शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

‘सी-वर्ल्ड’ला गुंतवणूकदारांची प्रतीक्षा

By admin | Updated: July 15, 2017 23:45 IST

वैभव नाईक : आराखडा निश्चित नसल्याने भूमिका घेणे योग्य नाही

लोकमत न्यूज नेटवर्कमालवण : २०१५ साली झालेल्या आमसभेत आमदार वैभव नाईक यांनी ‘सी-वर्ल्ड’च्या मुद्द्याला बगल दिली होती. मात्र, शनिवारी झालेल्या आमसभेत काँग्रेसच्या गोटातून टप्प्याटप्प्याने कोंडीत पकडण्यात येत असताना काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस महेश जावकर यांनी आमदारांना आपली सी-वर्ल्डविषयी भूमिका काय आहे? हे जनतेसमोर स्पष्ट करण्याचे आवाहन केले. यावेळी आमदार नाईक यांनी सी-वर्ल्ड प्रकल्पासाठी सरकारला गुंतवणूकदारांची प्रतीक्षा आहे. त्यामुळे त्यावर आता भूमिका स्पष्ट करणे योग्य नसल्याचे सांगितले. दरम्यान, काँग्रेस तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी सी-वर्ल्ड प्रकल्पाचा आराखडा नसेल तर गुंतवणूकदार कसे येतील?, असा सवाल केला. आमदार वैभव नाईक यांनी शासनाकडे सी-वर्ल्ड प्रकल्पासाठी गुंतवणूकदार नसल्याची धक्कादायक माहिती दिली. वायंगणी-तोंडवळी येथे साकारणारा सी-वर्ल्ड प्रकल्प हा राजकीय विषय बनला आहे. त्यात आमदार नाईक यांनी दिलेल्या माहितीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.सी-वर्ल्ड प्रकल्पाबाबत विकासाचा गाजावाजा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र या प्रकल्पास कुणीही गुंतवणूकदार शासनाकडे आला नाही. त्यामुळे प्रकल्पाचा आराखडा निश्चित करण्याचा प्रश्नच येत नाही, असे आमदारांनी स्पष्ट केले. +भूसंपादन करणे संयुक्तिक नाहीआमदार नाईक म्हणाले, सी-वर्ल्ड प्रकल्पाची गुंतवणूक पाच हजार कोटींपर्यंत गेलेली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणातील गुंतवणुकीस अद्याप कुणीही गुंतवणूकदार सरकारकडे आलेला नाही. सरकारला गुंतवणूकदाराची प्रतीक्षा आहे. यामुळे गुंतवणूकदार हाती नसताना स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी अगोदर संपादित करणे संयुक्तिक नाही. म्हणूनच आराखडा तयार करण्याचा प्रश्नच येत नाही. गुंतवणूकदार मिळाल्यास प्रकल्पास चालना मिळू शकेल, असेही ते म्हणाले.