शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

कुलगुरुपदासाठी उद्यापासून मुलाखती

By admin | Updated: June 3, 2015 01:00 IST

उमेदवारांना पोहोचली पत्रे : शिवाजी विद्यापीठातील तिघांचा समावेश; पात्र पंधरा उमेदवार

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठीच्या मुलाखतीची प्रक्रिया उद्या, गुरुवारी आणि शुक्रवारी (दि. ५) होणार आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात सकाळी दहा वाजल्यापासून मुलाखती होतील. पात्र ठरलेल्या १५ उमेदवारांना मुलाखतीला उपस्थित राहण्याची पत्रे पोहोचली आहेत. यात शिवाजी विद्यापीठातील तीन प्राध्यापकांचा समावेश आहे.गेल्या दोन महिन्यांपासून कुलगुरू निवडीच्या प्रक्रिया सुरू आहेत. त्यात देशभरातून शंभराहून अधिक जणांनी अर्ज दाखल केले आहेत. एप्रिल आणि मेमध्ये अर्जांच्या छाननीची प्रक्रिया दोन टप्प्यांत झाली. मुलाखतीची प्रक्रियादेखील याच पद्धतीने होणार आहे. मुलाखतीच्या पहिल्या टप्प्यासाठी त्रिसदस्यीय समितीने १५ उमेदवारांची निवड केली आहे. यात शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. एम. बी. देशमुख, हिंदी विभागाचे माजी प्रमुख डॉ. अर्जुन चव्हाण आणि जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. एस. पी. गोविंदवार, औरंगाबादमधील देवानंद शिंदे, सोलापूरचे डॉ. एल. पी. देशमुख, पुणे विद्यापीठाचे बी.सी.यू.डी. संचालक व्ही. बी. गायकवाड, भूगर्भशास्त्र विभागातील प्रा. नितीन करमळकर, दिलीप हुके, आदींचा समावेश आहे. यातील डॉ. देशमुख हे यापूर्वी अमरावती, नागपूर विद्यापीठांच्या कुलगुरुपदाच्या प्रक्रियेत अंतिम मुलाखतीपर्यंत पोहोचले होते. डॉ. चव्हाण आणि डॉ. गोविंदवार यांनी पहिल्यांदाच कुलगुरुपदासाठी अर्ज केला असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुलाखतीच्या पहिल्या टप्प्यासाठी पात्र ठरलेल्या १५ उमेदवारांना ई-मेल तसेच पत्राद्वारे मुलाखतीची वेळ आणि दिवस कळविण्यात आला आहे. दरम्यान, मुलाखतीसाठी निवड झालेल्या डॉ. देशमुख व गोविंदवार यांनी ई-मेल, पत्र आले असल्याचे सांगितले. डॉ. चव्हाण यांचा मोबाईल बंद असल्याने संपर्क झाला नाही. (प्रतिनिधी)नवीन कुलगुरू १५ जूनपूर्वी रुजू होणारमुलाखतीची प्रक्रिया त्रिसदस्यीय समिती पूर्ण करणार आहे. समितीचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश के. एस. राधाकृष्णन असून उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव संजय चहांदे व विद्यापीठ प्रतिनिधी रिजनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजीचे कार्यकारी संचालक डॉ. दिनकर साळुंके सदस्य आहेत. मुलाखतीच्या पहिल्या टप्प्यातून अंतिम मुलाखतीसाठी पाच उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अंतिम मुलाखतीची प्रक्रिया शनिवारी (दि. ६) होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाविद्यालये १५ जूनपासून सुरू होणार आहेत. यापूर्वी विद्यापीठाला नवे कुलगुरू देण्याच्या दृष्टीने समितीची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे सोमवार (दि. ८) पूर्वी मुलाखतीची प्रक्रिया समिती पूर्ण करणार आहे.