शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
5
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
6
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
7
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
8
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
9
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
10
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
11
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
12
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
13
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
14
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
15
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
17
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
18
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
19
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"

बिद्री कारखान्यात ‘वाढीव सभासद’ कळीचा मुद्दा

By admin | Updated: May 25, 2015 00:38 IST

के. पी. पाटलांसमोर आव्हान : ऊसतोडणी कार्यक्रमानुसार तोडणी होत नसल्याचा जुन्या सभासदांचा आरोप

शिवाजी सावंत - गारगोटी --बिद्री कारखान्याच्या वाढीव सभासदांबाबत उच्च न्यायालयाच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देताच सत्तारूढ के. पी. पाटील गटाने गावागावात केलेल्या आतषबाजीबाबत वेगळाच सूर सभासदांमधून निघत आहे. याबाबत ५३ हजार सभासदांबाबत सत्तारूढ गटाला विश्वास नसल्याची चर्चा आहे.बिद्री साखर कारखान्याची वार्षिक गाळप क्षमता नऊ लाख मेट्रिक टन आहे. ५३ हजार सभासदांनी वार्षिक केवळ वीस टन ऊस कारखान्यास पुरविल्यास दहा लाख टन उसाचा पुरवठा होऊ शकतो. असे असताना उत्पादक सभासदांचा दहा लाखांपेक्षा कितीतरी अधिक ऊस उत्पादित होतो. ऊसतोडणी कार्यक्रमानुसार उसाची तोड होत नसल्याने जुन्या सभासदांमध्ये नाराजी आहे. या नाराजीचा फटका म्हणजे कारखाना हातातून जाऊ शकतो, म्हणून २०१२ मध्ये नव्याने चौदा हजार ५६३ सभासद केले. याबद्दल आमदार प्रकाशराव आबिटकर, माजी आमदार दिनकरराव जाधव, बाबासाहेब पाटील हे न्यायालयात गेले. सभासदांची तपासणी व्हावी, जर हे पात्र असतील तर त्यांना आमचा कोणताही विरोध नाही, असा त्यांचा युक्तिवाद आहे; पण सत्ताधारी गटाने या सभासदांचा असा समज करून दिला की, हे तुमच्या सभासदत्वाच्या विरोधात आहेत; पण वस्तुस्थिती वेगळी होती. शेवटी न्यायालयाने हे सभासद तपासणीचे आदेश देताच त्यातील केवळ दहा ते अकरा सभासद पात्र असल्याचा अहवाल तपास अधिकाऱ्यांनी दिल्याने न्यायालयाने त्यांना वगळून निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा निकाल दिला.कारखान्यास ६७ हजार सभासदांची गरज आहे का? शिवाय ४० कि. मी. अंतराच्या आत लाखो टन ऊस उपलब्ध असणारा हा एकमेव कारखाना आहे. या कारखान्याचे कार्यक्षेत्र जरी चार तालुके असले, तरी उसाची उपलब्धता सर्वत्र सारखीच आहे. म्हणजे कारखान्याला गाळपास ऊस कमी पडत नाही. मग नवीन सभासदांचा अट्टाहास का? ५३ हजार सभासदांचे ५३ कोटी रुपये भागभांडवल आहे. म्हणजे भाग भांडवलाचा तुटवडा नाही, मग आणखीन चौदा कोटी छप्पन लाख तीस हजार रुपये भागभांडवलाची गरज काय? या ६७ हजार ५६३ सभासदांना दरमहा पाच किलो व वार्षिक ६५ किलो साखर १० रुपये दराने दिली जाते. म्हणजेच प्रति किलो १२ ते १३ रुपये तोटा कारखान्याला सहन करावा लागतो. आज ५३ हजार सभासदांपोटी तो तोटा वार्षिक चार कोटी १३ लाख ४० हजार रुपये होतो. आणखीन सभासद वाढल्यास तो तोटा वाढण्याची शक्यता आहे.आमदारांकडे सत्ताआजपर्यंत आमदारकी तिकडे कारखान्याची सत्ता हा शिरस्ता अनेक वर्षे सुरू आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीची उत्सुकता आहे.सभासदांच्या अपेक्षाके. पी. पाटील यांच्याकडून सभासदांना खूप अपेक्षा आहेत; पण संचालक मंडळाचा तोडणी कार्यक्रमात हस्तक्षेप, नोकरभरती, सत्तेतील नाराजी, वर्षानुवर्षे तीच संचालक मंडळी, या धोक्याच्या बाजू पाहता या बिद्रीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.