठका घेऊन विस्थापितांचे प्रश्न निकालात काढावेत. देय जमिनीत मूळ मालक येऊ देत नसतील तर गुन्हे दाखल करा, असा आदेश तहसीलदार यांनी दिला. धरणग्रस्तांवरील सोमवारी दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात म्हणाले, काही मंडळी अधिकाऱ्यांना त्रास देत होती. त्यातील व्हिडिओ पोलिसांकडे आहेत. ते तपास करतील. मात्र, अशी घटना घडायला नको होती.

जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, मतभिन्नता हवी, पण ती एकमेकांच्या जिवावर नको, विस्थापितांनी टोकाची भूमिका घेऊ नये. अधिकाऱ्यांना या धरणाचा काय फायदा आहे. सामंजस्यपणे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवूया. करपेवाडी धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी घेत असल्याची ग्वाही देसाई यांनी दिली.

विस्थापितांचे प्रश्न जि. प. सदस्य उमेश आपटे, सदानंद व्हनबट्टे, शंकर पावले, विठ्ठल कदम, महादेव खाडे, राजू देशपांडे, संतोष बेलवाडकर, सागर सरोळकर, संजय पाटील, सखाराम कदम, आदींसह धरणग्रस्तांनी प्रश्न उपस्थित केले. धरणग्रस्तांच्या प्रश्नांना गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांनी उत्तरे दिली.

मुख्य कार्यकारी अभियंता महेश सूर्यवंशी यांनी स्वागत केले. यावेळी भुदरगडचे प्रांताधिकारी संपत खिलारी, प्रकल्प अभियंता स्मिता माने, तहसीलदार विकास अहिर, वसंत धुरे, मारुती घोरपडे, आदींसह पुनर्वसन, पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

-------------------------

* मोठा बंदोबस्त अन् नाराजी

केवळ शंभरावर

धरणग्रस्तांचे पुनर्वसन होणे बाकी आहे. धरणग्रस्तांच्या उपस्थितीपेक्षा पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता. ग्रामस्थ दबक्या आवाजात कारवाईच्या भीतीने प्रश्न मांडत होते. मात्र, मुश्रीफांनी बोलण्यास संधी दिल्याने धडपण नाहीसे झाले. एवढा बंदोबस्त कशासाठी आणला असा प्रश्न विचारण्यात आला, तर अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी धरणग्रस्तांनी व्यक्त केली.

------------------------

फोटो ओळी : आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथे धरणग्रस्तांची मते जाणून घेताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ. क्रमांक : १११२२०२०-गड-०८

------------------------