शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

जिल्ह्यातील औद्योगिक विस्तार थांबणार

By admin | Updated: September 7, 2015 22:27 IST

डोणोलीसाठी महामंडळाचे प्रयत्न : टोप, करवीर आणि अर्जुनी औद्योगिक वसाहती विरोधामुळे मागे पडल्या

सतीश पाटील -- शिरोली -जिल्ह्यातील टोप, करवीर आणि अर्जुनी या तिन्ही ठिकाणच्या नव्याने होऊ घातलेल्या औद्योगिक वसाहत स्थानिक पातळीवरील विरोधामुळे मागे पडल्या असून, जिल्ह्यात सध्या तरी कोणतेही नवीन उद्योग येणार नाहीत तसेच उद्योगांचा कोणताही विस्तार होणार नाही.कोल्हापूर जिल्ह्यात उद्योग विस्तारला पाहिजे, नवीन उद्योग यावेत, स्थानिक उद्योजकांना उद्योग विस्तारासाठी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत २००५ साली पुणे-बंगलोर महामार्गालगत टोप येथे एक हजार हेक्टर क्षेत्रात औद्योगिक वसाहत उभारण्याचे महामंडळाचे नियोजन होते. त्यासाठी टोप, संभापूर, वडगाव या भागातील जागेची पाहणी करण्यात आली. त्यावर महामंडळाचे शिक्कामोर्तबही झाले. शिरोली, गोकुळ शिरगाव आणि कागल पंचतारांकित नंतर टोप याठिकाणी एक हजार हेक्टर क्षेत्रात मोठी औद्योगिक वसाहत होणार असे वाटत होते, पण स्थानिक जनता, शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे टोप येथील अंतिम टप्प्यातील औद्योगिक वसाहतीचा निर्णय शासनाने मागे घेतला. त्यानंतर करवीर तालुक्यातील नेर्ली, तामगाव, विकासवाडी, कणेरी, कणेरीवाडी, हलसवडे याठिकाणी तीनशे हेक्टरमध्ये करवीर औद्योगिक विकास या नावाने औद्योगिक वसाहत स्थापन करण्यात येणार होती. यासाठी महामंडळ, स्थानिक लोकप्रतिनिधी, शेतकरी यांच्यात बऱ्याच बैठका झाल्या, पण अजून याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवर असलेल्या अर्जुनी याठिकाणीही औद्योगिक विस्तार करण्यासाठी साडेतीनशे हेक्टर जमीन औद्योगिक विकास महामंडळाने घेण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी या भागात नवीन उद्योग येतील, स्थानिकांना व्यवसाय मिळेल, नोकऱ्या मिळतील यासाठी या भागातील राजकीय लोकांनीही सुरुवातीला पाठिंबा दिला होता. या ठिकाणी साडेतीनशे हेक्टरमध्ये औद्योगिक वसाहत होईल असे वाटत होते, पण यालाही विरोध झाला आहे. कोल्हापुरात उद्योग विस्तार वाढवण्यासाठी आणि नवीन मोठे उद्योग सुरू करण्यासाठी अनेक कंपन्या इच्छुक होत्या, पण कुठेही जागा उपलब्ध नाही. त्यामुळे सध्यातरी उद्योग विस्तार होणे अवघड आहे.शाहूवाडी, डोणोली येथे नवीन औद्योगिक वसाहत होण्यासाठी महामंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. या परिसराची पाहणीही केली आहे, पण अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. या ठिकाणीही विरोध झाला तर जिल्ह्यात औद्योगिक विस्तार होणे अवघड आहे, असे औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी एस. एस. वराळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जिल्ह्याचा गेल्या दहा वर्षांत औद्योगिक विस्तार झालेला नाही. टोप, करवीर आणि अर्जुनी या नव्याने होऊ घातलेल्या एमआयडीसींचा प्रस्ताव स्थानिक विरोधामुळे मागे पडला आहे. उद्योग विस्तारासाठी मागणी आहे, पण जमिनी उपलब्ध नाहीत. त्यामुळे सध्या तरी जिल्ह्यात कोणतेही उद्योग येणार नाहीत आणि विस्तारही होणार नाही - एस. एस. वराळे, औद्योगिक महामंडळाचे कायर्कारी अधिकारीउद्योग वाढवण्यासाठी आज जागेची गरज आहे, जागाच उपलब्ध नसेल तर बाहेरचे उद्योग येणार कसे, मोठे उद्योग परराज्यात चालले आहेत, उद्योग विस्तार झाला नाही तर शहराची प्रगती होणार नाही, उत्पादन वाढणार नाही, त्यामुळे नवीन एमआयडीसी होणे गरजेचे आहे, त्याचा सर्वांनाच फायदा होईल आणि शहराचीही प्रगती होईल. - उदय दुधाणे, माजी अध्यक्ष, गोशिमाटोप, मंगरायाचीवाडी याठिकाणी एमआयडीसीसाठी जागा आरक्षित करण्यात आली होती, पण ही सर्व जमीन पिकाऊ आहे. या जमिनींना वडगाव नगरपालिकेचे पाणी आहे. पिकाऊ जमिनी काढून घेतल्यावर आम्ही काय खाणार. आमच्या दोन्ही गावांतील शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमिनी जाणार होत्या म्हणून आम्ही विरोध केला .- सुहास जाधव, शेतकरी, पेठवडगावकोल्हापूर शहराचा विकास होण्यासाठी मुंबई-बंगलोर कॉरिडॉर होणे गरजेचे आहे. या ठिकाणी उद्योग आले पाहिजेत. नवीन एमआयडीसी होणे आवश्यक आहे, यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. नवीन एमआयडीसी झाली, तर मोठे उद्योग येतील, रोजगार उपलब्ध होईल. येथील कारखान्यांना काम मिळेल, आर्थिक उलाढाल वाढेल. शहराची ग्रोथ होईल, कामगारवर्ग वाढेल, नक्कीच सर्वांना फायदा होईल.- सुरेंद्र जैन, अध्यक्ष, स्मॅक