शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
2
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
3
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
4
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
5
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
6
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
7
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
9
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
10
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू
11
प्रेमाचा त्रिकोण! आमच्या दोघींपैकी एकीला निवड; गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीने केला मोठा कांड
12
२४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन... १५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचं घबाड
13
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
14
एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका
15
वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..."
16
नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात! मोदी सरकारने आणली 'ही' खास योजना, कंपनीलाही मिळेल फायदा!
17
दिल्लीतील बनावट कॉल सेंटरवर छापा, 'अशा' प्रकारे परदेशातून कमावलेले १०० कोटी!
18
माजी आमदाराची मुलगी अन् पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा रहस्यमय अंत; मृत्यूपूर्वीचा Video आला, मग...
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींना ED नं चौकशीसाठी बोलावलं, १७ हजार कोटींच्या कथित लोन फ्रॉड केसमध्ये टाकलेले छापे

Kolhapur: कुठे आहे चित्रपट महामंडळ? अस्तित्व राहिले कागदावर; अंतर्गत राजकारणाने पोखरले 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: July 30, 2025 17:36 IST

शासन दरबारी शून्य महत्त्व; काम ठप्प

इंदुमती गणेशकोल्हापूर : राज्य शासनाने चित्रपट अनुदानासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या प्रमाणपत्राची अट रद्द केल्याने कोल्हापूरसह महाराष्ट्राला लाभलेल्या सिनेसृष्टीची मातृसंस्था असलेल्या या महामंडळाचे अस्तित्व आता फक्त कागदापुरते मर्यादित राहिले आहे. गेल्या सात वर्षांपासून अंतर्गत राजकारणाच्या वाळवीने महामंडळाचा पायाच ढासळला असतानाही दोन पावले माघार घ्यायची तयारी नाही.. मग, महामंडळ संपले तरी चालेल, अशी एकूण मानसिकता आहे.मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांनी शासन दरबारी लढे देऊन, प्रयत्न करून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची स्थापना केली. कलावंतांपासून शेवटच्या कामगारापर्यंत सर्वांना न्याय मिळावा, शासकीय योजनांचा फायदा मिळावा यासाठी महामंडळ काम करीत होते. अगदी चित्रनगरीच्या, जयप्रभाचा लढाही महामंडळाच्या पुढाकाराने लढला गेला. पण, आता हा सगळा इतिहास झाला आहे; कारण, गेल्या सात वर्षांपासून अंतर्गत राजकारण महामंडळालाही वरचढ झाले आहे.वादाची कारणे

  • तीन वर्षांत सभासद संख्या २० हजारांवरून ४५ हजारांवर नेली.
  • निवडणुकीत मतदानासाठी पात्र सभासदांची संख्या ७ हजारांवरून ३ हजारांपर्यंत खाली आली.
  • सभासदत्वावरून चार जण उच्च न्यायालयात गेले.
  • उच्च न्यायालयात दावा सुरू असतानाच आता प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे.

तीनवेळा बैठका निष्फळया वादातून तोडगा काढण्यासाठी काही जणांच्या मध्यस्थीने तीनवेळा अध्यक्ष व संचालकांमध्ये बैठका झाल्या आहेत. शेवटच्या बैठकीत तर समझोता झाल्याचे सगळ्यांनी जाहीर केले; पण, महिन्याभराने पुन्हा दोन्ही बाजू एकमेकांविराेधात पुढे आल्या. सध्याच्या संचालकांची २०१५-२६ साली निवडणुकीने नियुक्ती झाली. तीन वर्षांनी त्यांच्यात वाद सुरू झाले. आता मुदत संपून पाच वर्षे झाली तरी यांच्यातील वाद मिटेनात.

वाद मिटविण्यासाठी मी तीनवेळा पुढाकार घेतला; पण, ते सर्वोच्च न्यायालयातील दावा मागे घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे उच्च न्यायालयात केस उभी राहिली नाही. या वादामुळे एम्फा, निर्माता महामंडळ, वेस्टर्न इंडिया अशा खासगी संस्था मोठ्या होत आहेत. आता प्रमाणपत्राची अटही रद्द केल्याने महामंडळाला महत्त्वच राहिले नाही. मेघराज भोसले अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ 

मी शब्द देतो. अध्यक्ष उच्च न्यायालयातील दावा मागे घेणार असतील तर आम्ही पण सर्वोच्च न्यायालयातील दावा मागे घेऊ. महामंडळाला २० हजार सभासद करायला २० वर्षे गेली यांनी तीन वर्षांत ४५ हजार सभासद कसे केले, हा आमचा आक्षेप आहे. नियमानुसार जेवढे सभासद पात्र आहेत तेवढ्या जणांवर निवडणूक होऊन जाऊ दे. - मिलिंद अष्टेकर, निर्मिती व्यवस्थापक