शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
5
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
6
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
7
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
8
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
9
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
10
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
11
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
12
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
13
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
14
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
15
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
16
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
17
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
18
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत पळाला; चंद्रपुरातील घटना
19
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
20
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे

जिल्ह्यातील औद्योगिक विस्तार थांबणार

By admin | Updated: September 7, 2015 22:27 IST

डोणोलीसाठी महामंडळाचे प्रयत्न : टोप, करवीर आणि अर्जुनी औद्योगिक वसाहती विरोधामुळे मागे पडल्या

सतीश पाटील -- शिरोली -जिल्ह्यातील टोप, करवीर आणि अर्जुनी या तिन्ही ठिकाणच्या नव्याने होऊ घातलेल्या औद्योगिक वसाहत स्थानिक पातळीवरील विरोधामुळे मागे पडल्या असून, जिल्ह्यात सध्या तरी कोणतेही नवीन उद्योग येणार नाहीत तसेच उद्योगांचा कोणताही विस्तार होणार नाही.कोल्हापूर जिल्ह्यात उद्योग विस्तारला पाहिजे, नवीन उद्योग यावेत, स्थानिक उद्योजकांना उद्योग विस्तारासाठी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत २००५ साली पुणे-बंगलोर महामार्गालगत टोप येथे एक हजार हेक्टर क्षेत्रात औद्योगिक वसाहत उभारण्याचे महामंडळाचे नियोजन होते. त्यासाठी टोप, संभापूर, वडगाव या भागातील जागेची पाहणी करण्यात आली. त्यावर महामंडळाचे शिक्कामोर्तबही झाले. शिरोली, गोकुळ शिरगाव आणि कागल पंचतारांकित नंतर टोप याठिकाणी एक हजार हेक्टर क्षेत्रात मोठी औद्योगिक वसाहत होणार असे वाटत होते, पण स्थानिक जनता, शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे टोप येथील अंतिम टप्प्यातील औद्योगिक वसाहतीचा निर्णय शासनाने मागे घेतला. त्यानंतर करवीर तालुक्यातील नेर्ली, तामगाव, विकासवाडी, कणेरी, कणेरीवाडी, हलसवडे याठिकाणी तीनशे हेक्टरमध्ये करवीर औद्योगिक विकास या नावाने औद्योगिक वसाहत स्थापन करण्यात येणार होती. यासाठी महामंडळ, स्थानिक लोकप्रतिनिधी, शेतकरी यांच्यात बऱ्याच बैठका झाल्या, पण अजून याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवर असलेल्या अर्जुनी याठिकाणीही औद्योगिक विस्तार करण्यासाठी साडेतीनशे हेक्टर जमीन औद्योगिक विकास महामंडळाने घेण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी या भागात नवीन उद्योग येतील, स्थानिकांना व्यवसाय मिळेल, नोकऱ्या मिळतील यासाठी या भागातील राजकीय लोकांनीही सुरुवातीला पाठिंबा दिला होता. या ठिकाणी साडेतीनशे हेक्टरमध्ये औद्योगिक वसाहत होईल असे वाटत होते, पण यालाही विरोध झाला आहे. कोल्हापुरात उद्योग विस्तार वाढवण्यासाठी आणि नवीन मोठे उद्योग सुरू करण्यासाठी अनेक कंपन्या इच्छुक होत्या, पण कुठेही जागा उपलब्ध नाही. त्यामुळे सध्यातरी उद्योग विस्तार होणे अवघड आहे.शाहूवाडी, डोणोली येथे नवीन औद्योगिक वसाहत होण्यासाठी महामंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. या परिसराची पाहणीही केली आहे, पण अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. या ठिकाणीही विरोध झाला तर जिल्ह्यात औद्योगिक विस्तार होणे अवघड आहे, असे औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी एस. एस. वराळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जिल्ह्याचा गेल्या दहा वर्षांत औद्योगिक विस्तार झालेला नाही. टोप, करवीर आणि अर्जुनी या नव्याने होऊ घातलेल्या एमआयडीसींचा प्रस्ताव स्थानिक विरोधामुळे मागे पडला आहे. उद्योग विस्तारासाठी मागणी आहे, पण जमिनी उपलब्ध नाहीत. त्यामुळे सध्या तरी जिल्ह्यात कोणतेही उद्योग येणार नाहीत आणि विस्तारही होणार नाही - एस. एस. वराळे, औद्योगिक महामंडळाचे कायर्कारी अधिकारीउद्योग वाढवण्यासाठी आज जागेची गरज आहे, जागाच उपलब्ध नसेल तर बाहेरचे उद्योग येणार कसे, मोठे उद्योग परराज्यात चालले आहेत, उद्योग विस्तार झाला नाही तर शहराची प्रगती होणार नाही, उत्पादन वाढणार नाही, त्यामुळे नवीन एमआयडीसी होणे गरजेचे आहे, त्याचा सर्वांनाच फायदा होईल आणि शहराचीही प्रगती होईल. - उदय दुधाणे, माजी अध्यक्ष, गोशिमाटोप, मंगरायाचीवाडी याठिकाणी एमआयडीसीसाठी जागा आरक्षित करण्यात आली होती, पण ही सर्व जमीन पिकाऊ आहे. या जमिनींना वडगाव नगरपालिकेचे पाणी आहे. पिकाऊ जमिनी काढून घेतल्यावर आम्ही काय खाणार. आमच्या दोन्ही गावांतील शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमिनी जाणार होत्या म्हणून आम्ही विरोध केला .- सुहास जाधव, शेतकरी, पेठवडगावकोल्हापूर शहराचा विकास होण्यासाठी मुंबई-बंगलोर कॉरिडॉर होणे गरजेचे आहे. या ठिकाणी उद्योग आले पाहिजेत. नवीन एमआयडीसी होणे आवश्यक आहे, यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. नवीन एमआयडीसी झाली, तर मोठे उद्योग येतील, रोजगार उपलब्ध होईल. येथील कारखान्यांना काम मिळेल, आर्थिक उलाढाल वाढेल. शहराची ग्रोथ होईल, कामगारवर्ग वाढेल, नक्कीच सर्वांना फायदा होईल.- सुरेंद्र जैन, अध्यक्ष, स्मॅक