शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

औद्योगिक क्षेत्र, शिक्षण संस्थांनी एकत्र यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 23:54 IST

कसबा बावडा : औद्योगिक क्षेत्र आणि शिक्षण संस्थांनी एकत्र येऊन काम केल्यास उद्योग क्षेत्राला आवश्यक असलेले अद्ययावत ज्ञान उद्योजकांना मिळेल आणि विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील अनुभव मिळेल. यामध्ये उद्योजक आणि विद्यार्थी या दोघांचा फायदा होईल, असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले. ते डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे एका हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या ...

कसबा बावडा : औद्योगिक क्षेत्र आणि शिक्षण संस्थांनी एकत्र येऊन काम केल्यास उद्योग क्षेत्राला आवश्यक असलेले अद्ययावत ज्ञान उद्योजकांना मिळेल आणि विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील अनुभव मिळेल. यामध्ये उद्योजक आणि विद्यार्थी या दोघांचा फायदा होईल, असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले. ते डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे एका हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इन्ट्रॅक्शन २०१८ च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.शिक्षण संस्था आणि उद्योजक यांच्यात आंतरक्रिया व्हावी तसेच या दोहोंच्यात माहिती आणि ज्ञानाची देवाण-घेवाण व्हावी यासाठी डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इन्ट्रॅक्शन २०१८ चे आयोजन केले होते. याचे उद्घाटन डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आणि आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील यांच्या हस्ते रोपट्याला जल अर्पण करून झाले. यावेळी उद्योग क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीमधील एक चांगली संधी इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इन्ट्रॅक्शनमधून निर्माण होणार आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रातला चांगला अनुभवही प्राप्त होण्यास मदत होणार आहे. या ज्ञानाच्या आधारे विद्यार्थी चांगले करिअर करू शकतील.यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, सध्या औद्योगिक क्षेत्राला विविध समस्यांना सामोरे जावे लागते. कुशल मनुष्यबळ मिळत नाही. प्रशिक्षित मनुष्यबळ मिळत नाही. योग्य तांत्रिक ज्ञान उपलब्ध होत नाही. अद्ययावत सॉफ्टवेअर उपलब्ध होत नाहीत. अभ्यासक्रमात गॅप असतो. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असलेले ज्ञान मिळत नाही. विद्यार्थी लाईव्ह प्रोजेक्ट करत नाहीत. कामाच्या अनुभवाची कमतरता, पायाभूत सुविधांची कमतरता असते. यासाठी उद्योजक, विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र आले पाहिजेत. या उद्देशानेच या इंडस्ट्री इन्स्टिट्यूूट इन्ट्रॅक्शन २०१८ चे आयोजन केले आहे.यावेळी गोशिमाचे अध्यक्ष सुरजितसिंह पवार यांनी, उद्योग क्षेत्राला कुशल मनुष्यबळाची गरज असते. अनेक क्षेत्रात कुशल मनुष्यबळ मिळत नाही. डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपमुळे या माध्यमातून उद्योग क्षेत्राला उपयुक्त असलेले कुशल मनुष्यबळ, तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे.यावेळी फौंड्री क्लस्टरचे अध्यक्ष सचिन पाटील यांनी, कारखानदारांना आधुनिक ज्ञानाची गरज आहे. ती डी. वाय. पाटील ग्रुपकडून नक्कीच पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी उद्योजक सचिन मेनन, रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संग्राम पाटील, उद्योजक अजयसिंह देसाई यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उद्योजक राजू पाटील, हरिश्चंद्र धोत्रे, सचिन मेनन, राजीव पारीख, श्रीकांत दुधाणे, आदी उपस्थित होते.