शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

अपक्षांची डाळ शिजणे अवघड

By admin | Updated: October 27, 2015 23:58 IST

अवघ्या दहा प्रभागांत आव्हान : दोन ते तीन अपक्ष विजयी होण्याची शक्यता

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीत २००५ सालापर्यंत अपक्ष नगरसेवकांचा झालेला उन्माद पाहता गेल्या दहा वर्षांत शहरातील मतदारांनी पक्षीय राजकारण स्वीकारले असून अपक्षांना झिडकारले आहे. त्याचीच पुनरावृत्ती यावेळच्या निवडणुकीतही पाहायला मिळेल. यंदाच्या निवडणुकीत दहा प्रभागांत अपक्ष उमेदवारांनी राजकीय पक्षांसमोर आव्हान उभे केले असले, तरी प्रत्यक्षात दोन किंवा तीन उमेदवार निवडून येतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत अपक्षांची ‘डाळ’ शिजणार नाही, हे स्पष्ट आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर पहिली सार्वत्रिक निवडणूक १९७८ मध्ये झाली, तेव्हापासून २००५ पर्यंत कॉँग्रेस पक्षांतर्गत गट-तट यांच्यामध्येच ही निवडणूक लढली गेली. त्यामुळे पहिल्या पाच सार्वत्रिक निवडणुकीत अपक्षांचेच वर्चस्व राहिले. १९९० च्या निवडणुकीत अपक्ष नगरसेवकांना सोबत घेत ताराराणी आघाडीने महापालिकेच्या राजकारणात प्रवेश केला. त्याचे नेतृत्व आमदार महादेवराव महाडिक यांनी केले. काँग्रेसचे अनेक सक्रिय कार्यकर्ते महाडिकांच्या मांडवाखालूनच पदाधिकारी झाले. २००५ मध्ये झालेल्या निवडणुकीत आमदार महाडिक यांनीच महापालिकेची सत्ता काबीज केली; परंतु बहुमत काठावरचे मिळाले. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस व जनसुराज्य पक्षाने मोट बांधली. त्यांनीही महाडिक यांच्याच राजकारणाचे अनुकरण केले. पुढे एक वर्षात तर महाडिक गटाच्या तत्कालीन महापौर सई खराडे यांनाच फोडण्यात राष्ट्रवादी व जनसुराज्यने यश मिळविले. त्यांच्यासह सात-आठ नगरसेवकसुद्धा ताराराणी आघाडीतून बाहेर पडले. सत्ता राष्ट्रवादी व जनसुराज्य पक्षाच्या हाती राहिली. त्यानंतर २०१० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व जनसुराज्य आघाडीबरोबर काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या. त्यामुळे स्वाभाविक या तीन पक्षांनी मोट बांधून महाडिक यांच्या राजकारणाला पहिल्यांदाच निर्विवाद ‘ब्रेक’ दिला. त्यावेळी फक्त दहा अपक्ष उमेदवार विजय झाले होते. बसुगडे, आडसुळे लढतात अपक्ष माजी नगरसेवक संभाजी बसुगडे हे आमदार महाडिक यांचे समर्थक आहेत. त्यांनी रंकाळा स्टॅँड प्रभागातून ताराराणी आघाडीकडे उमेदवारी मागितली होती; परंतु कारभाऱ्यांच्या विरोधामुळे त्यांची उमेदवारी नाकारली गेली. त्यामुळे बसुगडे यांना प्रभाग बदलावा लागला. शेवटी त्यांनी दुधाळी पॅव्हेलियन प्रभागातून लढण्याची तयारी करावी लागली. पांडुरंग आडसुळे हे गतवेळच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून लढले होते. यंदा त्यांचा प्रभाग तोडला गेल्यामुळे त्यांनी नाथा गोळे प्रभागाकडे मोर्चा वळवला; परंतु त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली नाही. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. अन्य प्रभागांत माजी नगरसेविका प्रेमा डवरी (प्रभाग : ३५), राहुल शिवाजी खाडे (प्रभाग : ५२), रवींद्र मुतगी (प्रभाग : ६४), राजेंद्र दिंडोर्ले (प्रभाग : ७५) यांनी राजकीय पक्षांसमोर आव्हान निर्माण केले आहे. १२४ अपक्ष उमेदवार रिंगणात : पक्षीय राजकारणाचे वर्चस्वयंदाही पक्षीय राजकारणाचेच वर्चस्व राहील असे चित्र आहे. काँग्रेस,राष्ट्रवादी, शिवसेनेबरोबरच आता भाजपही मोठ्या ताकदीने ताराराणी आघाडीसह निवडणूक रिंगणात उतरली आहे. निवडणूक लढविणाऱ्या सर्वच प्रमुख पक्षांचा उमेदवारांना चांगला आधार व पर्याय मिळाल्यामुळे यंदा अपक्ष उमेदवारांची संख्या घटली आहे. राजकीय पक्षांची सर्व प्रकारची मदत मिळते असा अनुभव आहे. त्यामुळे ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी थेट माघार घेतली. या निवडणुकीत ५०६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामध्ये १२४ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. तीन प्रभागांत शिवसैनिकांची बंडखोरी यंदा शिवसेनेत उमेदवारीचा घोळ बराच उशिरापर्यंत सुरू राहिला. शिवसेनेत ‘कट्टर शिवसैनिक’ म्हणून ज्यांचा उल्लेख करण्यात येतो, अशा दत्ताजी टिपुगडे, कमलाकर जगदाळे, अभिषेक देवणे, शशिकांत बिडकर, राजेंद्र जाधव यांना ‘वेटिंग’वर ठेवण्यात आले होते. त्यातील देवणे व टिपुगडे वगळता अन्य शिवसैनिकांची उमेदवारी नाकारण्यात आली. पक्षीय गटबाजीतून हे घडल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे उमेदवारी नाकारलेल्या कमलाकर जगदाळे यांनी त्यांची पत्नी शुभदा जगदाळे (प्रभाग क्रमांक ४२), शशिकांत बिडकर (प्रभाग क्रमांक १४), तर राजेंद्र जाधव (प्रभाग क्रमांक ४८) यांना थेट बंडखोरी करावी लागली आहे. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसमध्ये दोघांची बंडखोरीकॉँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेल्या नीलोफर आजरेकर (प्रभाग क्रमांक २६) व राजू बजरंग पसारे (प्रभाग क्रमांक ३९) यांनी बंडखोरी केली आहे. आजरेकर यांना माजी मंत्री सतेज पाटील यांनी उमेदवारी देण्यासाठी आग्रह धरला; परंतु जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे या दोघांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरले आहेत. नीलोफर आजरेकर यांच्या प्रचाराला मतदारांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता त्यांचे मोठे आव्हान इतर पक्षांच्या उमेदवारांसमोर आहे.