शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

सीमावासीयांच्या भल्यासाठी आता आंतरराज्य समन्वय; महाराष्ट्र-कर्नाटकच्या राज्यपालांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2022 08:18 IST

कोल्हापुरात पार पडली बैठक

कोल्हापूर : महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील अधिकाऱ्यांच्या चर्चेतून आलेल्या सामाईक समस्या राज्यस्तरावरून सोडविण्याबाबत त्या त्या शासनांना कळविण्याच्या सूचना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी शुक्रवारी दिल्या. सीमावर्ती भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाने समन्वय वाढविण्यासाठी प्रयत्न करा, असेही त्यांनी सांगितले.

सीमावर्ती भागातील जिल्ह्यांच्या आंतरराज्यीय सामाईक मुद्द्यांबाबत कोल्हापुरात दोन्ही राज्यांची समन्वय बैठक दोन्ही राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, उस्मानाबाद, सोलापूर आणि लातूर हे पाच तर कर्नाटकातील चार जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित होते.

कोश्यारी यांनी ही समन्वय बैठक लाभदायक ठरेल, असेही सूचित केले. गेहलोत यांनी सर्वांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीत सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या सादरीकरणाचे प्रस्ताव दोन्ही राजभवनकडे पाठवावेत,   असे दोन्ही राज्यपालांनी सांगितले.

दोन्ही भाषांत दिशादर्शक फलक

दोन्ही राज्यांच्या सीमा भागात मराठी आणि कन्नड भाषकांच्या सोयीसाठी दोन्ही भाषांत दिशादर्शक फलक करण्यासह काही सामाईक मुद्यांवर समन्वय बैठकीत चर्चेनंतर एकमत झाले.

जत-अक्कलकोटला पाणी सोडा

सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले की, २०१६-१७ मध्ये महाराष्ट्र राज्याने कर्नाटक राज्यातील अवर्षणप्रवण भागासाठी ६.८६५ टीएमसी पाणी सोडले होते, त्याप्रमाणे कर्नाटक शासनाने महाराष्ट्र राज्यातील जत व अक्कलकोट भागासाठी पाणी सोडावे.

अलमट्टीची पाणीपातळी मर्यादित ठेवा

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कृष्णा नदीतील पुराचे पाणी बाहेर काढण्यासाठी  १५ ऑगस्टपर्यंत अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी ५१७ ते ५१७.५० मीटरच्या मर्यादेत राखावी अशी विनंती केली.

सीमावर्ती भागातील गुन्हेगारी रोखण्यावर भर

आंतरराज्य समन्वय बैठकीत परस्परांच्या सहकार्याने मुख्यत: गुन्हेगारी रोखण्यावर भर देण्यात आला. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांत चांगला समन्वय असेल तर अनेक प्रश्नांची सोडवणूक करणे शक्य असल्याचा विश्वास बैठकीत व्यक्त झाला.

भारत वाघमारे (उपजिल्हाधिकारी, सोलापूर) : बेकायदेशीरमोलॅसिस उचलले जाते त्या कारखान्यात तपासणीसाठी सहज प्रवेश करणे, तसेच अवैध दारूविक्री, मोलॅसिस गुन्ह्यासंदर्भात दोन्ही राज्यांतील अधिकाऱ्यांमध्ये समन्वय व संयुक्तरीत्या छापेमारी आवश्यकता आहे.

सचिन ओंबासे (उस्मानाबाद) : कलबुर्गी येथील बेकायदेशीर लिंगनिदानबाबतच्या ऑनलाइन तक्रारीसह स्टिंग ऑपरेशनप्रमाणेच बेकायदेशीर लिंगनिदान करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. गुटखा, पानमसाला व अनुषंगिक अन्य बाबींवर महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकनेही निर्बंध घालावेत.

पृथ्वीराज बी. पी. (लातूर) : कारंजा धरणातून पाणी सोडून ते बिदर जिल्ह्यातील चंद्रपूर बॅरेजपर्यंत नेण्यासाठी सिंधीकामठ केटिवेअरचे गेट्स काढणे, बसविणे याबाबतची थकबाकी, तसेच या पाण्याचा वापर करणाऱ्या कर्नाटकातील शेतकऱ्यांची थकबाकी द्यावी.वाळू उत्खनन, स्वातंत्र्यसैनिकांच्या नोंदी, याबाबत माहितीची देवाणघेवाण करावी.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटक