शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक वसाहतीचे सांडपाणी शेतात

By admin | Updated: July 19, 2016 00:14 IST

उदगावचे शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात : लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज

जयसिंगपूर : उदगाव (ता. शिरोळ) येथील ल. क़ औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी पावसाच्या पाण्याबरोबर शेतकऱ्यांच्या शेतात सोडल्यामुळे ते उदगाव फकीर रस्ता ते धरणग्रस्त वसाहत रस्त्यालगत शेतीच्या पिकात साचल्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. या परिसरात दुर्गंधी येत असल्यामुळे पुन्हा एकदा सांडपाणी निचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. गेल्या आठवड्याभरापासून संततधार पावसामुळे उदगाव, चिंचवाड परिसरात शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून पिके धोक्यात आली आहेत. त्यातच येथील जवळच असणाऱ्या औद्योगिक वसाहतीतील विविध कारखान्यांचे सांडपाणी पावसाच्या पाण्याबरोबर वाहून थेट शेतकऱ्यांच्या शेतात जात आहे. येथील पाणी शेतात साचून राहिल्यामुळे फकीर रस्ता व धरणग्रस्त रस्त्याच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच काही शेतकऱ्यांनी नैसर्गिकरीत्या वाहणाऱ्या पाण्याचा मार्ग बदलल्याने हे पाणी शेतातील पिकात साचून अन्य शेतात पसरत आहे. त्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. या परिसरात मोठी दुर्गंधी पसरली असून, शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. येथील औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्याबाबत प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने आंदोलन होत असते. गेल्या दहा वर्षांपूर्वी असेच आंदोलन होऊन सांडपाणी पाईपलाईनद्वारे अर्जुनवाड-चिंचवाड दरम्यान असलेल्या कृष्णा नदीपात्रात सोडले होते, तर अर्जुनवाड येथील ग्रामस्थांनी याबाबत आंदोलन करून कृष्णा नदीत सोडलेल्या पाण्यावर बंदी घातली होती. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्याचे शुद्धिकरण होऊन ते अन्य ठिकाणी वापरले जात होते. मात्र, सध्या थेट सांडपाणी शेतकऱ्यांच्या शेतात जात असल्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. तरी लोकप्रतिनिधींनी याबाबतची दखल घेऊन हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी उदगाव, चिंचवाड, अर्जुनवाड पसिरातील शेतकरी वर्गातून होत आहे.