शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

अपुरी, चुकीची माहिती हेच ई-पास नाकारण्याचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 12:23 IST

परगावी जाण्यासाठी नागरिकांकडून भरल्या जाणाऱ्या ई-पास अर्जात अपुरी आणि चुकीची माहिती भरल्याने गेल्या चार महिन्यांत एक लाख ६८ हजार ई पास प्रशासनाने नामंजूर केले. एक लाख २८ हजार अर्ज मंजूर असून सध्या केवळ चार हजार ५०० अर्ज प्रलंबित आहेत. आजही प्रतिदिन ऑनलाईन सरासरी तीन हजार अर्ज केले जातात.

ठळक मुद्देअपुरी, चुकीची माहिती हेच ई-पास नाकारण्याचे कारणसाडेचार हजार पास प्रलंबित : प्रतिदिन तीन हजार पासची नोंदणी

कोल्हापूर : परगावी जाण्यासाठी नागरिकांकडून भरल्या जाणाऱ्या ई-पास अर्जात अपुरी आणि चुकीची माहिती भरल्याने गेल्या चार महिन्यांत एक लाख ६८ हजार ई पास प्रशासनाने नामंजूर केले. एक लाख २८ हजार अर्ज मंजूर असून सध्या केवळ चार हजार ५०० अर्ज प्रलंबित आहेत. आजही प्रतिदिन ऑनलाईन सरासरी तीन हजार अर्ज केले जातात.

कोल्हापूरच्याजिल्हाधिकारी कार्यालयातून फक्त बाहेरगावी जाण्यासाठी पास दिले जातात. पुणे किंवा अन्य कोणत्याही शहरातून कोल्हापुरात यायचे असेल तर ते पास संबंधित जिल्ह्याकडून दिले जातात; परंतु तरीही लोक येथे येऊन तक्रारी करतात.मेपासून नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याची परवानगी देण्यात आली. तेव्हापासून महसूलचे १० हून अधिक कर्मचारी केवळ ई-पास देत आहेत. मंजूर पासच्या तुलनेत पास नामंजूर होण्याचे प्रमाण जास्त आहे. नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रशासनाबद्दल नाराजी आहे. त्याबाबत सोमवारी (दि. १०) रात्री ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांनीही सोशल मीडियावर तक्रार केली होती. त्याची दखल जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी घेतली. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गवस यांच्या जावयाचा पास तातडीने मंजूर करून दिला.कोल्हापुरातून बाहेर जाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून हे ई-पास मंजूर केले जातात. शिवाय ते केवळ एका दिवसासाठीचेच असतात. म्हणजे व्यक्ती बाहेरगावी गेली की पुढील २४ तासांतच त्यांनी परत कोल्हापुरात येणे अपेक्षित असते. मात्र अनेकजण तीन-चार दिवसांच्या मुदतीचे अर्ज करतात, काहीजणांनी आधार कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र अशी कागदपत्रांची पूर्तता व्यवस्थित केलेली नसते.

अनेकजण योग्य कारण देत नाहीत. त्यांचे कारण आणि मंजुरीच्या तारखेत ताळमेळ नसतो. खूप वेळा तर अर्ज मंजूर झालेला असतो; पण त्यांनी लिंकवर जाऊन ते बघितलेलेच नसते. बऱ्याचदा काहीतरी कारण द्यायचे आणि तुम्ही पास मंजूरच का करत नाही म्हणून भांडत यायचे अशा प्रकारांना कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागते.नाकारण्याची कारणे

  • इतर जिल्ह्यातून कोल्हापुरात येण्याचा अर्ज
  • परतीचा कालावधी २४ तासांहून अधिक
  • आधार कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र न जोडणे
  • कारण नीट न लिहिणे, अथवा अपुरी व चुकीची माहिती

सध्या विभागाकडे गेल्या दोन दिवसांचेच अर्ज प्रलंबित आहेत. तातडीचे आणि अत्यावश्यक कारण असेल तर नागरिकांनी परगावी जावे. त्यासाठीचे अर्जही व्यवस्थित व प्रशासनाच्या नियमानुसार भरावेत.-रंजना बिचकरई-पास मंजूर कक्ष अधिकारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर