शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

विमा कंपन्या मालामाल, शेतकरी कंगाल- संजय पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:17 IST

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या सहकार्याने शेतकऱ्यांना नागवून विमा कंपन्या मालामाल झाल्या असून शेतकरी मात्र कंगाल झाला आहे. सरकारने याबाबत ...

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या सहकार्याने शेतकऱ्यांना नागवून विमा कंपन्या मालामाल झाल्या असून शेतकरी मात्र कंगाल झाला आहे. सरकारने याबाबत शेतकऱ्यांना न्याय दिला नाहीतर आंदोलन उभे करू, असा इशारा कॉंग्रेसचे सचिव संजय पाटील यांनी पत्रकातून दिला आहे.

यापूर्वी झालेल्या राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत देशातील सर्वात मोठी सरकारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाने विमा कंपन्या तकलादू कारणे देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाकारत आहेत, असे पत्रच दिलेले आहे. तसेच बहुतांश विमा कंपन्या हेच करतात. एचडीएफसी बँकेने देखील यासंदर्भातील माहिती राज्य सरकार समोर आणून सरकारने यात हस्तक्षेप करावा असे म्हटले आहे. तसेच पीक विम्याचे हप्ते भरून घेतले पण नुकसानभरपाई दिली नाही त्या विमा हप्त्याची रक्कम तत्काळ परत देण्याची गरज होती. यावरून शेतकऱ्यांमध्ये किती असंतोष आहे, हे लक्षात येते.

यासाठी केंद्र सरकार आणि विमा कंपन्यांच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन केले जाणार असून त्यांच्या कचाट्यातून शेतकऱ्यांना सोडविण्यासाठी आंदोलन छेडू, असा इशारा संजय पाटील यांनी दिला आहे.