शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

औद्योगिक क्षेत्र, शिक्षण संस्थांनी एकत्र यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 23:54 IST

कसबा बावडा : औद्योगिक क्षेत्र आणि शिक्षण संस्थांनी एकत्र येऊन काम केल्यास उद्योग क्षेत्राला आवश्यक असलेले अद्ययावत ज्ञान उद्योजकांना मिळेल आणि विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील अनुभव मिळेल. यामध्ये उद्योजक आणि विद्यार्थी या दोघांचा फायदा होईल, असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले. ते डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे एका हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या ...

कसबा बावडा : औद्योगिक क्षेत्र आणि शिक्षण संस्थांनी एकत्र येऊन काम केल्यास उद्योग क्षेत्राला आवश्यक असलेले अद्ययावत ज्ञान उद्योजकांना मिळेल आणि विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील अनुभव मिळेल. यामध्ये उद्योजक आणि विद्यार्थी या दोघांचा फायदा होईल, असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले. ते डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे एका हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इन्ट्रॅक्शन २०१८ च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.शिक्षण संस्था आणि उद्योजक यांच्यात आंतरक्रिया व्हावी तसेच या दोहोंच्यात माहिती आणि ज्ञानाची देवाण-घेवाण व्हावी यासाठी डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इन्ट्रॅक्शन २०१८ चे आयोजन केले होते. याचे उद्घाटन डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आणि आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील यांच्या हस्ते रोपट्याला जल अर्पण करून झाले. यावेळी उद्योग क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीमधील एक चांगली संधी इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इन्ट्रॅक्शनमधून निर्माण होणार आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रातला चांगला अनुभवही प्राप्त होण्यास मदत होणार आहे. या ज्ञानाच्या आधारे विद्यार्थी चांगले करिअर करू शकतील.यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, सध्या औद्योगिक क्षेत्राला विविध समस्यांना सामोरे जावे लागते. कुशल मनुष्यबळ मिळत नाही. प्रशिक्षित मनुष्यबळ मिळत नाही. योग्य तांत्रिक ज्ञान उपलब्ध होत नाही. अद्ययावत सॉफ्टवेअर उपलब्ध होत नाहीत. अभ्यासक्रमात गॅप असतो. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असलेले ज्ञान मिळत नाही. विद्यार्थी लाईव्ह प्रोजेक्ट करत नाहीत. कामाच्या अनुभवाची कमतरता, पायाभूत सुविधांची कमतरता असते. यासाठी उद्योजक, विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र आले पाहिजेत. या उद्देशानेच या इंडस्ट्री इन्स्टिट्यूूट इन्ट्रॅक्शन २०१८ चे आयोजन केले आहे.यावेळी गोशिमाचे अध्यक्ष सुरजितसिंह पवार यांनी, उद्योग क्षेत्राला कुशल मनुष्यबळाची गरज असते. अनेक क्षेत्रात कुशल मनुष्यबळ मिळत नाही. डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपमुळे या माध्यमातून उद्योग क्षेत्राला उपयुक्त असलेले कुशल मनुष्यबळ, तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे.यावेळी फौंड्री क्लस्टरचे अध्यक्ष सचिन पाटील यांनी, कारखानदारांना आधुनिक ज्ञानाची गरज आहे. ती डी. वाय. पाटील ग्रुपकडून नक्कीच पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी उद्योजक सचिन मेनन, रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संग्राम पाटील, उद्योजक अजयसिंह देसाई यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उद्योजक राजू पाटील, हरिश्चंद्र धोत्रे, सचिन मेनन, राजीव पारीख, श्रीकांत दुधाणे, आदी उपस्थित होते.