शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

संस्थांनी ‘लोकमान्य’चा आदर्श घ्यावा

By admin | Updated: March 7, 2016 00:15 IST

फडणवीस यांचे आवाहन : पुणे विभागीय कार्यालयाचे उद्घाटन

कोल्हापूर : सहकाराचा संस्कार जपणाऱ्या लोकमान्य सोसायटीसारख्या संस्थांनी राज्याच्या विकासात मोलाची भर घातली आहे. त्यामुळे इतर संस्थांनीही त्यातून आदर्श घेऊन ‘लोकमान्य’प्रमाणे पथदर्शी काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. लोकमान्य मल्टिपर्पज को-आॅप. सोसायटीच्या सेनापती बापट रोड, पुणे येथील स्वमालकीच्या चौमजली विभागीय कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अण्णा अलगुडे, सोसायटीचे संस्थापक-अध्यक्ष व ‘तरुण भारत’चे सल्लागार-संपादक किरण ठाकूर, बेळगावच्या नवनिर्वाचित महापौर सरिता पाटील, उपमहापौर संजय शिंदे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं. वसंतराव गाडगीळ, सोसायटीचे अध्यक्ष प्रभाकर पाटकर, उपाध्यक्षा आरती कुलकर्णी, संचालक प्रसाद ठाकूर, पंढरी परब, सुबोध गावडे, अजित गरगट्टी, अनिल चौधरी, शेवंतीभाई शहा, विठ्ठल प्रभू, क्षेत्रीय व्यवस्थापक सुशील जाधव, समन्वयक विकास केशकामत, विनायक जाधव उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘लोकमान्य’ची आजवरची वाटचाल विलक्षण अशीच आहे. २०३ शाखा व २३०० कोटींच्या ठेवी असलेल्या या सोसायटीने दिल्लीपर्यंत मजल मारली आहे. कोणत्याही संस्थेच्या संचालकांचे परिश्रम व सचोटी महत्त्वाची असते. त्याच बळावर सहकार तसेच क्षेत्रातील संस्कार जपत अग्रगण्य संस्था म्हणून ‘लोकमान्य’ने लौकिक मिळविला आहे. पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, सध्या सहकारी बॅँकांची स्थिती फारशी चांगली नाही; पण लोकमान्य टिळकांच्या नावाने सुरू असलेली ही संस्था म्हणजे प्रगतीचे मूर्तिमंत उदाहरण आहे. सोसायटीचे संस्थापक किरण ठाकूर म्हणाले, तरुणांना नोकरी व उद्योग मिळवून देण्यासाठी व सर्वसामान्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी संस्थेची स्थापना झाली. पुणेकरांचा विश्वास संपादन करू शकल्याने देशभरात पोहोचू शकलो. संस्थेने विविध क्षेत्रांत पुढाकार घेऊन ‘मेक इन इंडिया’साठी हातभार लावण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वीस वर्षांत बॅँकिंग, पर्यटन, विमा, रिअल इस्टेट, आरोग्य व शिक्षणासारख्या अनेक कार्यक्षेत्रांत सोसायटीने भरारी घेतली. आगामी काळात जलसेवा व विमानसेवेतही उतरणार असल्याचे ठाकूर म्हणाले. ‘लोकमान्य’तर्फे दुष्काळग्रस्तांसाठी ५० लाखांची मदत‘लोकमान्य’तर्फे दुष्काळग्रस्तांसाठी ५० लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी ‘लोकमान्य’ ही मदत मागणारी नव्हे, तर देणारी संस्था असल्याचे गौरवोद्गार फडणवीस यांनी काढले.