शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

संस्थांनी ‘लोकमान्य’चा आदर्श घ्यावा

By admin | Updated: March 7, 2016 00:15 IST

फडणवीस यांचे आवाहन : पुणे विभागीय कार्यालयाचे उद्घाटन

कोल्हापूर : सहकाराचा संस्कार जपणाऱ्या लोकमान्य सोसायटीसारख्या संस्थांनी राज्याच्या विकासात मोलाची भर घातली आहे. त्यामुळे इतर संस्थांनीही त्यातून आदर्श घेऊन ‘लोकमान्य’प्रमाणे पथदर्शी काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. लोकमान्य मल्टिपर्पज को-आॅप. सोसायटीच्या सेनापती बापट रोड, पुणे येथील स्वमालकीच्या चौमजली विभागीय कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अण्णा अलगुडे, सोसायटीचे संस्थापक-अध्यक्ष व ‘तरुण भारत’चे सल्लागार-संपादक किरण ठाकूर, बेळगावच्या नवनिर्वाचित महापौर सरिता पाटील, उपमहापौर संजय शिंदे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं. वसंतराव गाडगीळ, सोसायटीचे अध्यक्ष प्रभाकर पाटकर, उपाध्यक्षा आरती कुलकर्णी, संचालक प्रसाद ठाकूर, पंढरी परब, सुबोध गावडे, अजित गरगट्टी, अनिल चौधरी, शेवंतीभाई शहा, विठ्ठल प्रभू, क्षेत्रीय व्यवस्थापक सुशील जाधव, समन्वयक विकास केशकामत, विनायक जाधव उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘लोकमान्य’ची आजवरची वाटचाल विलक्षण अशीच आहे. २०३ शाखा व २३०० कोटींच्या ठेवी असलेल्या या सोसायटीने दिल्लीपर्यंत मजल मारली आहे. कोणत्याही संस्थेच्या संचालकांचे परिश्रम व सचोटी महत्त्वाची असते. त्याच बळावर सहकार तसेच क्षेत्रातील संस्कार जपत अग्रगण्य संस्था म्हणून ‘लोकमान्य’ने लौकिक मिळविला आहे. पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, सध्या सहकारी बॅँकांची स्थिती फारशी चांगली नाही; पण लोकमान्य टिळकांच्या नावाने सुरू असलेली ही संस्था म्हणजे प्रगतीचे मूर्तिमंत उदाहरण आहे. सोसायटीचे संस्थापक किरण ठाकूर म्हणाले, तरुणांना नोकरी व उद्योग मिळवून देण्यासाठी व सर्वसामान्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी संस्थेची स्थापना झाली. पुणेकरांचा विश्वास संपादन करू शकल्याने देशभरात पोहोचू शकलो. संस्थेने विविध क्षेत्रांत पुढाकार घेऊन ‘मेक इन इंडिया’साठी हातभार लावण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वीस वर्षांत बॅँकिंग, पर्यटन, विमा, रिअल इस्टेट, आरोग्य व शिक्षणासारख्या अनेक कार्यक्षेत्रांत सोसायटीने भरारी घेतली. आगामी काळात जलसेवा व विमानसेवेतही उतरणार असल्याचे ठाकूर म्हणाले. ‘लोकमान्य’तर्फे दुष्काळग्रस्तांसाठी ५० लाखांची मदत‘लोकमान्य’तर्फे दुष्काळग्रस्तांसाठी ५० लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी ‘लोकमान्य’ ही मदत मागणारी नव्हे, तर देणारी संस्था असल्याचे गौरवोद्गार फडणवीस यांनी काढले.