शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

हुपरीतील नेर्लेकर यांच्या दारात गुंतवणूकदारांचा ठिय्या; शेगडी, जेवणाच्या साहित्यासह ठोकला तळ

By विश्वास पाटील | Updated: January 29, 2024 08:28 IST

दामदुप्पटचे आमिष

कोल्हापूर : दामदुप्पट योजनेचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये गोळा करून त्याचा परतावा तरी दिला नाहीच परंतू आता मुद्दलही परत द्यायला टाळाटाळ करत असल्याने हुपरी (ता.हातकगणंगले) येथील राजेंद्र भिमराव नेर्लेकर याच्या शिवाजी चौकातील घरासमोर सुमारे तीसहून अधिक गुंतवणूकदारांनी रविवारपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले. त्यांनी जेवणाचे साहित्य, शेगडी सोबत नेली असून पैसे दिल्याशिवाय दारातून उठणार नाही असा पवित्रा घेतला आहे.

उत्तूर (ता.आजरा) येथील देशभूषण देशमाने यांच्या ओळखीच्या माध्यमातून नेर्लेकर यांच्याकडे अनेकांनी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे देशमाने यांच्यासह इचलकरंजी, हातकणंगले, उत्तूर, गडहिंग्लज,राधानगरी, कागल, कोल्हापूर शहर, निपाणी येथील लोकांचा महिलांसह ठिय्या मारलेल्यांत समावेश आहे. गेल्या ऐन दिवाळीतही त्यांनी असाच ठिय्या मारला होता. परंतू नेर्लेकर यांने कधी पोलिस, कधी राजकीय नेते तर कधी दोन नंबरच्या व्यवहारातील गुंडांना मध्यस्थी करायला लावून पैसे परत करण्याची हमी दिली आणि आंदोलन मोडून काढले. त्यातील कांहीनी मध्यस्थी करून त्याच्याकडून पैसे उकळले परंतू गुंतवणूकदारांना दिलेच नाहीत. त्याने रिअल इस्टेट, क्रिप्टो करन्सी, शेअर मार्केटिंगमध्ये गुंतवणूक करून वेगवेगळी आमिषे दाखवून लोकांच्याकडून कोट्यवधी रुपये घेतल्याची लोकांची तक्रार आहे. हे सर्व सुशिक्षित लोक असून पैसे द्या नाहीतर आम्ही दारातून उठणार नाही असा निर्धार करूनच त्यांनी हा ठिय्या मारला आहे. स्वत: नेर्लेकर घरी नाही. परंतू त्यांच्या पत्नीने चर्चेला बोलवले. त्यास लोकांनी नकार दिला. पैसे कधी देणार ते सांगा, आता कोणतेही चर्चा नाही की कुणाची मध्यस्थी नाही. आम्ही शांततेत ठिय्या आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या महिन्यात निमित्तसागर महाराजांचे उपोषण

गेल्या महिन्यात नेर्लेकर यांच्याकडून फसवणूक झाली म्हणून जैन समाजातील निमित्तसागर महाराज १८ डिसेंबरला त्यांच्या दारात आमरण उपोषणाला बसले होते. त्यांनी माध्यमांशी बोलताना अगोदर साडेतीनशे कोटींची फसवणूक झाल्याचा तोंडी आरोप केला. प्रत्यक्षात नंतर त्या्ंनी बँकेच्या माध्यमातून नेर्लेकर यांना दिलेली रक्कम २३ कोटी असल्याचे चर्चेत सांगितले परंतू त्यांच्या उपोषणात महावीर गाट व दक्षिण भारत जैन सभेच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून २० डिसेंबरला त्यांचे उपोषण सोडले. त्यावेळी ४० लाखांवर हा तोडगा निघाल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतू ती रक्कमही महाराजांना दिली आहे की नाही आणि सध्या ते महाराज कुठे आहेत याचा थांगपत्ता नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर