शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
4
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
5
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
6
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
7
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
8
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
9
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
10
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
11
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
12
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
13
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
14
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
15
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
16
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
17
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
18
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
19
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

अपुरी, चुकीची माहिती हेच ई-पास नाकारण्याचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 12:23 IST

परगावी जाण्यासाठी नागरिकांकडून भरल्या जाणाऱ्या ई-पास अर्जात अपुरी आणि चुकीची माहिती भरल्याने गेल्या चार महिन्यांत एक लाख ६८ हजार ई पास प्रशासनाने नामंजूर केले. एक लाख २८ हजार अर्ज मंजूर असून सध्या केवळ चार हजार ५०० अर्ज प्रलंबित आहेत. आजही प्रतिदिन ऑनलाईन सरासरी तीन हजार अर्ज केले जातात.

ठळक मुद्देअपुरी, चुकीची माहिती हेच ई-पास नाकारण्याचे कारणसाडेचार हजार पास प्रलंबित : प्रतिदिन तीन हजार पासची नोंदणी

कोल्हापूर : परगावी जाण्यासाठी नागरिकांकडून भरल्या जाणाऱ्या ई-पास अर्जात अपुरी आणि चुकीची माहिती भरल्याने गेल्या चार महिन्यांत एक लाख ६८ हजार ई पास प्रशासनाने नामंजूर केले. एक लाख २८ हजार अर्ज मंजूर असून सध्या केवळ चार हजार ५०० अर्ज प्रलंबित आहेत. आजही प्रतिदिन ऑनलाईन सरासरी तीन हजार अर्ज केले जातात.

कोल्हापूरच्याजिल्हाधिकारी कार्यालयातून फक्त बाहेरगावी जाण्यासाठी पास दिले जातात. पुणे किंवा अन्य कोणत्याही शहरातून कोल्हापुरात यायचे असेल तर ते पास संबंधित जिल्ह्याकडून दिले जातात; परंतु तरीही लोक येथे येऊन तक्रारी करतात.मेपासून नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याची परवानगी देण्यात आली. तेव्हापासून महसूलचे १० हून अधिक कर्मचारी केवळ ई-पास देत आहेत. मंजूर पासच्या तुलनेत पास नामंजूर होण्याचे प्रमाण जास्त आहे. नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रशासनाबद्दल नाराजी आहे. त्याबाबत सोमवारी (दि. १०) रात्री ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांनीही सोशल मीडियावर तक्रार केली होती. त्याची दखल जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी घेतली. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गवस यांच्या जावयाचा पास तातडीने मंजूर करून दिला.कोल्हापुरातून बाहेर जाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून हे ई-पास मंजूर केले जातात. शिवाय ते केवळ एका दिवसासाठीचेच असतात. म्हणजे व्यक्ती बाहेरगावी गेली की पुढील २४ तासांतच त्यांनी परत कोल्हापुरात येणे अपेक्षित असते. मात्र अनेकजण तीन-चार दिवसांच्या मुदतीचे अर्ज करतात, काहीजणांनी आधार कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र अशी कागदपत्रांची पूर्तता व्यवस्थित केलेली नसते.

अनेकजण योग्य कारण देत नाहीत. त्यांचे कारण आणि मंजुरीच्या तारखेत ताळमेळ नसतो. खूप वेळा तर अर्ज मंजूर झालेला असतो; पण त्यांनी लिंकवर जाऊन ते बघितलेलेच नसते. बऱ्याचदा काहीतरी कारण द्यायचे आणि तुम्ही पास मंजूरच का करत नाही म्हणून भांडत यायचे अशा प्रकारांना कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागते.नाकारण्याची कारणे

  • इतर जिल्ह्यातून कोल्हापुरात येण्याचा अर्ज
  • परतीचा कालावधी २४ तासांहून अधिक
  • आधार कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र न जोडणे
  • कारण नीट न लिहिणे, अथवा अपुरी व चुकीची माहिती

सध्या विभागाकडे गेल्या दोन दिवसांचेच अर्ज प्रलंबित आहेत. तातडीचे आणि अत्यावश्यक कारण असेल तर नागरिकांनी परगावी जावे. त्यासाठीचे अर्जही व्यवस्थित व प्रशासनाच्या नियमानुसार भरावेत.-रंजना बिचकरई-पास मंजूर कक्ष अधिकारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर