शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

हुपरीतील नेर्लेकर यांच्या दारात गुंतवणूकदारांचा ठिय्या; शेगडी, जेवणाच्या साहित्यासह ठोकला तळ

By विश्वास पाटील | Updated: January 29, 2024 08:28 IST

दामदुप्पटचे आमिष

कोल्हापूर : दामदुप्पट योजनेचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये गोळा करून त्याचा परतावा तरी दिला नाहीच परंतू आता मुद्दलही परत द्यायला टाळाटाळ करत असल्याने हुपरी (ता.हातकगणंगले) येथील राजेंद्र भिमराव नेर्लेकर याच्या शिवाजी चौकातील घरासमोर सुमारे तीसहून अधिक गुंतवणूकदारांनी रविवारपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले. त्यांनी जेवणाचे साहित्य, शेगडी सोबत नेली असून पैसे दिल्याशिवाय दारातून उठणार नाही असा पवित्रा घेतला आहे.

उत्तूर (ता.आजरा) येथील देशभूषण देशमाने यांच्या ओळखीच्या माध्यमातून नेर्लेकर यांच्याकडे अनेकांनी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे देशमाने यांच्यासह इचलकरंजी, हातकणंगले, उत्तूर, गडहिंग्लज,राधानगरी, कागल, कोल्हापूर शहर, निपाणी येथील लोकांचा महिलांसह ठिय्या मारलेल्यांत समावेश आहे. गेल्या ऐन दिवाळीतही त्यांनी असाच ठिय्या मारला होता. परंतू नेर्लेकर यांने कधी पोलिस, कधी राजकीय नेते तर कधी दोन नंबरच्या व्यवहारातील गुंडांना मध्यस्थी करायला लावून पैसे परत करण्याची हमी दिली आणि आंदोलन मोडून काढले. त्यातील कांहीनी मध्यस्थी करून त्याच्याकडून पैसे उकळले परंतू गुंतवणूकदारांना दिलेच नाहीत. त्याने रिअल इस्टेट, क्रिप्टो करन्सी, शेअर मार्केटिंगमध्ये गुंतवणूक करून वेगवेगळी आमिषे दाखवून लोकांच्याकडून कोट्यवधी रुपये घेतल्याची लोकांची तक्रार आहे. हे सर्व सुशिक्षित लोक असून पैसे द्या नाहीतर आम्ही दारातून उठणार नाही असा निर्धार करूनच त्यांनी हा ठिय्या मारला आहे. स्वत: नेर्लेकर घरी नाही. परंतू त्यांच्या पत्नीने चर्चेला बोलवले. त्यास लोकांनी नकार दिला. पैसे कधी देणार ते सांगा, आता कोणतेही चर्चा नाही की कुणाची मध्यस्थी नाही. आम्ही शांततेत ठिय्या आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या महिन्यात निमित्तसागर महाराजांचे उपोषण

गेल्या महिन्यात नेर्लेकर यांच्याकडून फसवणूक झाली म्हणून जैन समाजातील निमित्तसागर महाराज १८ डिसेंबरला त्यांच्या दारात आमरण उपोषणाला बसले होते. त्यांनी माध्यमांशी बोलताना अगोदर साडेतीनशे कोटींची फसवणूक झाल्याचा तोंडी आरोप केला. प्रत्यक्षात नंतर त्या्ंनी बँकेच्या माध्यमातून नेर्लेकर यांना दिलेली रक्कम २३ कोटी असल्याचे चर्चेत सांगितले परंतू त्यांच्या उपोषणात महावीर गाट व दक्षिण भारत जैन सभेच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून २० डिसेंबरला त्यांचे उपोषण सोडले. त्यावेळी ४० लाखांवर हा तोडगा निघाल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतू ती रक्कमही महाराजांना दिली आहे की नाही आणि सध्या ते महाराज कुठे आहेत याचा थांगपत्ता नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर