शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कुलसचिव पदासाठी १५ नोव्हेंबरला मुलाखती

By admin | Updated: October 19, 2016 00:34 IST

अर्जांच्या छाननीतून मुलाखतीच्या प्रक्रियेसाठी १७ उमेदवार पात्र ठरले आहेत.

कोल्हापूर : गेल्या दीड वर्षभरापासून प्रभारी असलेल्या शिवाजी विद्यापीठातील कुलसचिव पदासाठी दि. १५ नोव्हेंबरला मुलाखतीची प्रक्रिया होणार आहे. या प्रक्रियेअंतर्गत १७ उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत.कुलसचिव पदासाठीची निवड प्रक्रिया विद्यापीठाने दि. २७ मेपासून सुरू केली आहे. त्याअंतर्गत प्रशासनाने दि. १६ जूनपर्यंत आॅनलाईन अर्ज मागविले होते. त्यानुसार ५० जणांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले. या आॅनलाईन अर्जाची प्रत विद्यापीठ कार्यालयात जमा करावयाची मुदत दि. २१ जूनपर्यंत होती. या मुदतीपर्यंत आणि वेळेत २८ जणांचे अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले. या अर्जांच्या छाननीतून मुलाखतीच्या प्रक्रियेसाठी १७ उमेदवार पात्र ठरले आहेत. त्यामध्ये किशोर माने, राजसिंग चव्हाण, सयाजीराजे मोकाशी, भारतभूषण कांबळे, भारत पाटील, जयंत देशमुख, सर्जेराव शिंदे, सुनील मिरगणे, गोविंद कोळेकर, संजय माळी, संजयकुमार गायकवाड, शरद फुलारी, धनंजय माने, मिलिंद गोडबोले, यशवंत कोळेकर, पंढरीनाथ पवार, विलास नांदवडेकर यांचा समावेश आहे. दरम्यान, या पात्र उमेदवारांच्या मुलाखती दि. १५ नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजल्यापासून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या हॉलमध्ये होणार आहेत. आठ सदस्यीय असलेल्या कुलसचिव निवड समितीतर्फे संबंधित उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी दिली. ते म्हणाले, गणेशोत्सव, दसरा या सणांमुळे निवड समितीतील तज्ज्ञांची वेळ मिळत नव्हती. त्यामुळे मुलाखती लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. तज्ज्ञांनी वेळ दिल्यानुसार १५ नोव्हेंबरला मुलाखती होतील. (प्रतिनिधी)