शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

कागदपत्रांच्या त्रुटींमुळे मतदार अर्ज अपात्र

By admin | Updated: September 12, 2016 00:48 IST

पालिका निवडणुकीची तयारी : सर्वाधिक फटका जयसिंगपुरातील मतदारांना

संदीप बावचे ल्ल जयसिंगपूर जयसिंगपूर व कुरुंदवाड नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये ३५०० हून अधिक नव्याने मतदार नोंदणीचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जातील कागदपत्रांच्या विविध त्रुटींमुळे सुमारे ५०० हून अधिक नोंदणी अर्जदारांना येत्या निवडणुकीत मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे. अपात्र ठरलेले सर्वाधिक मतदार जयसिंगपुरातील आहेत. नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी विधानसभा मतदारसंघाच्या यादीत नाव नोंदविण्याची मुदत ३१ आॅगस्ट २०१६ पर्यंत होती. जयसिंगपूर व कुरुंदवाड नगरपालिकेच्या निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबर २०१६ मध्ये होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर नवीन मतदार नोंदणी अभियान सुरू करण्यात आले होते. त्यासाठी शासनाने प्रत्येक गावात केंद्र सुरू केले होते. १ जानेवारी २०१६ रोजी १८ वर्षे पात्र केलेल्या नागरिकांनी ३१ आॅगस्ट २०१६ अखेर मतदार यादीत नाव नोंदविणे आवश्यक होते. मतदारांच्या नावात किंवा पत्त्यात बदल असल्यास फॉर्म नं. ८, नवीन मतदार नोंदणीसाठी फॉर्म नं.६, तसेच मतदार यादीतून नाव वगळणे याकरिता फॉर्म नं.७ चा वापर करावा. याचबरोबर जयसिंगपूर व कुरुंदवाडमधील सर्वच मतदान केंद्रांवर बीएलओ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्याकडे नाव नोंदणीचे काम होते. दोन्ही नगरपालिकांच्या क्षेत्रात जवळपास ३५०० हून अधिक जणांनी नमुना ६ अंतर्गत नव्याने मतदार म्हणून अर्ज दिले होते. नाव नोंदणी करीत असताना नावाचा कागदोपत्री पुरावा, वयाचा पुरावा, निवासाचे ठिकाण, तसेच नाव अन्य कोणत्याही मतदार संघात असल्यास भाग ४ नुसार प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक होते. काही अर्जदारांनी आधारकार्ड देखील जोडले आहेत. दरम्यान, जवळपास ५०० हून अधिक जणांनी अपुऱ्या माहितीआधारे अर्ज दाखल केल्यामुळे निवडणूक विभागाने त्यांचे अर्ज अपात्र ठरविले आहेत. त्यामुळे या नवीन मतदारांना येत्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत अपुरी माहिती जोडल्यामुळे अर्ज अपात्र ठरले आहेत. याबाबतची माहिती नगरपालिकांना कळविण्यात आली आहे, असे निवडणूक नायब तहसीलदार संकपाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितली. जबाबदार कोण? मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत संबंधित बीएलओ अधिकारी कामासंबंधी टाळाटाळ करीत असतील तर नगरपरिषद प्रशासनाकडे नागरिकांनी तक्रार करावी, असे आवाहन नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी केले होते. अर्जासोबत अपुरी माहितीची छाननी झाल्यानंतर संबंधित अर्जदारांना कळविणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही. यामुळे अनेकांना त्याचा फटका बसला आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न अर्जदारांतून उपस्थित केला जात आहे.