शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

खेडोपाडीच्या पाण्याचा होणार हिशेब, इंटरनेट ऑफ थिंग्ज’ची घेणार मदत

By समीर देशपांडे | Updated: February 11, 2025 12:16 IST

इंटरनेट ऑफ थिंग्ज’ची घेणार मदत

समीर देशपांडेकोल्हापूर : प्रचंड पाण्याचा उपसा, तितकीच प्रचंड वीजबिले, मोठी गळती आणि इतके करूनही अशुद्ध आणि अपुऱ्या पाण्याचा पुरवठा. राज्यातील हे पाणीपुरवठा विषयक चित्र बदलण्यासाठी आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने कंबर कसली आहे. ‘आयओटी’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आता एखाद्या गावाने नदीतून पाणी उचलले किती आणि गावातील शेवटच्या ग्रामस्थाला ते मिळाले की नाही, इथपर्यंतची माहिती आता संकलित करण्यात येणार आहे.२०१९ साली जाहीर करण्यात आलेल्या जलजीवन मिशनमधील योजना अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत. माणसी प्रतिदिनी ५५ लिटर शुद्ध पाण्याचे उद्दिष्ट ठेवून या जलजीवनच्या नव्या योजना आखण्यात आल्या आहेत. परंतु, तरीही अनेक ठिकाणी दर्जाहीन कामांमुळे गळती मोठ्या प्रमाणावर सुरू राहते. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करूनही या योजना १०० टक्के फलद्रूप ठरत नाहीत, म्हणूनच आता गावागावातील पाण्याचा हिशाेब मांडला जाणार आहे.इंटरनेट ऑफ थिंग्ज’ची घेणार मदतइंटरनेटच्या माध्यमातून मोठी संख्यात्मक माहिती इतर घटकांना पाठवण्यासाठीच्या तंत्रज्ञान पद्धतीने ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ म्हटले जाते. याच माध्यमातून आता एखाद्या पाणी योजनेतून गावासाठी नदीतून नेमके किती पाणी उचलले हे फ्लो मीटरच्या साहाय्याने मोजण्यात येईल. त्यातील किती पाणी वाहून नेऊन गावातील पाण्याच्या टाक्यांमध्ये पडले, तेथून ते सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे समान प्रमाणात वितरित झाले की नाही, याची संपूर्ण माहिती या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संकलित करण्यात येणार आहे.

पाण्याची शुद्धता ही कळणारही माहिती संकलित करून त्याचे विश्लेषण केले असताना, पाण्याची शुद्धता, त्यामध्ये टीसीएलचा वापर किती यांसह पाण्याला येणारा वास या गोष्टींचीही माहिती मिळणार आहे. त्यामुळे अशुद्ध पाणीपुरवठा होत असेल, तर ते थांबवणे शक्य होणार आहे. यासाठीचे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले असून, विविध सिग्नल्सच्या माध्यमातून पाण्याच्या वितरणाचे आणि दर्जाचे विश्लेषण करण्यात येणार आहे. उचलले तितकेच पाणी गावात पोहोचले नसेल, तर नेमका पाण्याचा अपव्यव कुठे होतो, हेदेखील या माध्यमातून समजणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी