शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कोल्हापुरात कळंबा कारागृहात कैद्यांनी साजरी केली ईद

By उद्धव गोडसे | Updated: April 11, 2024 13:32 IST

३०० कैद्यांचे सामुदायिक नमाज पठण, सामाजिक सलोखा वाढीसाठी विविध उपक्रम

कोल्हापूर : रमजान ईदच्या निमित्ताने कळंबा मध्यवर्ती कारागृहातील ३०० मुस्लिम कैद्यांनी गुरुवारी (दि. ११) कारागृहात सामुदायिक नमाज पठण केले. रोजे आणि नमाज पठण यासाठी कारागृह प्रशासनाने कारागृहात व्यवस्था केली होती. कैद्यांमधील धार्मिक, सामाजिक सलोखा वाढवून त्यांच्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी असे विविध उपक्रम सुरू असल्याची माहिती कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे यांनी दिली.

कळंबा मध्यवर्ती कारागृहात २३०० कैद्यांपैकी ३०० कैदी मुस्लिम आहेत. त्यांना रोजाचे उपवास करता यावेत, यासाठी पहाटे पाच वाजता आणि सायंकाळी सहा ते सात या वेळेत जेवणाची व्यवस्था केली होती. ईदच्या निमित्ताने गुरुवारी सकाळी सामुदायिक नमाज पठणचे आयोजन केले होते. यासाठी बाहेरून मौलवी तौसिफ होकेवाले, अब्दुल अजीज, जाफर मलबारी, युनुस शेख, दिलबारी बेपारी यांना पाचारण केले होते.

नमाज पठण झाल्यानंतर सर्वांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. कारागृहातील सर्वधर्मीय कैद्यांना त्यांच्या धार्मिक रीतीरिवाजानुसार उपासना करता यावी, यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. यातून कैद्यांमध्ये धार्मिक सलोखा वाढीस लागत असल्याचे कारागृह अधीक्षक शेडगे यांनी सांगितले.

यावेळी उपअधीक्षक सचिन चिकणे, वरिष्ठ तुुरुंग अधिकारी चंद्रशेखर देवकर, विलास कापडे, शैला वाघ, वामन निमजे यांच्यासह भारत पाटील, प्रवीण आंबेकर, अविनाश भोई, विठ्ठल शिंदे, मुनीफ शेख, माधुरी मोरे, सतीश माने, सुभेदार कोळी, आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरjailतुरुंग