शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

औद्योगिक वसाहतीचे सांडपाणी शेतात

By admin | Updated: July 19, 2016 00:14 IST

उदगावचे शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात : लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज

जयसिंगपूर : उदगाव (ता. शिरोळ) येथील ल. क़ औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी पावसाच्या पाण्याबरोबर शेतकऱ्यांच्या शेतात सोडल्यामुळे ते उदगाव फकीर रस्ता ते धरणग्रस्त वसाहत रस्त्यालगत शेतीच्या पिकात साचल्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. या परिसरात दुर्गंधी येत असल्यामुळे पुन्हा एकदा सांडपाणी निचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. गेल्या आठवड्याभरापासून संततधार पावसामुळे उदगाव, चिंचवाड परिसरात शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून पिके धोक्यात आली आहेत. त्यातच येथील जवळच असणाऱ्या औद्योगिक वसाहतीतील विविध कारखान्यांचे सांडपाणी पावसाच्या पाण्याबरोबर वाहून थेट शेतकऱ्यांच्या शेतात जात आहे. येथील पाणी शेतात साचून राहिल्यामुळे फकीर रस्ता व धरणग्रस्त रस्त्याच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच काही शेतकऱ्यांनी नैसर्गिकरीत्या वाहणाऱ्या पाण्याचा मार्ग बदलल्याने हे पाणी शेतातील पिकात साचून अन्य शेतात पसरत आहे. त्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. या परिसरात मोठी दुर्गंधी पसरली असून, शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. येथील औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्याबाबत प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने आंदोलन होत असते. गेल्या दहा वर्षांपूर्वी असेच आंदोलन होऊन सांडपाणी पाईपलाईनद्वारे अर्जुनवाड-चिंचवाड दरम्यान असलेल्या कृष्णा नदीपात्रात सोडले होते, तर अर्जुनवाड येथील ग्रामस्थांनी याबाबत आंदोलन करून कृष्णा नदीत सोडलेल्या पाण्यावर बंदी घातली होती. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्याचे शुद्धिकरण होऊन ते अन्य ठिकाणी वापरले जात होते. मात्र, सध्या थेट सांडपाणी शेतकऱ्यांच्या शेतात जात असल्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. तरी लोकप्रतिनिधींनी याबाबतची दखल घेऊन हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी उदगाव, चिंचवाड, अर्जुनवाड पसिरातील शेतकरी वर्गातून होत आहे.