शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
2
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
3
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
4
BSNL नं आणली Mother's Day ऑफर, स्वस्त केले आपले ३ रिचार्ज प्लान्स; पाहा डिटेल्स
5
Operation Sindoor : "जे काही घडलं ते बरोबर, पहलगाममध्ये धर्म विचारणाऱ्या ४ दहशतवाद्यांचाही केला पाहिजे खात्मा"
6
विजापूरमध्ये भीषण चकमक; कर्रेगुट्टा टेकड्यांमध्ये लपलेल्या 15+ नक्षलवाद्यांचा खात्मा
7
त्यांनी महिलांना मारलं नाही पण...; पहलगाम हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी 'ऑपरेशन सिंदूर'वर काय म्हणाले?
8
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
9
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
10
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
11
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक
12
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
13
Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना
14
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
15
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
16
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
17
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
18
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
19
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
20
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन

विमा कंपनीला झटका

By admin | Updated: December 2, 2015 00:36 IST

अपघात विमा घेण्यासाठी मृत शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी आपआपल्या तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्याकडे अर्ज केला.

गोंदिया : अपघात विमा घेण्यासाठी मृत शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी आपआपल्या तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्याकडे अर्ज केला. परंतु कृषी अधिकारी कार्यालयाने दिरंगाई करुन अर्जदारांना नाहक त्रास देण्याचा प्रकार केला. या संदर्भात विमा कंपनी व तालुका कृषी अधिकारी यांच्याविरोधात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाकडे तक्रार करण्यात आली. या तक्रारीवर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण केंद्राने व्याजासह अर्जदारांना विम्याचे पैसे देण्याचे आदेश शुक्रवार (२७) रोजी देण्यात आले. आमगाव तालुक्याच्या कुणबीटोला येथील शेतकरी सुखराम दशरथ भांडारकर यांच्या मालकीची सर्वे नंबर ३९६/१ चिरचाळबांध येथे त्यांची जमीन आहे. रेल्वेच्या धडकेत १ मे २०१३ रोजी सुखराम भांडारकर यांचा मृत्यु झाला. या संदर्भात त्यांची पत्नी हिरन सुखराम भांडारकर रा. कुणबीटोला यांनी कृषी अपघात विम्याचे १ लाख रुपये मिळावे यासाठी कृषी अधिकाऱ्याकडे १६ डिसेंबर २०१३ रोजी अर्ज केला. परंतु दि. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने दस्तावेज नसल्याचे कारण दाखवून त्यांचा दावा फेटाळला. यासंदर्भात त्यांनी ४ एप्रिल २०१५ रोजी ग्राहक मंचात तक्रार केली. या प्रस्तावात घटनास्थळ पंचनामा न दिल्यामुळे त्यांचा अपघाती मृत्यू नाही तर आत्महत्या असल्याचे कारण सांगून विमा कंपनीने त्यांचा दावा फेटाळला होता. दुसरे प्रकरण देवरी तालुक्यातील मुल्ला येथील आहे. मुल्ला येथील फुलनबाई ताराचंद भुते २० सप्टेंबर २०१३ रोजी शेतात काम करीत असताना त्यांना विषारी सापाने चावा घेतल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या नावाची शेती सालेकसा तालुक्याच्या धानोली येथे आहे.यासंदर्भात त्यांचा मुलगा देवेंद्र ताराचंद भुते यांनी ३ डिसेंबर २०१३ रोजी तालुका कृषी अधिकारी देवरी यांच्याकडे अर्ज केला. परंतु विमा कंपनीने त्यांचे प्रस्ताव मंजूर केले नाही. या संदर्भात भुते यांनी २३ मार्च २०१५ रोजी ग्राहक तक्रार निवारण केंद्रात अर्ज केले. वारसानाचे नाहरकत प्रमाणपत्र न दिल्यामुळे सदर प्रकरण नामंजूर करावे असे विरुद्ध पक्षाच्या वकिलांचे म्हणणे होते. परंतु तक्रारकर्ता एकटाच वारसान असून त्यांच्या बहिणींचे लग्न झाल्यामुळे सध्या वारसान ते एकटेच आहेत हे स्पष्ट झाले. दोन्ही आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष अतुल आळशी यांनी दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)ग्राहक न्यायालयाने असा दिला आदेशआमगाव तालुक्याच्या कुणबीटोला येथील शेतकरी सुखराम दशरथ भांडारकर यांच्या प्रकरणात ग्राहक न्यायालयाने अपघाती विम्याचे १ लाख रुपये १७ एप्रिल २०१५ पासून दरसाल, दरशेकडा ९ टक्के व्याजासह देण्यात यावे तसेच तक्रारकर्तीला मानसिक त्रासापोटी ५ हजार रुपये, तक्रारीचा खर्च ५ हजार रुपये महिन्याभराच्या आत देण्याचे आदेश दिले. तर मुल्ला येथील फुलनबाई ताराचंद भुते यांच्या प्रकरणात १ लाख रूपये व ३० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले. २३ मार्च २०१५ पासून दरसाल, दरशेकडा ९ टक्के व्याजदराने १ लाख रुपयाचा व्याजासह महिन्याभराच्या आत देण्याचे आदेश दिले.