शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

साखरेच्या खरेदी दराचा विषय अजूनही लोंबकळतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:29 IST

विश्वास पाटील - लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : यंदाचा साखर हंगाम अर्धा आटोपला तरी केंद्र सरकारकडून अजून साखरेच्या खरेदी ...

विश्वास पाटील - लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : यंदाचा साखर हंगाम अर्धा आटोपला तरी केंद्र सरकारकडून अजून साखरेच्या खरेदी दराचा विषय लोंबकळत पडला आहे. साखर कारखानदारीची मागणी किलोस ३५ रुपयांप्रमाणे दर मिळण्याची आहे; परंतु ३३ रुपये दर देण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी गेल्या ऑक्टोबरमध्येच जाहीर केले आहे. त्याचे पुढे काहीच झालेले नाही. सध्याचा खरेदी दर ३१ रुपये किलो आहे. दरवाढ झाली नाही तर राज्यातील अनेक कारखान्यांची उसाची बिलेच मिळणे अशक्य होणार आहे.

केंद्रीय अन्नमंत्री पीयूष गोयल यांनी साखरेची खरेदी किंमत वाढविण्यास केंद्र सरकार तयार नाही, असे विधान गेल्या महिन्यात १८ तारखेला ‘इस्मा’च्या वार्षिक सभेत बोलताना केले होते. तेव्हापासूनच साखर कारखानदारीला या दराबाबत केंद्र सरकार लवकर निर्णय घेणार नाही, अशी शंका आली होती. तीच शंका आता खरी होताना दिसत आहे. साखरेच्या सध्याच्या ३१ रुपये खरेदी किमतीवर शेतकऱ्यांना सध्याची सरासरी २५०० ते ३००० पर्यंतची एफआरपी देणे म्हणजे कारखाने पुन्हा तोट्यात ढकलण्यासारखेच आहे. त्यामुळे ही किंमत किमान ३५ रुपये करावी, अशी साखर कारखानदारीची मागणी आहे.

राज्य साखर संघाने तर किलोस ३५ नव्हे तर किमान ३८ रुपये दर मिळायला हवा, अशी मागणी केली आहे; कारण महाराष्ट्राची सरासरी एफआरपी २८५० आहे. साखरेला क्विंटलला ३८०० रुपये मिळाल्यास त्यातील ७५ टक्के रकमेतून एफआरपी देता येईल व उर्वरित रकमेतून प्रक्रिया खर्च करता येईल, असे गणित त्यामागे आहे; परंतु सध्या ३३०० रुपये देण्याचीच केंद्र सरकारची तयारी दिसत नाही.

साखरेची खरेदी किंमत वाढविल्यास बाजारातील साखरेचा दर वाढतो. त्यातून साखरेला महागाई निर्देशांकामध्ये जास्त अधिभार असल्याने महागाई वाढल्याचे चित्र तयार होते. तसे करायला केंद्र सरकार तयार नाही. त्यामुळेच या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. परंतु तसे करणे हे कारखानदारीस अडचणीत टाकणारे ठरत आहे.

दोन टप्प्यांत बिले

साखरेची खरेदी किंमत वाढवून मिळेल म्हणून कारखाने एकरकमी एफआरपी देत आहेत. तीच किंमत वाढवून मिळाली नाही तर कारखान्यांना कर्ज काढून एफआरपी द्यावी लागेल किंवा सध्या गाळप होणाऱ्या उसाला एफआरपीच देता येणार नाही.

उत्पादित होणाऱ्या साखरेवर कर्ज उचल करून कारखाने आता उसाची बिले देत आहेत. असे फार दिवस करता येणार नाही. केंद्र सरकारने साखरेची खरेदी किंमत किमान ३८ रुपये न केल्यास एफआरपी देणेही अडचणीचे ठरणार आहे.

चंद्रदीप नरके

अध्यक्ष

कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना, कुडित्रे.

साखरेची खरेदी किंमत क्विंटलला ३८०० रुपये करावी, अशीच मागणी महाराष्ट्र राज्य साखर संघाने केंद्र सरकारकडे केली आहे. त्यासाठी संघाच्या पातळीवर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे; परंतु तसे नाही झाल्यास कारखान्यांनी सभासदांशी केलेल्या करारानुसार दोन टप्प्यांत एफआरपी हाच मार्ग निवडावा लागेल.

संजय खताळ

कार्यकारी संचालक

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ