शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन गरजेचे --आनंद मेणसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:53 IST

जाती व्यवस्थेमुळे भारतीय समाजाचे अतोनात नुकसान झाले आहे. भारतातून जातींच्या उच्चाटनासाठी आजच्या काळात आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कम्युनिस्ट विचारवंत प्रा. डॉ. आनंद मेणसे यांनी केले. श्रमिक प्रतिष्ठान आणि

ठळक मुद्दे राजस्तरीय कॉ. गोविंद पानसरे युवाजागर शिबिर

पन्हाळा : जाती व्यवस्थेमुळे भारतीय समाजाचे अतोनात नुकसान झाले आहे. भारतातून जातींच्या उच्चाटनासाठी आजच्या काळात आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कम्युनिस्ट विचारवंत प्रा. डॉ. आनंद मेणसे यांनी केले. श्रमिक प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने पन्हाळा येथील संजीवन इंजिनिअरिंग महाविद्यालयात आयोजित तीन दिवसीय राज्यस्तरीय कॉम्रेड गोविंद पानसरे युवाजागर शिबिरात ‘जात वास्तव आणि विद्रोही परंपरा’ या विषयावर ते बोलत जाते.

देशातील जाती व्यवस्थेचा परिचय करून देताना डॉ. मेणसे म्हणाले की, भारतीय समाज आजही जाती व्यवस्थेने तयार केलेल्या रुढी-परंपरा सोडायला तयार नाही. आजसुद्धा शहरात जात समूहाच्या अपार्टमेंट उभारल्या जात आहेत, हे भयानक आहे. जातीच्या उतरंडीमुळे समाजात खालच्या स्तरावर असणाऱ्या जात समूहांचे मोठ्या प्रमाणात शोषण होते. जाती व्यवस्थेच्या विरोधात१२ व्या शतकात विद्रोह करणारे बसवेश्वर हे कृतिशील विचारवंत होते. त्यांनी ‘अनुभवमंटप’ संकल्पनेच्या माध्यमातून सर्व जातींच्या लोकांना एकत्र आणले. इतकेच नव्हे, तर १२ व्या शतकात आंतरजातीय विवाह घडवून आणला. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आणि महात्मा गांधींनीही जातीच्या उच्चाटनासाठी आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार केला असून, त्यांच्या विचारांची अंमलबजावणी आजच्या काळातही करणे गरजेचे आहे.

विशिष्ट विचारसरणीचे सरकार सत्तेवर येऊन आठवडा होत नाही तोवर आता समाजमाध्यमांतून सतीप्रथेचे उदात्तीकरण सुरू झाले आहे. आरक्षण रद्द करण्याची मागणीही जोरकसपणे येऊ लागली आहे; पण मागास जातींच्या उत्थानासाठी शिक्षण, नोकऱ्यांमध्ये आरक्षण गरजेचे आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.शनिवारी शिबिराच्या दुसºया दिवशी ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते शेखर सोनाळकर यांनी ‘भारताचा स्वातंत्र्यलढा, बहुविधता व धर्मनिरपेक्षता’ या विषयावर, प्रसिद्ध कवी, अनुवादक गणेश विसपुते यांनी ‘कला, साहित्य, संस्कृती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ या विषयावर, विद्रोही कवी वाहरू सोनवणे यांनी ‘आदिवासी संस्कृती व भारत’, ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांनी ‘लोकसंस्कृती व भारत’ या विषयावर आणि साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक दिलीप बोरकर यांनी ‘गोवन संस्कृती’ या विषयावर मार्गदर्शन केले.

याप्रसंगी काश्मीर प्रश्नांचे अभ्यासक जतीन देसाई, लेखिकाप्रा. श्रुती तांबे, वसुधा पवार, प्रा. डॉ. मेघा पानसरे, आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. मंजुश्री पवार यांनी स्वागत व प्रास्तविक केले. सुशील लाड यांनी आभार मानले.

पन्हाळा येथे कॉम्रेड गोविंद पानसरे युवाजागर शिबिरात ज्येष्ठ कम्युनिस्ट विचारवंत प्रा. डॉ. आनंद मेणसे यांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovind Pansareगोविंद पानसरे