शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' दाम्पत्याचं स्वप्न साकार; उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 13:32 IST

सावंत यांनी पंढरीला पायी चालत जाऊन, मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे उद्धव ठाकरे व विकास महाआघाडीचे सरकार पाच वर्षे टिकावे, यासाठी पंधरा दिवसांपूर्वी पंढरीच्या विठ्ठलाला साकडे घातले. या दिंडीमध्ये शिवसेना

ठळक मुद्देविनायक राऊत यांच्याकडून संजय सावंत यांना फोनवरून निमंत्रण--: विठ्ठलभक्ती फळास

भागवत काटकर ।शेगाव : महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री व आघाडीचे शासन पाच वर्षे टिकावे, यासाठी बनाळी (ता. जत) येथील माजी जिल्हा परिषद सदस्य, शिवसेना नेते संजय सावंत व त्यांच्या सौभाग्यवती रूपाली सावंत यांनी ग्रामस्थांसह पंढरपूरला पायी अनवाणी चालत जाऊन विठुरायाच्या चरणी साकडे घातले होते. आता सावंत यांनी घातलेले साकडे पंढरीच्या विठ्ठलाने पूर्ण केले असून, सावंत यांना थेट ‘मातोश्री’वरून खासदार विनायक राऊत यांनी फोन करून, मुख्यमंत्री शपथविधीसाठी सपत्नीक निमंत्रित केले आहे. त्यामुळे सावंत दाम्पत्य मंगळवारीच मुंबईकडे रवाना झाले.

सावंत यांनी पंढरीला पायी चालत जाऊन, मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे उद्धव ठाकरे व विकास महाआघाडीचे सरकार पाच वर्षे टिकावे, यासाठी पंधरा दिवसांपूर्वी पंढरीच्या विठ्ठलाला साकडे घातले. या दिंडीमध्ये शिवसेना तालुका उपप्रमुख शिवाजी पडळकर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऊर्फ बंटी दुधाळ, राहुल पाटील, बी. आर. सावंत, उद्धव सावंत, सिद्राम माळी, हनुमंत कोरे, सावळा माळी, अनिल सावंत,  तुकाराम जाधव, प्रकाश सावंत, जी. एस. सावंत, गणेश कोडग, गणेश सावंत, गणेश काशीद, राजश्री माळी, लक्ष्मी माळी सहभागी होते.    दरम्यान, परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शनिवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खानापूर तालुक्यात आले होते. त्यावेळी ठाकरे यांची सावंत दाम्पत्यांनी भेट घेत, मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा व आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकावे यासाठी पंढरीला पायी चालत गेल्याचे सांगितल्यावर, पक्षप्रमुख ठाकरे यांनी सावंत दाम्पत्याला शपथविधीस बोलावणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार मंगळवारी सावंत यांना राऊत यांनी फोनवरून शपथविधीचे आमंत्रण दिले. वीणा, तुळशी वृंदावनसह सावंत दाम्पत्य मुंबईस रवाना झाले आहे.

टॅग्स :ministerमंत्रीShiv SenaशिवसेनाSangliसांगली