शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

साखरेच्या खरेदी दराचा विषय अजूनही लोंबकळतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:29 IST

विश्वास पाटील - लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : यंदाचा साखर हंगाम अर्धा आटोपला तरी केंद्र सरकारकडून अजून साखरेच्या खरेदी ...

विश्वास पाटील - लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : यंदाचा साखर हंगाम अर्धा आटोपला तरी केंद्र सरकारकडून अजून साखरेच्या खरेदी दराचा विषय लोंबकळत पडला आहे. साखर कारखानदारीची मागणी किलोस ३५ रुपयांप्रमाणे दर मिळण्याची आहे; परंतु ३३ रुपये दर देण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी गेल्या ऑक्टोबरमध्येच जाहीर केले आहे. त्याचे पुढे काहीच झालेले नाही. सध्याचा खरेदी दर ३१ रुपये किलो आहे. दरवाढ झाली नाही तर राज्यातील अनेक कारखान्यांची उसाची बिलेच मिळणे अशक्य होणार आहे.

केंद्रीय अन्नमंत्री पीयूष गोयल यांनी साखरेची खरेदी किंमत वाढविण्यास केंद्र सरकार तयार नाही, असे विधान गेल्या महिन्यात १८ तारखेला ‘इस्मा’च्या वार्षिक सभेत बोलताना केले होते. तेव्हापासूनच साखर कारखानदारीला या दराबाबत केंद्र सरकार लवकर निर्णय घेणार नाही, अशी शंका आली होती. तीच शंका आता खरी होताना दिसत आहे. साखरेच्या सध्याच्या ३१ रुपये खरेदी किमतीवर शेतकऱ्यांना सध्याची सरासरी २५०० ते ३००० पर्यंतची एफआरपी देणे म्हणजे कारखाने पुन्हा तोट्यात ढकलण्यासारखेच आहे. त्यामुळे ही किंमत किमान ३५ रुपये करावी, अशी साखर कारखानदारीची मागणी आहे.

राज्य साखर संघाने तर किलोस ३५ नव्हे तर किमान ३८ रुपये दर मिळायला हवा, अशी मागणी केली आहे; कारण महाराष्ट्राची सरासरी एफआरपी २८५० आहे. साखरेला क्विंटलला ३८०० रुपये मिळाल्यास त्यातील ७५ टक्के रकमेतून एफआरपी देता येईल व उर्वरित रकमेतून प्रक्रिया खर्च करता येईल, असे गणित त्यामागे आहे; परंतु सध्या ३३०० रुपये देण्याचीच केंद्र सरकारची तयारी दिसत नाही.

साखरेची खरेदी किंमत वाढविल्यास बाजारातील साखरेचा दर वाढतो. त्यातून साखरेला महागाई निर्देशांकामध्ये जास्त अधिभार असल्याने महागाई वाढल्याचे चित्र तयार होते. तसे करायला केंद्र सरकार तयार नाही. त्यामुळेच या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. परंतु तसे करणे हे कारखानदारीस अडचणीत टाकणारे ठरत आहे.

दोन टप्प्यांत बिले

साखरेची खरेदी किंमत वाढवून मिळेल म्हणून कारखाने एकरकमी एफआरपी देत आहेत. तीच किंमत वाढवून मिळाली नाही तर कारखान्यांना कर्ज काढून एफआरपी द्यावी लागेल किंवा सध्या गाळप होणाऱ्या उसाला एफआरपीच देता येणार नाही.

उत्पादित होणाऱ्या साखरेवर कर्ज उचल करून कारखाने आता उसाची बिले देत आहेत. असे फार दिवस करता येणार नाही. केंद्र सरकारने साखरेची खरेदी किंमत किमान ३८ रुपये न केल्यास एफआरपी देणेही अडचणीचे ठरणार आहे.

चंद्रदीप नरके

अध्यक्ष

कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना, कुडित्रे.

साखरेची खरेदी किंमत क्विंटलला ३८०० रुपये करावी, अशीच मागणी महाराष्ट्र राज्य साखर संघाने केंद्र सरकारकडे केली आहे. त्यासाठी संघाच्या पातळीवर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे; परंतु तसे नाही झाल्यास कारखान्यांनी सभासदांशी केलेल्या करारानुसार दोन टप्प्यांत एफआरपी हाच मार्ग निवडावा लागेल.

संजय खताळ

कार्यकारी संचालक

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ