शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

कारखान्यांना एकरकमी एफआरपी देणे अशक्य

By admin | Updated: October 19, 2015 00:43 IST

जयंत पाटील : साखरेला हमीभाव देण्याची मागणी

मुरगूड : गेल्या काही महिन्यांपासून बाजारामध्ये साखरेचा भाव उतरलेला आहे. शासनाने साखरेला प्रतिक्विंटल चार हजार रुपये हमीभाव जर दिला, तरच शेतकरी आणि साखर कारखाने तरतील. शेतकरी संघटनेने केलेली मागणी अवास्तव आहे. आताच्या परिस्थितीमध्ये कोणताच साखर कारखाना एफआरपीची रक्कम एकावेळी देऊ शकत नाही, असे स्पष्ट मत शेकापचे ज्येष्ठ आमदार भाई जयंत पाटील यांनी व्यक्त केले.मुरगूड (ता. कागल) येथे जमादार चौक मित्र मंडळाने मशिदीच्या समोर बसवलेल्या दुर्गामूर्तीच्या आरतीसाठी जयंत पाटील सपत्नीक आले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी व पत्रकारांशी गप्पा मारल्या. बिद्रीचे संचालक राजेखान जमादार यांनी स्वागत केले. जयंत पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिकेसह, मंत्रिमंडळातील कारभार, शासनाची उदासीनता, महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती याबाबत सविस्तर माहिती दिली.जयंत पाटील म्हणाले, साखरेच्या निर्मितीपैकी दहा टक्के साखर खाण्यासाठी वापरली जाते. उर्वरित ९० टक्के साखरेपैकी ५० टक्के साखर शीतपेय तयार करण्यासाठी मोठमोठ्या कंपन्यांना दिली जाते. त्या साखरेचा भाव ५० रुपये प्रति किलो ठेवला, तर कारखाने प्रतिटन ३५०० रुपये दर देतील. कारखान्यांनी स्पर्धेत टिकण्यासाठी को-जनरेशनसारखे प्रकल्प निर्माण करणे आवश्यक आहे. कोल्हापूर शहरामध्ये प्रतिगामी शक्ती डोके वर काढत असल्याबद्दल शोकांतिका व्यक्त करत ते म्हणाले, राजर्षी शाहूंच्या विचाराने प्रेरीत असणाऱ्या भूमीमध्ये पानसरेंची हत्या निंदनीय आहे. केंद्रातील आणि राज्यातील शासन सर्वच बाबतीत अपयशी ठरले आहे. साहित्यिकांनी पुरस्कार परत करून केलेला निषेध योग्यच आहे.नोकरांच्या पगारावर खर्च करायला शासनाकडे पैसा आहे. पण शेतकऱ्यांवर खर्च करताना ओरड. सभागृहामध्ये शेतकऱ्यांची बाजू मांडणारे लोकप्रतिनिधी नसल्याने अर्थसंकल्पामध्येही शेतीकडे दुर्लक्ष होते आहे. दुष्काळ निवारणासाठी शेकापच्यावतीने आपण भरीव काम करत असून, नाले बांधणे, शेतकऱ्यांना बी-बियाणे पुरविणे, विद्यार्थ्यांना फी माफी करणे, मोफत भोजनाची व्यवस्था, आदी उपक्रमासाठी २०० हून अधिक कार्यकर्ते कार्यरत आहेत. यावेळी माजी नगराध्यक्ष नामदेव मेंडके, सम्राट मसवेकर, दत्तात्रय मंडलिक, प्रकाश हळदकर, संजय सुतार, अमर सणगर, सुभाष बारदेस्कर, आदी प्रमुख उपस्थित होते.