शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन गरजेचे --आनंद मेणसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:53 IST

जाती व्यवस्थेमुळे भारतीय समाजाचे अतोनात नुकसान झाले आहे. भारतातून जातींच्या उच्चाटनासाठी आजच्या काळात आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कम्युनिस्ट विचारवंत प्रा. डॉ. आनंद मेणसे यांनी केले. श्रमिक प्रतिष्ठान आणि

ठळक मुद्दे राजस्तरीय कॉ. गोविंद पानसरे युवाजागर शिबिर

पन्हाळा : जाती व्यवस्थेमुळे भारतीय समाजाचे अतोनात नुकसान झाले आहे. भारतातून जातींच्या उच्चाटनासाठी आजच्या काळात आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कम्युनिस्ट विचारवंत प्रा. डॉ. आनंद मेणसे यांनी केले. श्रमिक प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने पन्हाळा येथील संजीवन इंजिनिअरिंग महाविद्यालयात आयोजित तीन दिवसीय राज्यस्तरीय कॉम्रेड गोविंद पानसरे युवाजागर शिबिरात ‘जात वास्तव आणि विद्रोही परंपरा’ या विषयावर ते बोलत जाते.

देशातील जाती व्यवस्थेचा परिचय करून देताना डॉ. मेणसे म्हणाले की, भारतीय समाज आजही जाती व्यवस्थेने तयार केलेल्या रुढी-परंपरा सोडायला तयार नाही. आजसुद्धा शहरात जात समूहाच्या अपार्टमेंट उभारल्या जात आहेत, हे भयानक आहे. जातीच्या उतरंडीमुळे समाजात खालच्या स्तरावर असणाऱ्या जात समूहांचे मोठ्या प्रमाणात शोषण होते. जाती व्यवस्थेच्या विरोधात१२ व्या शतकात विद्रोह करणारे बसवेश्वर हे कृतिशील विचारवंत होते. त्यांनी ‘अनुभवमंटप’ संकल्पनेच्या माध्यमातून सर्व जातींच्या लोकांना एकत्र आणले. इतकेच नव्हे, तर १२ व्या शतकात आंतरजातीय विवाह घडवून आणला. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आणि महात्मा गांधींनीही जातीच्या उच्चाटनासाठी आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार केला असून, त्यांच्या विचारांची अंमलबजावणी आजच्या काळातही करणे गरजेचे आहे.

विशिष्ट विचारसरणीचे सरकार सत्तेवर येऊन आठवडा होत नाही तोवर आता समाजमाध्यमांतून सतीप्रथेचे उदात्तीकरण सुरू झाले आहे. आरक्षण रद्द करण्याची मागणीही जोरकसपणे येऊ लागली आहे; पण मागास जातींच्या उत्थानासाठी शिक्षण, नोकऱ्यांमध्ये आरक्षण गरजेचे आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.शनिवारी शिबिराच्या दुसºया दिवशी ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते शेखर सोनाळकर यांनी ‘भारताचा स्वातंत्र्यलढा, बहुविधता व धर्मनिरपेक्षता’ या विषयावर, प्रसिद्ध कवी, अनुवादक गणेश विसपुते यांनी ‘कला, साहित्य, संस्कृती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ या विषयावर, विद्रोही कवी वाहरू सोनवणे यांनी ‘आदिवासी संस्कृती व भारत’, ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांनी ‘लोकसंस्कृती व भारत’ या विषयावर आणि साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक दिलीप बोरकर यांनी ‘गोवन संस्कृती’ या विषयावर मार्गदर्शन केले.

याप्रसंगी काश्मीर प्रश्नांचे अभ्यासक जतीन देसाई, लेखिकाप्रा. श्रुती तांबे, वसुधा पवार, प्रा. डॉ. मेघा पानसरे, आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. मंजुश्री पवार यांनी स्वागत व प्रास्तविक केले. सुशील लाड यांनी आभार मानले.

पन्हाळा येथे कॉम्रेड गोविंद पानसरे युवाजागर शिबिरात ज्येष्ठ कम्युनिस्ट विचारवंत प्रा. डॉ. आनंद मेणसे यांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovind Pansareगोविंद पानसरे