शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

पोलीस उद्यान रसिकांनी बहरले; देशभरातील कलावंतांची मांदियाळी - अभिजात भारतीय कलेचा आविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 01:34 IST

महोत्सवात अगदी तिळावरील कलाकृतींचाही समावेश आहे. भारताची पारंपरिक लघुचित्रशैली, तांदूळ आर्ट, माती काम, पेन्सिल, मेहंदी, हॅन्डलुम, ज्वेलरी, कागदकाम, रद्दीचे नेपथ्य, शोभेच्या वस्तू, निसर्गचित्र, ग्रामीण संस्कृती दर्शवणारे शिल्प, क्लॉथ पेंटिंग अशा विविध प्रकारच्या कला एकाच परिसरात घडत असल्याने प्रत्येक कलाकृती नावीन्याची अनुभूती देणारी आहे. यासह आर्किटेक्टनी बनवलेल्या डिझाईन्सही येथे मांडण्यात आले आहेत.

ठळक मुद्देकलाब्धि महोत्सवास प्रारंभ।

कोल्हापूर : अभिजात भारतीय कलाविष्कारानेकलाब्धि आर्ट फेस्टिव्हलला शनिवारपासून प्रारंभ झाला. यानिमित्ताने पोलीस उद्यानाच्या हिरवळीवर कलेला बहर आला. देशभरातील कलावंतांच्या मांदियाळीने रसिकांनाही कलेचा निस्सीम आनंद दिला. लघुचित्र शैली, वारली पेंटिंग, निसर्गचित्र, अ‍ॅक्रॅलिक, शिल्पकला, टेराकोटा, कागदकाम, क्लॉथ पेंटिंग, हस्तकला, मांडणी शिल्प, मंदिर स्थापत्य शैली या कलांचे वैश्विक रूप यानिमित्ताने उलगडले.

महोत्सवाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी सुरेंद्र जैन, अमृता जनवाडकर, डॉ. प्रियदर्शनी जैन, मानवी कामत, आर्किटेक्ट रीमा करंजगार, ग्रीष्मा गांधी, देविणा घाटगे, प्राचार्य अजेय दळवी, चित्रकार विजय टिपुगडे उपस्थित होते. भारतीयत्व ही मध्यवर्ती संकल्पना ठेऊन महोत्सवाची रचना करण्यात आली आहे.

यावेळी डॉ. देशमुख म्हणाले, सहा महिला आपलं कुटुंब, करिअर सांभाळून कलेच्या उत्कर्षासाठी अशा प्रकारचा देशपातळीवरील महोत्सव आयोजित करतात, ही कौतुकाची बाब आहे. पोलीस उद्यानासारख्या ठिकाणी कलेचा महोत्सव भरल्याने या परिसरालाही देखणे रूप आले आहे. कलात्मकतेने भारलेल्या वातावरणात मन सुखावून जाते. देशभरातील कलाकारांना एकाच व्यासपीठावर आणणाऱ्या अशा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यापुढेही या परिसरात कलांचा मुक्त आविष्कार घडावा.

यानंतर उद्यानाच्या हिरवळीत आणि झाडांच्या आच्छादनात भारतीय कला-परंपरा आकाराला येऊ लागला. देशातील विविध भागातून आलेले कलावंत आपली कला या कलानगरीच्या रंगमंचावर सादर करीत होते. मिनी आर्ट रसिकांना अचंबित करायला लावणारे होते. तर शिल्पकलेतून कलावंत भारतीयत्व ही संकल्पना घेऊन कलाकृती घडवत होते. अहिंसेचा संदेश देणा-या महात्मा गांधींच्या काठीपासून ते भारताचे वैविध्य रूपांचे दर्शन घडवणारे, लेकुरवाळी विठूमाउली, प्राणी, व्यक्तिशिल्प नजर खिळवून ठेवणारे होते. दुसरीकडे कागदकामची कार्यशाळा सुरू होती. एकीकडे शालेय विद्यार्थी मांडणी शिल्प करण्यात गुंतले होते.

अमृता जनवाडकर यांनी कलाब्धिच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. ग्रीष्मा गांधी यांनी महोत्सवाची मांडणी, नेपथ्याची रचना पर्यावरण संवर्धनाचा उद्देश ठेवून केली असल्याचे सांगितले. मानवी कामत यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर शिल्प स्पर्धा, शालेय मुलांचे मांडणी शिल्प, छायाचित्रण स्पर्धा अशा स्पर्धा झाल्या.

तीळ आर्ट ते फाईन आर्टमहोत्सवात अगदी तिळावरील कलाकृतींचाही समावेश आहे. भारताची पारंपरिक लघुचित्रशैली, तांदूळ आर्ट, माती काम, पेन्सिल, मेहंदी, हॅन्डलुम, ज्वेलरी, कागदकाम, रद्दीचे नेपथ्य, शोभेच्या वस्तू, निसर्गचित्र, ग्रामीण संस्कृती दर्शवणारे शिल्प, क्लॉथ पेंटिंग अशा विविध प्रकारच्या कला एकाच परिसरात घडत असल्याने प्रत्येक कलाकृती नावीन्याची अनुभूती देणारी आहे. यासह आर्किटेक्टनी बनवलेल्या डिझाईन्सही येथे मांडण्यात आले आहेत.

इको फ्रेंडली नेपथ्यपर्यावरणाला केंद्रस्थानी ठेवून महोत्सवाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते रंगमंचामागील पडदा, उद्यानाची सजावट हे सगळे नेपथ्य इको फ्रें डली वस्तूंपासून करण्यात आले होते.नारळाच्या शेंड्या, कवट्या, गोणपाट, पत्रावळी, कागदी प्लेट, जुने पेपर, कागदी रिबीन या साहित्यांनी महोत्सवाचा सुरेख सेटअप उभारला आहे. महोत्सवात कुठेही फ्लेक्स, प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर केलेला नाही.

महोत्सवात आजसकाळी साडेआठ ते दोन : प्रत्यक्ष चित्र स्पर्धासकाळी साडेदहा : किचन कंपोस्ट कार्यशाळादुपारी दोन वाजता : नैसर्गिक रंग तयार करणे कार्यशाळासायंकाळी पाच : विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण समारंभ व समारोप

टॅग्स :kolhapurकोल्हापूरartकला