शहरं
Join us  
Trending Stories
1
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
2
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
3
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
4
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
5
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
6
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
7
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
9
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
10
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
11
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
12
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
13
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
14
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
15
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
16
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
17
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
18
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
19
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
20
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."

कारखान्यांना एकरकमी एफआरपी देणे अशक्य

By admin | Updated: October 19, 2015 00:43 IST

जयंत पाटील : साखरेला हमीभाव देण्याची मागणी

मुरगूड : गेल्या काही महिन्यांपासून बाजारामध्ये साखरेचा भाव उतरलेला आहे. शासनाने साखरेला प्रतिक्विंटल चार हजार रुपये हमीभाव जर दिला, तरच शेतकरी आणि साखर कारखाने तरतील. शेतकरी संघटनेने केलेली मागणी अवास्तव आहे. आताच्या परिस्थितीमध्ये कोणताच साखर कारखाना एफआरपीची रक्कम एकावेळी देऊ शकत नाही, असे स्पष्ट मत शेकापचे ज्येष्ठ आमदार भाई जयंत पाटील यांनी व्यक्त केले.मुरगूड (ता. कागल) येथे जमादार चौक मित्र मंडळाने मशिदीच्या समोर बसवलेल्या दुर्गामूर्तीच्या आरतीसाठी जयंत पाटील सपत्नीक आले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी व पत्रकारांशी गप्पा मारल्या. बिद्रीचे संचालक राजेखान जमादार यांनी स्वागत केले. जयंत पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिकेसह, मंत्रिमंडळातील कारभार, शासनाची उदासीनता, महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती याबाबत सविस्तर माहिती दिली.जयंत पाटील म्हणाले, साखरेच्या निर्मितीपैकी दहा टक्के साखर खाण्यासाठी वापरली जाते. उर्वरित ९० टक्के साखरेपैकी ५० टक्के साखर शीतपेय तयार करण्यासाठी मोठमोठ्या कंपन्यांना दिली जाते. त्या साखरेचा भाव ५० रुपये प्रति किलो ठेवला, तर कारखाने प्रतिटन ३५०० रुपये दर देतील. कारखान्यांनी स्पर्धेत टिकण्यासाठी को-जनरेशनसारखे प्रकल्प निर्माण करणे आवश्यक आहे. कोल्हापूर शहरामध्ये प्रतिगामी शक्ती डोके वर काढत असल्याबद्दल शोकांतिका व्यक्त करत ते म्हणाले, राजर्षी शाहूंच्या विचाराने प्रेरीत असणाऱ्या भूमीमध्ये पानसरेंची हत्या निंदनीय आहे. केंद्रातील आणि राज्यातील शासन सर्वच बाबतीत अपयशी ठरले आहे. साहित्यिकांनी पुरस्कार परत करून केलेला निषेध योग्यच आहे.नोकरांच्या पगारावर खर्च करायला शासनाकडे पैसा आहे. पण शेतकऱ्यांवर खर्च करताना ओरड. सभागृहामध्ये शेतकऱ्यांची बाजू मांडणारे लोकप्रतिनिधी नसल्याने अर्थसंकल्पामध्येही शेतीकडे दुर्लक्ष होते आहे. दुष्काळ निवारणासाठी शेकापच्यावतीने आपण भरीव काम करत असून, नाले बांधणे, शेतकऱ्यांना बी-बियाणे पुरविणे, विद्यार्थ्यांना फी माफी करणे, मोफत भोजनाची व्यवस्था, आदी उपक्रमासाठी २०० हून अधिक कार्यकर्ते कार्यरत आहेत. यावेळी माजी नगराध्यक्ष नामदेव मेंडके, सम्राट मसवेकर, दत्तात्रय मंडलिक, प्रकाश हळदकर, संजय सुतार, अमर सणगर, सुभाष बारदेस्कर, आदी प्रमुख उपस्थित होते.