शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

ग्रामपंचायतीनाही वेळेत दाखले देणे बंधनकारक

By admin | Updated: July 16, 2015 00:41 IST

ग्रामस्थांचे हेलपाटे थांबणार : सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी सुरू; १३ दाखल्यांचा समावेश

कोल्हापूर : ग्रामपंचायतीमधून दिले जाणारे १३ प्रकारचे दाखले लोकसेवा हक्क कायद्यानुसार वेळेत देणे बंधनकारक केले आहे. महसूलपाठोपाठ बुधवारी ग्रामविकास विभागानेही गावपाळीवर थेट जनतेशी संबंधित असणारे विविध दाखले या कायद्यांतर्गत द्यावेत, असे आदेश शासनाचे प्रधान सचिव वि. गिरिराज यांनी सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे. ‘शासकीय काम आणि सहा महिने थांब’ असा अनुभव सर्वसामान्य नागरिकांना अनेक वर्षांपासून येतोे. यातून सुटका व्हावी, हेलपाटे थांबावेत, निर्धारित वेळेत कामे व्हावीत म्हणून राज्यात सेवा कमी कायद्याची अंमलबजावणी १ जुलैपासून सुरू झाली. परंतु, शासनाच्या विभागनिहाय कोणत्या सेवा द्यावयाच्या हे निश्चित नसल्याने पहिल्याच दिवशी अंमलबजावणीचा फज्जा उडाला.दरम्यान, आठवड्यानंतर का असेना, ग्रामविकास विभागाने पहिल्या टप्प्यात ग्रामपंचायत पातळीवरील १३ प्रकारचे दाखले या कायद्यांतर्गत देणे सक्तीचे केले आहे. यासाठी नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम व द्वितीय अपिलीय अधिकारी यांची निवड करून द्यावयाच्या सेवा व अधिकाऱ्यांचे नाव ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात फलकावर लावावे, अशी सूचना दिली आहे. या कायद्यामुळे दप्तरदिरंगाईला चाप बसणार आहे. निर्धारित वेळेत दाखला न दिल्यास संबंधित कर्मचाऱ्याला दंड होणार आहे. (प्रतिनिधी)लोकसेवेचे नाव (दाखले)नियम कालमर्यादा १) जन्मनोंद५ दिवस २) मृत्युनोंद५ दिवस ३) विवाहनोंद५ दिवस ४) रहिवाशी ५ दिवस ५) दारिद्र्यरेषेखालील ५ दिवस ६) हयातीचा ५ दिवस ७) ग्रामपंचायत येणेबाकी५ दिवस ८) शौचालय ५ दिवस ९) नमुना आठचा उतारा५ दिवस १०) निराधार असल्याचा२० दिवस ११) विधवा असल्याचा२० दिवस १२) परित्यक्ता असल्याचा २० दिवस १३) विभक्त २० दिवसस्वतंत्र नोंदवही ठेवावीग्रामपंचायत कार्यालयात सेवाहमी कायद्यांतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाकरिता स्वतंत्र नोंद ठेवावी, अशी सूचना दिली आहे. हयातीचा, दारिद्र्यरेषेखालील, निराधार असल्याचा दाखला मोफत दिला जाणार आहे. उर्वरित दाखल्यांसाठी अर्जासोबतच २० रुपये मोजावे लागणार आहेत.जर असा दाखला वेळेत दिला गेला नाही, तर संबंधित व्यक्ती पदनिर्देशित अधिकाऱ्याविरोधात पुढील ३० दिवसांत प्रथम अपील अधिकाऱ्यांकडे दाद मागू शकते. प्रथम अपील अधिकारी या विलंबासंदर्भात चौकशी करतील आणि दंडात्मक कारवाई करतील.जर प्रथम अपील अधिकारी सहायक गटविकास अधिकारी यांच्याकडून न्याय मिळत नाही, असे वाटत असल्यास संबंधित व्यक्ती ४५ दिवसांच्या आत द्वितीय अपील अधिकारी गटविकास अधिकारी यांच्याकडे दाद मागू शकते. जर प्रथम अपील अधिकाऱ्याने चुकीचा निर्णय दिला आहे, असे चौकशीत निष्पन्न झाल्यास त्यावरही दंडात्मक कारवाई होऊ शकते. पदनिर्देशीय अधिकारी ग्रामसेवक असतील.