शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
7
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
8
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
9
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
10
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
11
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
12
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
13
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
14
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
15
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
16
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
17
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
18
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
19
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
20
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?

औद्योगिक वसाहतीचे सांडपाणी शेतात

By admin | Updated: July 19, 2016 00:14 IST

उदगावचे शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात : लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज

जयसिंगपूर : उदगाव (ता. शिरोळ) येथील ल. क़ औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी पावसाच्या पाण्याबरोबर शेतकऱ्यांच्या शेतात सोडल्यामुळे ते उदगाव फकीर रस्ता ते धरणग्रस्त वसाहत रस्त्यालगत शेतीच्या पिकात साचल्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. या परिसरात दुर्गंधी येत असल्यामुळे पुन्हा एकदा सांडपाणी निचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. गेल्या आठवड्याभरापासून संततधार पावसामुळे उदगाव, चिंचवाड परिसरात शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून पिके धोक्यात आली आहेत. त्यातच येथील जवळच असणाऱ्या औद्योगिक वसाहतीतील विविध कारखान्यांचे सांडपाणी पावसाच्या पाण्याबरोबर वाहून थेट शेतकऱ्यांच्या शेतात जात आहे. येथील पाणी शेतात साचून राहिल्यामुळे फकीर रस्ता व धरणग्रस्त रस्त्याच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच काही शेतकऱ्यांनी नैसर्गिकरीत्या वाहणाऱ्या पाण्याचा मार्ग बदलल्याने हे पाणी शेतातील पिकात साचून अन्य शेतात पसरत आहे. त्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. या परिसरात मोठी दुर्गंधी पसरली असून, शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. येथील औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्याबाबत प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने आंदोलन होत असते. गेल्या दहा वर्षांपूर्वी असेच आंदोलन होऊन सांडपाणी पाईपलाईनद्वारे अर्जुनवाड-चिंचवाड दरम्यान असलेल्या कृष्णा नदीपात्रात सोडले होते, तर अर्जुनवाड येथील ग्रामस्थांनी याबाबत आंदोलन करून कृष्णा नदीत सोडलेल्या पाण्यावर बंदी घातली होती. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्याचे शुद्धिकरण होऊन ते अन्य ठिकाणी वापरले जात होते. मात्र, सध्या थेट सांडपाणी शेतकऱ्यांच्या शेतात जात असल्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. तरी लोकप्रतिनिधींनी याबाबतची दखल घेऊन हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी उदगाव, चिंचवाड, अर्जुनवाड पसिरातील शेतकरी वर्गातून होत आहे.