शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
5
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
6
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
7
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
8
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
9
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
10
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
11
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
12
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
13
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
14
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
15
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
16
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
17
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
18
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
19
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
20
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट

घळभरणी करणारच, पण पाणीसाठा पुनर्वसन होईपर्यंत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:41 IST

उत्तूर : आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथील विस्थापितांचे प्रश्न सुटेपर्यंत प्रकल्पात पाणीसाठा होऊ देणार नाही. मात्र, घळभरणीचे काम करणारच, ...

उत्तूर : आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथील विस्थापितांचे प्रश्न सुटेपर्यंत प्रकल्पात पाणीसाठा होऊ देणार नाही. मात्र, घळभरणीचे काम करणारच, असा पुनरुच्चार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विस्थापित व अधिकारी यांच्या आढावा बैठकीत धरणस्थळावर केला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, आंबेओहोळसंदर्भात वेळोवेळी बैठका घेऊन प्रश्न निकालात काढले. आजच्या आढावा बैठकीत विस्थापितांचे प्रश्न समजले आहेत. यामध्ये प्रामुख्याने संकलन रजिस्टर दुरुस्ती, देय जमिनी वाटप, पॅकेज वाटप, करपेवाडीच्या जगद्गुरू जमिनींचा प्रश्न, धरणग्रस्त दाखले, वैयक्तिक अडचणी याबाबत प्रांताधिकारी गडहिंग्लज यांनी २० ते ३० डिसेंबरपर्यंत प्रत्येक गावात बैठका घेऊन विस्थापितांचे प्रश्न निकालात काढावेत. देय जमिनीत मूळ मालक येऊ देत नसतील तर गुन्हे दाखल करा, असा आदेश तहसीलदार यांनी दिला. धरणग्रस्तांवरील सोमवारी दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात म्हणाले, काही मंडळी अधिकाऱ्यांना त्रास देत होती. त्यातील व्हिडिओ पोलिसांकडे आहेत. ते तपास करतील. मात्र, अशी घटना घडायला नको होती.

जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, मतभिन्नता हवी, पण ती एकमेकांच्या जिवावर नको, विस्थापितांनी टोकाची भूमिका घेऊ नये. अधिकाऱ्यांना या धरणाचा काय फायदा आहे. सामंजस्यपणे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवूया. करपेवाडी धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी घेत असल्याची ग्वाही देसाई यांनी दिली.

विस्थापितांचे प्रश्न जि. प. सदस्य उमेश आपटे, सदानंद व्हनबट्टे, शंकर पावले, विठ्ठल कदम, महादेव खाडे, राजू देशपांडे, संतोष बेलवाडकर, सागर सरोळकर, संजय पाटील, सखाराम कदम, आदींसह धरणग्रस्तांनी प्रश्न उपस्थित केले. धरणग्रस्तांच्या प्रश्नांना गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांनी उत्तरे दिली.

मुख्य कार्यकारी अभियंता महेश सूर्यवंशी यांनी स्वागत केले. यावेळी भुदरगडचे प्रांताधिकारी संपत खिलारी, प्रकल्प अभियंता स्मिता माने, तहसीलदार विकास अहिर, वसंत धुरे, मारुती घोरपडे, आदींसह पुनर्वसन, पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

-------------------------

* मोठा बंदोबस्त अन् नाराजी

केवळ शंभरावर

धरणग्रस्तांचे पुनर्वसन होणे बाकी आहे. धरणग्रस्तांच्या उपस्थितीपेक्षा पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता. ग्रामस्थ दबक्या आवाजात कारवाईच्या भीतीने प्रश्न मांडत होते. मात्र, मुश्रीफांनी बोलण्यास संधी दिल्याने धडपण नाहीसे झाले. एवढा बंदोबस्त कशासाठी आणला असा प्रश्न विचारण्यात आला, तर अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी धरणग्रस्तांनी व्यक्त केली.

------------------------

फोटो ओळी : आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथे धरणग्रस्तांची मते जाणून घेताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ. क्रमांक : १११२२०२०-गड-०८

------------------------