शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
3
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
4
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
7
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
8
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
9
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
10
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
11
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
12
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
13
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
14
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
15
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
16
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
17
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
18
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
19
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
20
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
Daily Top 2Weekly Top 5

सोमवारपासून उद्योग तीन शिफ्टमध्ये सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:24 IST

कोल्हापूर : आठ दिवसांच्या कडक लॉकडाऊनमुळे सक्तीने बंद करावे लागलेले उद्योग सोमवारपासून तीन शिफ्टमध्ये पूर्ववत सुरू होत आहेत. किराणा ...

कोल्हापूर : आठ दिवसांच्या कडक लॉकडाऊनमुळे सक्तीने बंद करावे लागलेले उद्योग सोमवारपासून तीन शिफ्टमध्ये पूर्ववत सुरू होत आहेत. किराणा मालासह जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही सकाळी ७ ते ११ या शासनाने घालून दिलेल्या वेळेत सुरू होत आहेत. दरम्यान, सर्वच प्रकारची दुकाने सम-विषमच्या नियमाप्रमाणे सुरू करावीत अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे. यासाठी चेंबर्स ऑफ कॉमर्सतर्फे मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली जाणार आहे.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या ३१ मे अखेरच्या लॉकडाऊन अंतर्गत जिल्ह्यात १५ एप्रिलपासून लॉकडाऊन सुरू आहे. सर्व उद्योगधंदे नियमांचे पालन करून आणि ७ ते ११ या वेळेत जीवनावश्यक दुकाने उघडली जात होती, तथापि कोरोनाबाधितांचे आकडे वाढू लागल्यानंतर जिल्हा प्रशासनाने १५ ते २३ मे असा आठ दिवसांचा शंभर टक्के लॉकडाऊन लागू केला. कडक अंमलबजावणीमुळे जिल्ह्यातील सर्व उद्योगधंदे, आस्थापना, सर्व प्रकारची दुकाने बंद राहिली. आज रविवारी लॉकडाऊन संपणार होता. तो वाढणार की संपणार हा संभ्रम शनिवारी संध्याकाळी संपुष्टात आली. जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन शिथिल करत असल्याचे जाहीर करून राज्य सरकारचा ३१ मेपर्यंतच्या लॉकडाऊनचे निकष लागू राहतील असे जाहीर केले आहे. त्यामुळे आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर उद्योगधंदे व दुकाने सुरु होणार असल्याने थांबलेले जनजीवन पुन्हा एकदा गतिमान होणार आहे.

जिल्ह्यातील शिरोली, गोकूळ शिरगाव, पंचतारांकितसह सर्वच एमआयडीसी बंद होत्या. आता त्या पूर्वीच्या नियमानुसार या एमआयडीसीतील २२५० उद्योग तीन शिफ्टमध्ये सुरू होत आहेत. यात कामगारांची राहण्याच्या सोईसह कोरोना प्रतिबंधात्मक सर्वच उपाययोजनांचे पालन करण्याच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे थांबलेली धडधड पुन्हा सुरु होणार आहे.

चौकट ०१

उद्योजकांमध्ये वेळेवरून नाराजी

उद्योग व्यापार सुरू होत असला तरी वेळेच्या बंधनामुळे उद्याेजकांमध्ये नाराजीचा सूर आहे. दुकानांची सकाळची ७ ते ११ ही वेळ गैरसोईची असल्याने ती ९ ते १ ही करावी अशी मागणी यापूर्वीही उद्योजक, व्यापाऱ्यांनी ती जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. आताही याबाबतीत विनंती केली आहे, पण ती ऐकली नाही. त्यामुळे राज्य चेंबर्स ऑफ कॉमर्सचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.

चौकट ०२

कृषी सेवा केंद्रामुळे

कृषी सेवा केंद्रासह कृषी औजारांची दुकाने सुरु होणार असल्याने खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सकाळी ७ ते ११ या वेळेतच ही दुकाने सुरु राहणार आहेत. दरम्यान, कृषी सेवा केंद्रासह कृषी औजारांची तत्सम सेवा पुरवणाऱ्या व्यापाऱ्यांनीही दिवसभर दुकाने सुरु ठेवण्याची मुभा द्यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे, पण त्यांनी याचा चेंडू शासनाच्या कोर्टात टोलवला आहे. सध्या दुकाने बंद असल्याने शेतकऱ्यांना प्रचंड गैरसोईला सामोरे जावे लागत होते.

चौकट ०३

शासकीय औद्योगिक वसाहती : ३ (शिरोली, गोकूळ शिरगाव, पंचतारांकित)

खासगी सहकारी : ५

फौंड्री : २४०

लहानमोठे उद्योजक : २२५०

कामगार संख्या : १ लाख ३० हजार

औद्योगिक वसाहतनिहाय आकडेवारी

वसाहत उद्योग कामगार

शिरोली १००० ३० हजार

गोकूळ शिरगाव ८०० १५ हजार

पंचतारांकित ४५० ४० हजार

प्रतिक्रिया ०१

शासनाने फक्त जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना परवानगी दिली आहे, ती सरसकट सर्वच दुकानांना देणे गरजेचे आहे. व्यवसाय एकमेकांवर अवलंबून असल्याने ती सरसकट दिली तरच ग्राहक आणि व्यापारी या दोघांनाही फायद्याचे आहे. मागील लॉकडाऊन काळात वापरलेला सम-विषमचा फॉर्म्युला पुन्हा एकदा वापरावा, व्यापारी सहकार्य करतील.

संजय शेट्ये, अध्यक्ष, चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीज

प्रतिक्रिया ०२

बांधकामे सुरू होणार असली तरी साहित्य विक्रीच्या दुकानांना घातलेली वेळेची मर्यादा अडचणीची ठरणार आहे. पावसाळा तोंडावर असल्याने तत्पूर्वी बेसमेंटची कामे होणे गरजेच आहे, त्यामुळे ही कामे करण्यासाठी पूर्ण दिवस मुभा देण्याची गरज आहे. अन्यथा इमारतींचे फार मोठे नुकसान पावसाळ्यात सोसावे लागणार आहे.

विद्यानंद बेडेकर, क्रीडाई संघटना