शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
5
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
6
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
7
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
8
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
9
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
10
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
12
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
13
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
14
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
15
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
16
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
17
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
18
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
19
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

कोल्हापूरची हद्दवाढ केल्यास पालकमंत्री मुश्रीफ ठरतील हिरो, नऊ गावांचा समावेश शक्य

By विश्वास पाटील | Updated: October 11, 2023 12:58 IST

राजकीय उलथापालथी झाल्या नाहीत तर हा निर्णय होऊ शकतो

विश्वास पाटीलकोल्हापूर : कोल्हापूर शहराची रखडलेली हद्दवाढ करताना कोणत्याही राजकीय फायद्या-तोट्याचे गणित नसल्याने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना नऊ गावांचा समावेश करून हद्दवाढीचा निर्णय घेणे सोपे आहे. त्यामुळे कधी नव्हे ते यावेळेला कोल्हापूरची हद्दवाढ होण्याची शक्यता जास्त ठळक झाली आहे. फक्त त्यासाठी कालावधी कमी आहे. काही फार राजकीय उलथापालथी झाल्या नाहीत तर हा निर्णय होऊ शकतो. हद्दवाढीचा माझा प्लॅन वेगळा असल्याचे त्यांनी सोमवारीच जाहीर केले आहे.

मंत्री मुश्रीफ यांना हा निर्णय घेण्यास सोपे असण्याची कारणे अशी :आतापर्यंत हा निर्णय गावांचा विरोध असल्याने होऊ शकला नाही. कारण त्यामागे विधानसभेचे राजकारण होते. राजकीय इच्छाशक्तीच कायम आड आली. कोल्हापूर दक्षिण मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस तशी अस्तित्वहीन आहे. या गावांचा कागल मतदारसंघाशीही तसा फारसा संबंध नाही. त्यामुळे त्यांना व्यक्तिगत किंवा पक्षीयदृष्ट्या त्याचा फारसा फटका नाही.माजी पालकमंत्री सतेज पाटील हे हा निर्णय घेऊ शकले नाहीत कारण हद्दवाढीत येणाऱ्या गावांत त्यांची राजकीय सत्ता होती व आहे. त्यामुळे त्यांना अंगावर घेवून हद्दवाढ करण्यात अडचणी होत्या. तोच कित्ता माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही गिरवला. खरेतर चंद्रकांतदादा यांना हा निर्णय घेण्याची फार संधी होती. कारण राज्यात ते दुसऱ्या क्रमाकांचे मंत्री होते. त्यामुळे त्यांच्या स्टाईलमध्ये ते चुटकीसरशी हा निर्णय घेऊ शकले असते. परंतू त्यांनीही दक्षिणच्या राजकारणप्रेमापोटीच तसा हद्दवाढ केली नाही. त्यांच्या राजकारणावर महाडिक कुटुंबियांचा प्रभाव होता. त्यांना राजकीय अडचण होऊ नये म्हणून त्यांनी हद्दवाढ केली नाही.हद्दवाढीचा विषय आतातरी मोजक्याच सात-आठ गावांपुरता मर्यादित आहे. त्यामुळे त्याचे पडसाद उमटले तरी लोकसभेला त्याचा फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. त्यामुळेही हा निर्णय घेणे मुश्रीफ यांना सोपे आहे.सगळ्यात महत्वाचे म्हणजे शहरात मिसळलेल्या गावांची आता हद्दवाढ होणार ही मानसिकता झाली आहे. तिला रोखणे आता शक्य नाही हे वास्तव आहे. मंत्री मुश्रीफ यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे हद्दवाढ व्हावीच अशा मताचे आहेत. त्यामुळे मंत्री मुश्रीफ यांनी पाठपुरावा करून सरकारकडे राजकीय ताकद वापरली तर हा निर्णय होऊ शकतो. मुश्रीफ यांची अशा गोष्टीसाठी पाठपुरावा करण्याची पध्दत राहिली आहे. त्यामुळे शेंडा पार्कातील रुग्णालय व हद्दवाढ या गोष्टी करून ते पालकमंत्री म्हणून वेगळी छाप पाडू शकतात.

ही नऊ गावे शक्य..मुश्रीफ यांच्या मनातला प्लॅन काय असू शकतो हे त्यांनी अजून जाहीर केलेले नाही. परंतु साधारणपणे नवे बालिंगे, वाडीपीर, कळंबा, पाचगांव, मोरेवाडी, कंदलगांव, उजळाईवाडी, सरनोबतवाडी, उचगांव ही नऊ गावे हद्दवाढीत पहिल्या टप्प्यात घेतली जावू शकतात. त्यांना चांगला अनुभव आल्यास इतर गावांत मग शहरात देण्यासाठी स्पर्धा लागू शकते.महानगरपालिकेने २२ जून २०१५ रोजी शासनास सादर केलेला प्रस्ताव १८ गावे व दोन औद्योगिक वसाहतींचा आहे. परंतू तेवढी गावे घेण्यास अडचणी जास्त आहेत. त्यामध्ये राजकीय अडचणीसोबतच पंचगंगा नदी व राष्ट्रीय महामार्गाने झालेले गावांचे विभाजन ही महत्वाची अडचण आहे. गांधीनगर भाजपचा गड आहे. त्यामुळे त्याला हात लावला जाण्याची शक्यता कमी वाटते.

का झाली नाही हद्दवाढ..कोल्हापूर शहराची नगरपालिका १९७२ ला झाली. त्यापूर्वी वीस वर्षे अगोदर १९५१ ला शहराची हद्द ६६.८२ चौरस किलोमीटर इतकी निश्चित झाली. ती आजही २०२३ ला तेवढीच आहे. नगरपालिका होताना १९७१ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या २ लाख ५९ हजार होती. महापालिका करण्यासाठी तीन लाख लोकसंख्येचा निकष होता. त्यामुळे वर्षभरात ही लोकसंख्या ३ लाख झाली असावी असे गृहित धरून महापालिका करण्याचे नोटिफिकेशन झाले. त्यावेळी हद्दवाढ करताना सूचना, हरकती व त्यानंतर निर्णय ही प्रक्रिया राबविली गेली नाही. त्या प्रस्तावात नव्याने कोणतेही गांव घेतलेले नव्हते. त्यामुळे विरोधही झाला नाही.

कायद्याचाही आधार..अर्बन लँन्ड सिलिंग कायदा (१९७६) अन्वये शहराच्या हद्दीपासून एक किलोमीटरच्या परिघात असलेली गावे हद्दवाढ करताना समाविष्ट करण्यात कायदेशीरदृष्ट्या अधिक सुलभ असते. ही नऊ गावे त्यामध्ये बसतात.

हद्दवाढ करताना परस्परातील विश्वास, सामंजस्याची भावना महत्वाची आहे. कारण विकास शहरी व ग्रामीण जनतेलाही हवाच आहे. आताही ग्रामीण भागाचा विकास कोणत्याही नियोजनाशिवाय होत आहे हे देखील लक्षात घेतले पाहिजे. - जेष्ठ आर्किटेक्ट बलराम महाजन नगररचना अभ्यासक, कोल्हापूर 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफ