शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रदूषण नियंत्रण’कडूनच चौकशी

By admin | Updated: November 28, 2015 00:31 IST

रंकाळा प्रदूषण : हरित लवादाचा वालचंद कॉलेजच्या नियुक्तीस आक्षेप

कोल्हापूर : रंकाळा तलावाच्या प्रदूषणमुक्तीसाठी झालेल्या आठ कोटी रुपयांच्या खर्चाची व प्रस्तावित १२५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाची चौकशी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाऐवजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीने करावी, अशी सूचना राष्ट्रीय हरित लवादाच्या न्या. व्ही. आर. किंगावकर व तज्ज्ञ सदस्य अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने शुक्रवारी केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ डिसेंबरला होणार आहे.प्रस्तावित १२५ कोटी रुपयांच्या राष्ट्रीय सरोवर संवर्धन प्रकल्प-२ ऐवजी ७५ कोटी रुपयांचा प्रस्ताव असल्याचे आश्चर्यकारकरित्या महापालिकेतर्फे लवादापुढे स्पष्ट करण्यात आले. कोल्हापूर येथील नागरिक सुनील केंबळे यांनी वकील वल्लरी जठार यांच्यामार्फत केलेल्या याचिकेवर ही सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांतर्फे वकील वल्लरी जठार यांनी सांगितले की, वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय हे सध्या महापालिकेच्या इतर कामांचीसुद्धा तपासणी करणारी संस्था आहे. त्यामुळे त्यांची नियुक्ती ही कितपत योग्य ठरेल, असा सवाल उपस्थित केला व त्यांची नियुक्तीच मुळात आक्षेपार्ह असल्याचे नोंदविले व त्यास विरोध केला. अद्याप महापालिकेने चौकशीची कार्यकक्षासुद्धा निश्चित केली नसल्याचे निदर्शनास आणले.महापालिकेतर्फे वकील धैर्यर्शील सुतार यांनी वालचंद महाविद्यालयाने ही चौकशी करण्यासंदर्भात इच्छा दर्शविली नाही, तसेच त्यांचे मानधन हे जास्त आहे. एकदा महापालिकेने मोठी रक्कम खर्च करून प्रकल्प अहवाल तयार केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रस्तावित १२५ कोटींच्या आराखड्याच्या चौकशीसाठी मोठी रक्कम खर्च करणे म्हणजे सार्वजनिक पैशांचा अपव्यय असल्याचे लवादास सांगितले. त्यामुळे इतर पर्यायांवर महापालिका विचार करत असल्याचेसुद्धा सांगितले. त्यावर लवादाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वकिलांना जर प्रदूषण नियंत्रण मंडळानेच तज्ज्ञ अधिकाऱ्यांची समिती नेमून रंकाळा प्रदूषणमुक्तीच्या झालेल्या व प्रस्तावित आराखड्याची चौकशी करण्याचे सूचित केले. त्यावर प्रदूषण मंडळाच्या वकिलांनी मुदत मागितली व निश्चित स्वरूपाचे विधान करू, असे स्पष्ट केले. त्यावर लवादाने महाराष्ट्र प्रदूषण मंडळास असे आदेश आम्ही देऊ, असे सांगत पुढील आदेशासाठी ९ डिसेंबरपर्यंत सुनावणी तहकूब केली. सुनावणीस उपायुक्त विजय खोराटे, जलअभियंता मनीष पवार, पर्यावरण अभियंता आर. के पाटील व क्षेत्रीय अधिकारी नरसिंह शिवनगी हजर होते. प्रकल्पाची किंमत कमी कशी झाली..?सध्या १२५ कोटींचा प्रस्ताव राष्ट्रीय सरोवर संवर्धन प्रकल्प- २ अंतर्गत ७५ कोटी रुपयांपर्यंत कमी केल्याचे महापालिकेचे वकील धैर्यशील सुतार यांनी आश्चर्यकारकरीत्या स्पष्ट केले. त्यामुळे मूळचा प्रस्ताव एवढा चढ्या रकमेचा का केला होता, हा प्रश्न निर्माण झाला आणि खरोखरच तो जरूरी होता का, हा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे यातले खरे गौडबंगाल काय, असा सवाल उपस्थित होतो. रंकाळा तलावाच्या प्रदूषणमुक्तीसाठी खरी किती रकमेची गरज आहे हे तपासणे गरजेचे बनले आहे.