शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
3
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
4
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
5
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
6
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
7
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
8
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
9
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
10
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
11
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
12
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
13
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
14
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
15
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
16
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
17
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
18
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
19
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
20
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...

उद्योग, व्यवसायाला सुमारे ११०० कोटींचा फटका; सहा हजार कोटींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 00:43 IST

पुराचे पाणी घुसल्यामुळे नुकसान झालेल्या उद्योग, दुकानांची माहिती संकलित करण्याचे काम कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि विविध औद्योगिक संघटनांकडून सुरू आहे.

ठळक मुद्देकोल्हापुरातील महापुराचा तडाखा-

संतोष मिठारी।कोल्हापूर : येथील महापुरामुळे जिल्ह्यातील उद्योग, व्यापार आणि व्यवसाय क्षेत्रांतील आठ दिवसांतील सहा हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली; त्यामुळे सुमारे ११०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी घुसल्यामुळे नुकसान झालेल्या उद्योग, दुकानांची माहिती संकलित करण्याचे काम कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि विविध औद्योगिक संघटनांकडून सुरू आहे.

कोल्हापूरमध्ये सोमवार (दि. ५) पासून महापुराचे पाणी वाढू लागले. त्याची तीव्रता दुसऱ्या दिवसापासून वाढली. ग्रामीण आणि शहरी भागात विविध ठिकाणी पुराचे पाणी घुसले. मार्ग बंद राहिले. त्याचा परिणाम शहरातील व्यापार, व्यवसायावर झाला. पुरामुळे गेल्या आठ दिवसांतील सुमारे तीन हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली. शहरात अन्नधान्य, तेल, तयार कपडे, वाहनांचे सुट्टे भाग, आदी क्षेत्रांतील १५ हजारांहून अधिक व्यापारी, व्यावसायिक आहेत. उलाढाल थांबल्याने त्यांना ३00 कोटींचा फटका बसला आहे. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींना सोमवारी सुट्टी असते. शिवाजी उद्यमनगर, शिरोली, गोकुळ शिरगाव, हातकणंगले-कागल या मोठ्या औद्योगिक वसाहतीतील उद्योग एकमेकांशी निगडीत आहेत. या उद्योगांचे काम एकमेकांवर अवलंबून आहे.

तब्बल पाच दिवस पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग बंद राहिल्याने कच्चा माल, विविध प्रक्रियेसाठी सुट्ट्या भागांची वाहतूक करता आली नाही; त्यामुळे शिरोली औद्योगिक वसाहत ९० टक्के, तर गोकुळ शिरगाव आणि हातकणंगले-कागल औद्योगिक वसाहतीतील काम ६० ते ७० टक्क्यांपर्यंत बंद राहिले. बंद झालेले रस्ते आणि इंधन पुरवठा होत नसल्याने कामगारदेखील कंपन्यांमध्ये कामावर येऊ शकले नाहीत. या सर्व औद्योगिक वसाहतींमध्ये रोज सरासरी ५00 कोटींची उलाढाल होते. महापुरामुळे सहा दिवसांतील तीन हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली. पुणे, मुंबईसह देशातील अन्य कंपन्यांसमवेत त्यांच्या करारानुसार उत्पादने पुरविता आली नाहीत; त्यामुळे सुमारे ८०० कोटींचे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी शिरल्याने वर्कशॉप आणि अनेक दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच मंदीची स्थिती असताना त्यात महापुराने तडाखा दिल्याने झालेल्या नुकसानातून सावरण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिकांतून होत आहे.इंधन नसल्याचाही फटकामहामार्ग बंद राहिल्याने गेल्या पाच दिवसांत जिल्ह्यात इंधन उपलब्ध झाले नाही; त्यामुळे नेहमीप्रमाणे वाहतूक सुरू राहिली नाही. त्याचा परिणाम कामगारांची उपस्थिती, पाणी नसलेल्या ठिकाणाच्या कंपन्यांमध्ये उत्पादने नेण्यावर झाला. 

आकडेवारी दृष्टिक्षेपातजिल्ह्यातील उद्योगांची संख्या : २० हजारशहरातील व्यापारी, व्यावसायिकांची संख्या : सुमारे १५ हजार 

कोल्हापूर शहरातील लहान-मोठ्या १५ हजार व्यापारी, व्यावसायिकांची गेल्या आठ दिवसांतील सुमारे ३ हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली. हे सर्वजण ५ ते १० टक्के मार्जिनमध्ये व्यवसाय, व्यापार करतात. त्यांचे ३00 कोटींचे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी घुसल्याने दुकानांचे झालेले नुकसान वेगळे आहे. त्याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्याच्या आर्थिक विकासात योगदान देणाºया उद्योजक, व्यापारी, व्यावसायिकांना सरकारने मदत करावी.- संजय शेटे, अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजवीजेचे सर्वाधिक दर आणि मंदीच्या स्थितीत टिकून राहण्यासाठी कोल्हापूरचे औद्योगिक क्षेत्र संघर्ष करत आहे. त्यातच आता महापुराचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राचे साधारणत: ८०० कोटींचे नुकसान झाले. ते लक्षात घेऊन सरकारने तातडीने मदत द्यावी.- राजू पाटील, अध्यक्ष, शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMIDCएमआयडीसी