शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
6
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
7
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
8
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
11
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
12
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
13
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
14
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
15
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
16
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
17
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
18
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
19
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
20
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू

सोमवारपासून उद्योग तीन शिफ्टमध्ये सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:24 IST

कोल्हापूर : आठ दिवसांच्या कडक लॉकडाऊनमुळे सक्तीने बंद करावे लागलेले उद्योग सोमवारपासून तीन शिफ्टमध्ये पूर्ववत सुरू होत आहेत. किराणा ...

कोल्हापूर : आठ दिवसांच्या कडक लॉकडाऊनमुळे सक्तीने बंद करावे लागलेले उद्योग सोमवारपासून तीन शिफ्टमध्ये पूर्ववत सुरू होत आहेत. किराणा मालासह जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही सकाळी ७ ते ११ या शासनाने घालून दिलेल्या वेळेत सुरू होत आहेत. दरम्यान, सर्वच प्रकारची दुकाने सम-विषमच्या नियमाप्रमाणे सुरू करावीत अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे. यासाठी चेंबर्स ऑफ कॉमर्सतर्फे मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली जाणार आहे.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या ३१ मे अखेरच्या लॉकडाऊन अंतर्गत जिल्ह्यात १५ एप्रिलपासून लॉकडाऊन सुरू आहे. सर्व उद्योगधंदे नियमांचे पालन करून आणि ७ ते ११ या वेळेत जीवनावश्यक दुकाने उघडली जात होती, तथापि कोरोनाबाधितांचे आकडे वाढू लागल्यानंतर जिल्हा प्रशासनाने १५ ते २३ मे असा आठ दिवसांचा शंभर टक्के लॉकडाऊन लागू केला. कडक अंमलबजावणीमुळे जिल्ह्यातील सर्व उद्योगधंदे, आस्थापना, सर्व प्रकारची दुकाने बंद राहिली. आज रविवारी लॉकडाऊन संपणार होता. तो वाढणार की संपणार हा संभ्रम शनिवारी संध्याकाळी संपुष्टात आली. जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन शिथिल करत असल्याचे जाहीर करून राज्य सरकारचा ३१ मेपर्यंतच्या लॉकडाऊनचे निकष लागू राहतील असे जाहीर केले आहे. त्यामुळे आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर उद्योगधंदे व दुकाने सुरु होणार असल्याने थांबलेले जनजीवन पुन्हा एकदा गतिमान होणार आहे.

जिल्ह्यातील शिरोली, गोकूळ शिरगाव, पंचतारांकितसह सर्वच एमआयडीसी बंद होत्या. आता त्या पूर्वीच्या नियमानुसार या एमआयडीसीतील २२५० उद्योग तीन शिफ्टमध्ये सुरू होत आहेत. यात कामगारांची राहण्याच्या सोईसह कोरोना प्रतिबंधात्मक सर्वच उपाययोजनांचे पालन करण्याच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे थांबलेली धडधड पुन्हा सुरु होणार आहे.

चौकट ०१

उद्योजकांमध्ये वेळेवरून नाराजी

उद्योग व्यापार सुरू होत असला तरी वेळेच्या बंधनामुळे उद्याेजकांमध्ये नाराजीचा सूर आहे. दुकानांची सकाळची ७ ते ११ ही वेळ गैरसोईची असल्याने ती ९ ते १ ही करावी अशी मागणी यापूर्वीही उद्योजक, व्यापाऱ्यांनी ती जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. आताही याबाबतीत विनंती केली आहे, पण ती ऐकली नाही. त्यामुळे राज्य चेंबर्स ऑफ कॉमर्सचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.

चौकट ०२

कृषी सेवा केंद्रामुळे

कृषी सेवा केंद्रासह कृषी औजारांची दुकाने सुरु होणार असल्याने खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सकाळी ७ ते ११ या वेळेतच ही दुकाने सुरु राहणार आहेत. दरम्यान, कृषी सेवा केंद्रासह कृषी औजारांची तत्सम सेवा पुरवणाऱ्या व्यापाऱ्यांनीही दिवसभर दुकाने सुरु ठेवण्याची मुभा द्यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे, पण त्यांनी याचा चेंडू शासनाच्या कोर्टात टोलवला आहे. सध्या दुकाने बंद असल्याने शेतकऱ्यांना प्रचंड गैरसोईला सामोरे जावे लागत होते.

चौकट ०३

शासकीय औद्योगिक वसाहती : ३ (शिरोली, गोकूळ शिरगाव, पंचतारांकित)

खासगी सहकारी : ५

फौंड्री : २४०

लहानमोठे उद्योजक : २२५०

कामगार संख्या : १ लाख ३० हजार

औद्योगिक वसाहतनिहाय आकडेवारी

वसाहत उद्योग कामगार

शिरोली १००० ३० हजार

गोकूळ शिरगाव ८०० १५ हजार

पंचतारांकित ४५० ४० हजार

प्रतिक्रिया ०१

शासनाने फक्त जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना परवानगी दिली आहे, ती सरसकट सर्वच दुकानांना देणे गरजेचे आहे. व्यवसाय एकमेकांवर अवलंबून असल्याने ती सरसकट दिली तरच ग्राहक आणि व्यापारी या दोघांनाही फायद्याचे आहे. मागील लॉकडाऊन काळात वापरलेला सम-विषमचा फॉर्म्युला पुन्हा एकदा वापरावा, व्यापारी सहकार्य करतील.

संजय शेट्ये, अध्यक्ष, चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीज

प्रतिक्रिया ०२

बांधकामे सुरू होणार असली तरी साहित्य विक्रीच्या दुकानांना घातलेली वेळेची मर्यादा अडचणीची ठरणार आहे. पावसाळा तोंडावर असल्याने तत्पूर्वी बेसमेंटची कामे होणे गरजेच आहे, त्यामुळे ही कामे करण्यासाठी पूर्ण दिवस मुभा देण्याची गरज आहे. अन्यथा इमारतींचे फार मोठे नुकसान पावसाळ्यात सोसावे लागणार आहे.

विद्यानंद बेडेकर, क्रीडाई संघटना